Friday, October 23, 2009

भाजप-नेत्यांच्या उरावर "परिवारा'चे बोजे

भाजप-पक्षाच्या खांद्यावर नेत्यांचे ओझे
भाजप-नेत्यांच्या उरावर "परिवारा'चे बोजे
भारतीय जनसंघाचे संस्थापक-अध्यक्ष भारत केसरी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म 6 जुलै 1901 मध्ये झाला. त्यांच्या वैचारिक प्रेरणेने भारतीय "जनसंघाचा' 55 वर्षापूर्वी जन्म झाला. कोणतीही संस्कृती किंवा इतिहास स्थितीशील किंवा मौन धारण करून थांबू शकत नाही. संस्कृती आणि इतिहास हा अखंडित प्रवाह म्हणजेच सुज्ञतेचा आविष्कार असतो. भारताच्या राजकीय क्षितीजावर संस्कृती आणि इतिहासाचा प्रवाह अखंडित ठेवण्याचे दायित्व ज्या पक्षावर ठेवले तो पूर्वीचा भारतीय जनसंघ किंवा आजची भारतीय जनता पार्टी. अखंडित ठेवण्याचे दायित्व ज्या पक्षावर ठेवले तो पूर्वीचा भारतीय जनसंघ किंवा आजची भारतीय जनता पार्टी.भारतीय जनता पार्टीचे सहज सिंहावलोकन केले तर "स्वयमेव मृगेंद्रता' या संस्कृत वाक्याची आठवण होते- भारतीय जनसंघाची मुळे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिकतेत रुजलेली आहेत. 1934 च्या डिसेंबरमध्ये वर्धा येथे भरलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला महात्मा गांधीनी भेट दिली होती. आणि 1947 मध्ये दिल्लीतल्या संघ स्वयंसेवकापुढे महात्मा गांधीनी भाषणही केले होते. संघाची शिस्त आणि राष्ट्रीयतेची प्रखर भावना पाहून ते प्रभावीतही झाले होते. मात्र महात्माजींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सर संघचालक श्री गोळवळकर गुरुजी यांच्या सह संघावर वेगवेगळे आरोप केले. वस्तुतः या हत्येनंतर या हत्येविरोधात संघाने निषेध व्यक्त केला होता. परंतु त्याबाबतचा एक शब्ददेखील एकाही आमदाराने किंवा खासदाराने विधिमंडळात उच्चारला नाही. ऑगस्ट 1947 मध्ये देशाच्या विभाजनाबरोबरच पूर्व पाकिस्तानातून म्हणजे आजच्या बांगला देशातून शरणार्थींचे जथ्थेच्या जथ्थे भारतीत येत होते. सरदार वल्लभभाई पटेल आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यात वैचारिक साम्य होते. त्या वेळी नेहरू, लियाकत अली समझोत्यानुसार भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण देण्यास बाध्य होते. पुढे पाकिस्तानने समझौता पाळला नाही. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याबाबत पाकिस्तानला पाऊल उचलण्यास बाध्य करू शकले नाहीत. आणि पंडितजींची तटस्थ भूमिका पाहून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निश्चय केला. त्यांनी पिपल्स पार्टी या नावाने बंगालमध्ये एक दल स्थापन केले. त्याच वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुद्धा राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत विचार विनिमय सुरू झाला होता. पुढे डॉ. मुखर्जी आणि संघाचे गोळवलकर गुरुजी यांच्यात विचार विनिमय सुरू झाला होता. आणि त्या विचार मंथनातून "भारतीय जनसंघाचा' जन्म झाला. 1951मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनसंघाचे नेतृत्व श्यामाप्रसाद मुखर्जींकडे सोपविले गेले. त्यानंतर झालेल्या पहिल्याच सार्वजनिक निवडणुकीत "दोन' खासदारांच्या साह्याने आपले खाते उघडले आणि भारतीय जनसंघ एक सशक्त राजकीय पक्ष म्हणून मान्यता पावला.भारतीय जनसंघाच्या स्थापनेचे पहिले दशक म्हणजे संघटनात्मक बांधणी व नियोजिन वाढ आणि तात्विक दृष्ट्या धोरण निश्चितीही झाली. त्यावेळी काश्मीर, कच्छ आणि बेरूबारी हे विषय उपस्थित करून देशाच्या मध्यवर्ती सीमेचा प्रश्न जनसंघाने प्रभावीपणे हाताळला. याच कारणासाठी 23 जून 1953 मध्ये काश्मीरचे वजीर ए आझम शेख महम्मद अब्दूला यांच्या जेल मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जींना हौतात्म्य पत्करावे लागले.जनसंघाने या काळात गो संरक्षण कायदा, जमीनदारी आणि जहागिरी, लायसन्स कोटा राज, अण्वस्त्र सज्जता या मुद्यांनाही राष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त करून दिले.आणीबाणीतल्या भूमिगत चळवळी आणि संघाच्या योजनापूर्वक कार्यामुळे 1977च्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यावेळी मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी सहभागी झाले होते. सरकारी कामकाजामध्ये जनसंघाचे लोक समर्पणशीलतेने काम करीत असतानाच जनता पार्टीतील अंतर्गत संघर्षाने मात्र परिसीमा गाठली. काही लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनसंघ या दोन्ही पक्षांशी संबंध ठेवता येणार नाही हा दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उचलून धरला आणि पुढे पक्ष फुटला!पुढे राजकीय परिस्थितींचा हा अंदाज घेऊन 6 एप्रिल 1980 रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर संमेलन होऊन "भारतीय जनता पार्टी' या नावाने पक्ष स्थापन केला आणि भारतीय जनता पार्टी पुढे महत्त्वाचा पक्ष ठरला. 1984 साली इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन उभे केले गेले. त्या काळात भारतीय जनता पार्टीला फक्त दोन जागा मिळाल्या.अटल बिहारी वाजपेयी यांनी अध्यक्ष आणि लालकृष्ण अडवाणी यांनी महामंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली.देशात सुराज्याची स्थापना व्हावी म्हणून निघालेली लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली सुराज्य रथयात्रा, मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली काश्मिर रथयात्रा या उपक्रमांनी संपूर्ण भारत देश ढवळून निघाला. त्याचा परिणाम भाजपाला भरभरून मते मिळाली. पण म्हणतात ना "घर फिरले की घराचे वासे फिरतात!' या म्हणीप्रमाणे आज भारतीय जनता पक्षाची झालेली दिसते. सर्व सामान्य कार्यकर्ता आज गोंधळात व संभ्रमात पडलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी राजकारणातून पूर्णपणे निवृत्त झाले ते एका अर्थी बरेच झाले कारण प्रत्येक वेळी भाजपाच्या नेत्यांनी गोंधळ घालायचा आणि वाजपेयींनी सारवा सारव करायची असा मामला होता, आता वाजपेयी सक्रिय नसल्यामुळे जनतेने भाजपाला माफ करावे किंवा कानाडोळा करावा अशी स्थिती नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या नेतृत्वाखाली सरकारच्या चौफेर यशस्वी कामगिरीचे मार्केटिंग चांगल्या पद्धतीने न जमल्याने केवळ इंडिया शायनिंग अशी कवी कल्पना प्रत्यक्षात न उतरता फक्त कागदावरच राहिली. अटलजींची कविता जनतेच्या हृदयापर्यंत न जाता केवळ कागदावरच राहिली कारण भोवतालचे लोक तोंडपूजक होते. वाजपेयींची कारकिर्द यशस्वी ठरली, पण भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व सक्षमपणे उभे राहण्यात अपयशी ठरले.प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजपमध्ये खऱ्या अर्थाने चौकस किंवा अनुभवी नियोजन कर्ता नव्हता. पक्ष चालविण्यास पैसा लागतो हे शेंबडं पोरंही सांगेल पण भाजपचे अंतर्गत वाद किंवा आर्थिक व्यवहार अतिशय संशयास्पद तऱ्हेने चर्चीले गेले. पक्ष कार्यालयातून दोन कोटी रुपयांची चोरी म्हणा किंवा संसदेत उघडून दाखवलेली नोटांची बंडले याचा स्त्रोत किंवा विचार सामान्य मतदार "मत' देताना नक्की ठेवेल याची जाणीव नेत्यांनी ठेवली नाही.जसवंत सिंह यांच्या जीना ः इंडिया-पार्टिशन इंडिपेंडन्स या पुस्तकाने जीना नावाचं भूत पुन्हा बाटली बाहेर आलं. ज्या जीनांना आज पाकिस्तानात जाणीवपूर्वक विसरलं जात आहे ते जीना भारतात पुन्हा धुमाकूळ घालू लागले. भारतीय बुद्धिमंतासाठी बॅरिस्टर जीना नेहमीच कुतूहलाचा विषय बनले. जीनांना भारत अखंड ठेवायचा होता. पण जीनांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना फाळणीकडे ढकललं. असे मत जसवंत सिंह यांनी मांडलं.नेहरूंना भाजपने प्रथम पासूनच खलनायक बनवले आहे. भाजपला "गांधी घराण्या'पासून कधीही आपुलकी नव्हती. ज्या पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पहिली बंदी आणली याकडेही हेतुपूर्वक डोळेझाक केली गेली. नेहरूंविरोधाची भूमिका अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या जीना स्तुतीमधला समान धागा आहे. याला भाजपा किंवा संघाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. जीनांच्या अटी मान्य केल्या असत्या तरी अखंड हिंदुस्तान राहिला असता हा तर्कही योग्य वाटत नाही. या साठीही जीनांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदास संघ, घटना समितीचे अध्यक्षपद आळीपाळीने मुस्लिमांना द्या अशा भविष्यात नागरी युद्धाला आमंत्रण देणाऱ्या अनेक अटी घातल्या होत्या. देशभर असले धगधगते अंगार ठेवण्यापेक्षा एकदाच पाकिस्तानचा तुकडा करावा या निष्कर्षापर्यंत नेहरू-पटेल आले होते या वास्तवात जीनांच्या प्रेमात पडणे गैर आहे.भाजपाच्या आजच्या फुटीचं मुळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार सरणीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवकांची शाखा म्हणजेच जनसंघ व भाजपा अशी जनतेत ओळख आहे. संघाचा अतिराष्ट्रवादी विचार गेली 70 वर्षे कायम आहे. आणि यामध्ये भिकारदास हे लक्ष्मीधर झाले. संघाच्या दुर्दैवाने त्यांच्याकडे वाजपेयींसारखा दुसरा वाजपेयी नाही. काळानुसार बदलण्याची हिंमत नाही. अथवा भाजपाला मोकळीक देणारा संघ विचार व्यापक नाही. संघ विचारांचे ओझे वाहणारे अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांचा एक गट तर यशवंत सिन्हा, अरुण गौळी, सुषमा स्वराज, सुधिन्द्र कुलकर्णी, बाबूलाल मिरांडी, अरुण जेटली या नेत्यांचा गट दुसऱ्या बाजूला असल्याचं चित्र आहे. वाजपेयींना वृद्धापकाळानं ग्रासलं. प्रमोद महाजनांची त्यांच्या भावनेच हत्या केली या दोन महत्वाच्या कारणांनी भाजप दुभंगला. या दूढीचा पहिला धमाका उमा भारतींनी अडवाणींच्या उपस्थितीत मिडिया समोर उडवला. 2004 मध्ये उमा भारतींनी आडवाणी आणि त्यांच्या निकटवर्ती नेत्यांना निवडणूकीच्या पराभवासाठी जबाबदार धरलं.गेल्या लोकसभा निवडणुकीत अडवाणींचे नेतृत्व जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा यशवंत सिन्हा, वसुंधरा राजे, जसवंत सिंह, ब्रजेश मिश्रा, सुधीर कुलकर्णी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजनाथ सिंह यापैकी पंतप्रधान होण्याच्या क्षमतेचा नेता जनतेला दिसत नाही.आपापसातल्या अहंकार आणि गर्वामुळे भाजपाचे जहाज बुडू लागल्याचे चिन्ह दिसत. असताना जहाज बुडताना प्रथम उंदिर पळतात तसे हे नेते पक्षापासून दूर जात राहिले तर यांचे भवितव्य हेच नेते आपल्या हाताने घडवत आहेत असे खेदाने म्हणावे लागेल. या वाताहतीत भाजप संपणार नाही. कारण संघविचार धारेची गरज आहे. संघ परिवाराचा तो आधार आहे. पण भाषा आणि वर्तन यात संघपरिवार नेहमीच वेगळा राहिला आहे. या एकूण पार्श्वभूमीवर आता येत्या दोन तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका दिवाळीपूर्वी किंवा दिवाळी नंतर होतील त्या वेळेस भाजपा बरोबर असलेल्या शिवसेनेने वेळीच सावध व्हावे. भाजप बरोबरीचे संबंध वेळीच तोडून स्वबळावर निवडणुका लढवाव्या, "षंढ नवऱ्यापेक्षा ढळढळीत वैधव्य पटकावलेले बरे!' या नात्याने शिवसेनेने आपल्या तरुण नेत्यांच्या रक्ताला वाव द्यावा. पंचवीस वर्षापूर्वी माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, "माझ्याकडे पंचवीस "ढाण्या वाघ' असतील! आज हे "ढाण्या वाघ' गुहेतून कधी डरकाळ्या फोडत बाहेर येतील याचीच महाराष्ट्रातील जनता वाट पाहात आहे.

भाजप-नेत्यांच्या उरावर "परिवारा'चे बोजे

भाजप-पक्षाच्या खांद्यावर नेत्यांचे ओझे
भाजप-नेत्यांच्या उरावर "परिवारा'चे बोजे
भारतीय जनसंघाचे संस्थापक-अध्यक्ष भारत केसरी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म 6 जुलै 1901 मध्ये झाला. त्यांच्या वैचारिक प्रेरणेने भारतीय "जनसंघाचा' 55 वर्षापूर्वी जन्म झाला. कोणतीही संस्कृती किंवा इतिहास स्थितीशील किंवा मौन धारण करून थांबू शकत नाही. संस्कृती आणि इतिहास हा अखंडित प्रवाह म्हणजेच सुज्ञतेचा आविष्कार असतो. भारताच्या राजकीय क्षितीजावर संस्कृती आणि इतिहासाचा प्रवाह अखंडित ठेवण्याचे दायित्व ज्या पक्षावर ठेवले तो पूर्वीचा भारतीय जनसंघ किंवा आजची भारतीय जनता पार्टी. अखंडित ठेवण्याचे दायित्व ज्या पक्षावर ठेवले तो पूर्वीचा भारतीय जनसंघ किंवा आजची भारतीय जनता पार्टी.भारतीय जनता पार्टीचे सहज सिंहावलोकन केले तर "स्वयमेव मृगेंद्रता' या संस्कृत वाक्याची आठवण होते- भारतीय जनसंघाची मुळे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिकतेत रुजलेली आहेत. 1934 च्या डिसेंबरमध्ये वर्धा येथे भरलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला महात्मा गांधीनी भेट दिली होती. आणि 1947 मध्ये दिल्लीतल्या संघ स्वयंसेवकापुढे महात्मा गांधीनी भाषणही केले होते. संघाची शिस्त आणि राष्ट्रीयतेची प्रखर भावना पाहून ते प्रभावीतही झाले होते. मात्र महात्माजींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सर संघचालक श्री गोळवळकर गुरुजी यांच्या सह संघावर वेगवेगळे आरोप केले. वस्तुतः या हत्येनंतर या हत्येविरोधात संघाने निषेध व्यक्त केला होता. परंतु त्याबाबतचा एक शब्ददेखील एकाही आमदाराने किंवा खासदाराने विधिमंडळात उच्चारला नाही. ऑगस्ट 1947 मध्ये देशाच्या विभाजनाबरोबरच पूर्व पाकिस्तानातून म्हणजे आजच्या बांगला देशातून शरणार्थींचे जथ्थेच्या जथ्थे भारतीत येत होते. सरदार वल्लभभाई पटेल आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यात वैचारिक साम्य होते. त्या वेळी नेहरू, लियाकत अली समझोत्यानुसार भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण देण्यास बाध्य होते. पुढे पाकिस्तानने समझौता पाळला नाही. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याबाबत पाकिस्तानला पाऊल उचलण्यास बाध्य करू शकले नाहीत. आणि पंडितजींची तटस्थ भूमिका पाहून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निश्चय केला. त्यांनी पिपल्स पार्टी या नावाने बंगालमध्ये एक दल स्थापन केले. त्याच वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुद्धा राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत विचार विनिमय सुरू झाला होता. पुढे डॉ. मुखर्जी आणि संघाचे गोळवलकर गुरुजी यांच्यात विचार विनिमय सुरू झाला होता. आणि त्या विचार मंथनातून "भारतीय जनसंघाचा' जन्म झाला. 1951मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनसंघाचे नेतृत्व श्यामाप्रसाद मुखर्जींकडे सोपविले गेले. त्यानंतर झालेल्या पहिल्याच सार्वजनिक निवडणुकीत "दोन' खासदारांच्या साह्याने आपले खाते उघडले आणि भारतीय जनसंघ एक सशक्त राजकीय पक्ष म्हणून मान्यता पावला.भारतीय जनसंघाच्या स्थापनेचे पहिले दशक म्हणजे संघटनात्मक बांधणी व नियोजिन वाढ आणि तात्विक दृष्ट्या धोरण निश्चितीही झाली. त्यावेळी काश्मीर, कच्छ आणि बेरूबारी हे विषय उपस्थित करून देशाच्या मध्यवर्ती सीमेचा प्रश्न जनसंघाने प्रभावीपणे हाताळला. याच कारणासाठी 23 जून 1953 मध्ये काश्मीरचे वजीर ए आझम शेख महम्मद अब्दूला यांच्या जेल मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जींना हौतात्म्य पत्करावे लागले.जनसंघाने या काळात गो संरक्षण कायदा, जमीनदारी आणि जहागिरी, लायसन्स कोटा राज, अण्वस्त्र सज्जता या मुद्यांनाही राष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त करून दिले.आणीबाणीतल्या भूमिगत चळवळी आणि संघाच्या योजनापूर्वक कार्यामुळे 1977च्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यावेळी मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी सहभागी झाले होते. सरकारी कामकाजामध्ये जनसंघाचे लोक समर्पणशीलतेने काम करीत असतानाच जनता पार्टीतील अंतर्गत संघर्षाने मात्र परिसीमा गाठली. काही लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनसंघ या दोन्ही पक्षांशी संबंध ठेवता येणार नाही हा दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उचलून धरला आणि पुढे पक्ष फुटला!पुढे राजकीय परिस्थितींचा हा अंदाज घेऊन 6 एप्रिल 1980 रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर संमेलन होऊन "भारतीय जनता पार्टी' या नावाने पक्ष स्थापन केला आणि भारतीय जनता पार्टी पुढे महत्त्वाचा पक्ष ठरला. 1984 साली इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन उभे केले गेले. त्या काळात भारतीय जनता पार्टीला फक्त दोन जागा मिळाल्या.अटल बिहारी वाजपेयी यांनी अध्यक्ष आणि लालकृष्ण अडवाणी यांनी महामंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली.देशात सुराज्याची स्थापना व्हावी म्हणून निघालेली लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली सुराज्य रथयात्रा, मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली काश्मिर रथयात्रा या उपक्रमांनी संपूर्ण भारत देश ढवळून निघाला. त्याचा परिणाम भाजपाला भरभरून मते मिळाली. पण म्हणतात ना "घर फिरले की घराचे वासे फिरतात!' या म्हणीप्रमाणे आज भारतीय जनता पक्षाची झालेली दिसते. सर्व सामान्य कार्यकर्ता आज गोंधळात व संभ्रमात पडलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी राजकारणातून पूर्णपणे निवृत्त झाले ते एका अर्थी बरेच झाले कारण प्रत्येक वेळी भाजपाच्या नेत्यांनी गोंधळ घालायचा आणि वाजपेयींनी सारवा सारव करायची असा मामला होता, आता वाजपेयी सक्रिय नसल्यामुळे जनतेने भाजपाला माफ करावे किंवा कानाडोळा करावा अशी स्थिती नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या नेतृत्वाखाली सरकारच्या चौफेर यशस्वी कामगिरीचे मार्केटिंग चांगल्या पद्धतीने न जमल्याने केवळ इंडिया शायनिंग अशी कवी कल्पना प्रत्यक्षात न उतरता फक्त कागदावरच राहिली. अटलजींची कविता जनतेच्या हृदयापर्यंत न जाता केवळ कागदावरच राहिली कारण भोवतालचे लोक तोंडपूजक होते. वाजपेयींची कारकिर्द यशस्वी ठरली, पण भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व सक्षमपणे उभे राहण्यात अपयशी ठरले.प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजपमध्ये खऱ्या अर्थाने चौकस किंवा अनुभवी नियोजन कर्ता नव्हता. पक्ष चालविण्यास पैसा लागतो हे शेंबडं पोरंही सांगेल पण भाजपचे अंतर्गत वाद किंवा आर्थिक व्यवहार अतिशय संशयास्पद तऱ्हेने चर्चीले गेले. पक्ष कार्यालयातून दोन कोटी रुपयांची चोरी म्हणा किंवा संसदेत उघडून दाखवलेली नोटांची बंडले याचा स्त्रोत किंवा विचार सामान्य मतदार "मत' देताना नक्की ठेवेल याची जाणीव नेत्यांनी ठेवली नाही.जसवंत सिंह यांच्या जीना ः इंडिया-पार्टिशन इंडिपेंडन्स या पुस्तकाने जीना नावाचं भूत पुन्हा बाटली बाहेर आलं. ज्या जीनांना आज पाकिस्तानात जाणीवपूर्वक विसरलं जात आहे ते जीना भारतात पुन्हा धुमाकूळ घालू लागले. भारतीय बुद्धिमंतासाठी बॅरिस्टर जीना नेहमीच कुतूहलाचा विषय बनले. जीनांना भारत अखंड ठेवायचा होता. पण जीनांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना फाळणीकडे ढकललं. असे मत जसवंत सिंह यांनी मांडलं.नेहरूंना भाजपने प्रथम पासूनच खलनायक बनवले आहे. भाजपला "गांधी घराण्या'पासून कधीही आपुलकी नव्हती. ज्या पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पहिली बंदी आणली याकडेही हेतुपूर्वक डोळेझाक केली गेली. नेहरूंविरोधाची भूमिका अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या जीना स्तुतीमधला समान धागा आहे. याला भाजपा किंवा संघाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. जीनांच्या अटी मान्य केल्या असत्या तरी अखंड हिंदुस्तान राहिला असता हा तर्कही योग्य वाटत नाही. या साठीही जीनांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदास संघ, घटना समितीचे अध्यक्षपद आळीपाळीने मुस्लिमांना द्या अशा भविष्यात नागरी युद्धाला आमंत्रण देणाऱ्या अनेक अटी घातल्या होत्या. देशभर असले धगधगते अंगार ठेवण्यापेक्षा एकदाच पाकिस्तानचा तुकडा करावा या निष्कर्षापर्यंत नेहरू-पटेल आले होते या वास्तवात जीनांच्या प्रेमात पडणे गैर आहे.भाजपाच्या आजच्या फुटीचं मुळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार सरणीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवकांची शाखा म्हणजेच जनसंघ व भाजपा अशी जनतेत ओळख आहे. संघाचा अतिराष्ट्रवादी विचार गेली 70 वर्षे कायम आहे. आणि यामध्ये भिकारदास हे लक्ष्मीधर झाले. संघाच्या दुर्दैवाने त्यांच्याकडे वाजपेयींसारखा दुसरा वाजपेयी नाही. काळानुसार बदलण्याची हिंमत नाही. अथवा भाजपाला मोकळीक देणारा संघ विचार व्यापक नाही. संघ विचारांचे ओझे वाहणारे अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांचा एक गट तर यशवंत सिन्हा, अरुण गौळी, सुषमा स्वराज, सुधिन्द्र कुलकर्णी, बाबूलाल मिरांडी, अरुण जेटली या नेत्यांचा गट दुसऱ्या बाजूला असल्याचं चित्र आहे. वाजपेयींना वृद्धापकाळानं ग्रासलं. प्रमोद महाजनांची त्यांच्या भावनेच हत्या केली या दोन महत्वाच्या कारणांनी भाजप दुभंगला. या दूढीचा पहिला धमाका उमा भारतींनी अडवाणींच्या उपस्थितीत मिडिया समोर उडवला. 2004 मध्ये उमा भारतींनी आडवाणी आणि त्यांच्या निकटवर्ती नेत्यांना निवडणूकीच्या पराभवासाठी जबाबदार धरलं.गेल्या लोकसभा निवडणुकीत अडवाणींचे नेतृत्व जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा यशवंत सिन्हा, वसुंधरा राजे, जसवंत सिंह, ब्रजेश मिश्रा, सुधीर कुलकर्णी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजनाथ सिंह यापैकी पंतप्रधान होण्याच्या क्षमतेचा नेता जनतेला दिसत नाही.आपापसातल्या अहंकार आणि गर्वामुळे भाजपाचे जहाज बुडू लागल्याचे चिन्ह दिसत. असताना जहाज बुडताना प्रथम उंदिर पळतात तसे हे नेते पक्षापासून दूर जात राहिले तर यांचे भवितव्य हेच नेते आपल्या हाताने घडवत आहेत असे खेदाने म्हणावे लागेल. या वाताहतीत भाजप संपणार नाही. कारण संघविचार धारेची गरज आहे. संघ परिवाराचा तो आधार आहे. पण भाषा आणि वर्तन यात संघपरिवार नेहमीच वेगळा राहिला आहे. या एकूण पार्श्वभूमीवर आता येत्या दोन तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका दिवाळीपूर्वी किंवा दिवाळी नंतर होतील त्या वेळेस भाजपा बरोबर असलेल्या शिवसेनेने वेळीच सावध व्हावे. भाजप बरोबरीचे संबंध वेळीच तोडून स्वबळावर निवडणुका लढवाव्या, "षंढ नवऱ्यापेक्षा ढळढळीत वैधव्य पटकावलेले बरे!' या नात्याने शिवसेनेने आपल्या तरुण नेत्यांच्या रक्ताला वाव द्यावा. पंचवीस वर्षापूर्वी माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, "माझ्याकडे पंचवीस "ढाण्या वाघ' असतील! आज हे "ढाण्या वाघ' गुहेतून कधी डरकाळ्या फोडत बाहेर येतील याचीच महाराष्ट्रातील जनता वाट पाहात आहे.

गोत्यात आणणाऱ्या नात्यांचे व्यवस्थापन दुरावलेल्या नातेवाईकांचे पुनरागमन

गोत्यात आणणाऱ्या नात्यांचे व्यवस्थापन दुरावलेल्या नातेवाईकांचे पुनरागमन
"रिलेशनशिप मॅनेजमेंट' म्हणजे "नातेसंबंधांचे व्यवस्थापन' अशा एका अगदी वेगळ्या विषयावरील कार्यशाळेला मी नुकताच गेलो होतो. तिथे मी जे काय ऐकले, शिकलो ते सारांशाने तुम्हाला सांगितले तर, एका जिव्हाळ्याच्या संवेदनशील विषयावर, उपयुक्त माहिती दिल्याबद्दल, तुम्ही मला नक्की धन्यवाद द्याल. वाचा तर मग! प्रत्येक नाते हे उपयुक्त आहे किंवा नाही या "व्यापारी' निकषावर जपले किंवा तोडले जाते. कुटुंब ही संस्कार करणारी संस्था न राहता, केवळ व्यावहारिक सोय करणारी व्यवस्था झाली की, ज्यांचा उपयोग नाही, ज्यांच्यापासून मदत नाही, अशी माणसे अनावश्यक, अवांछनीय वाटू लागतात. सत्य-असत्य, चांगले-वाईट, शुभ-अशुभ, नीती-अनिती, हितकर-अहितकारक काय? हे चिरंतन जीवनमूल्यांच्या नव्हे तर स्वतःच्या स्वार्थ आणि अहंभावाच्या निकषावर ठरवले जाते. भारतीय संस्कृतीत कुटुंब जीवन निकोप, शांततामय, सहकार्याचे, हार्दिक राहण्यासाठी सर्व सदस्यांनी काही बंधने स्वेच्छेने पाळून, स्पर्धा, मत्सर, हेवेदावे, वैर, द्वेष यापासून दूर राहण्याची शिकवण दिली जात असे. व्यक्तिगत संकुचित इच्छा, महत्वाकांक्षा, लोभ, मोह, स्वार्थ, नियंत्रणात ठेवणे आणि वर्तनातील संयम यामुळे कुटुंब सुखी आणि सुरक्षित रहाते हा संस्कार संस्कृतीतच होता.दुसऱ्याच्या हिताला अपाय होणार नाही अशा रितीने स्वतःच्या स्वातंत्र्य, सत्ता, संपत्ती, स्थान, मान, पद, बळ यांचा वापर नीती आणि न्याय यांचे पालन करून, जगणे, वागणे, बोलणे, करणे हे भारतीय कुटुंब व्यवस्थेचे सूत्र होते. सध्या कुटुंबसंस्था, नातीगोती संकटात येत आहेत, कारण गती-प्रगतीच्या काळात, नाती-जपण्या-जोपासण्यासाठी लागणारी स्वस्थता, शांतता, फुरसत शोधणे लोक विसरलेत. कोणाचा कोणाला मेळ नाही. पर्वा नाही. विश्वास नाही. प्रेम नाही. आपुलकी नाही. स्वच्छहीपणा, लहरीपणा, स्वैराचार म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य मानले जाऊ लागल्याने कुटुंबाचा संदर्भ तुटला आहे. कोणाचे कोणावर नियंत्रण नाही. एक उन्मत्त उन्माद सर्वत्र भरला आहे. आता कुणाला साधे जीवन जगायचे नाही. प्रत्येकाला काय वाटेल ते करून श्रीमंत व्हायचे आहे. दारिद्रयाशी, गरीबीशी जुळवून घेऊन आहे त्यात समाधान मानायला कुणी तयार नाही. यातून घराबाहेर गुन्हेगारी वृत्ती वाढते तर घरात शोषण, पिळवणूक, अन्याय, अत्याचार वाढतात. बायको-मुले नातेवाईक कशाचे तरी साधन म्हणून उपयोगी असतील तर त्यांचे महत्त्व वाटते. पूर्वीही माणसे पोटार्थी असत पण आता ती सुस्वार्थी झाली आहेत. हे सुख त्यांच्या मनातले नाही. बाह्यसुखसाधना आहे. इंग्रजीत मजा (झश्रशर्रीीीश) आणि सुख (करिळिपशीी) यात फरक करतात. आजकाल माणसे इंद्रिय-विषय सुखांशी निगडीत तात्कालिक मजेच्या मागे आहेत. दीर्घकाळ मनाला शांती, समाधान, तृप्ती देणाऱ्या "सुखा'ला ते पारखे झाले आहेत. आधुनिक मनुष्य स्वतःच्या घरी, स्वतःलाच न ओळखणारा "पाहुणा-परका' बनत चालला आहे, तो नातेसंबंध काय आणि कसे ओळखणार?सुखसाधनांच्या विपुलतेत सुखाचा दुष्काळ (र्झेींशीींू ळप ींहश श्रिशपींू) पडल्यामुळे माणसांच्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्याचे सामर्थ्य कुटुंब-नातेवाईक-परिवारात आहे. पण त्याऐवजी ही पोकळी भरून काढण्यासाठी तो क्लब, पार्ट्या, मद्यपान, धुम्रपान, अंमली पदार्थ, वेश्यागमन, टी. व्ही., चित्रपट, झोपेच्या गोळ्या अशा पळवाटा शोधतो आणि गर्दीत असूनही एकाकी रहातो. त्याचे एकाकीपण "आपल्या' अशा त्याच्या माणसातच संपू शकते हे त्याला कळत नाही. कारण "आपल्या'कडे तो परक्याप्रमाणे पहात असल्याने त्याला "आपले' हे "आपले' वाटत नाहीत म्हणून "आधार' वाटत नाही. वेगवान वाहनांनी मैलांचे अंतर कमी होऊन जग जवळ येत आहे पण माणसांच्या अंतरातले अंतर वाढून माणसे दूर जात आहेत. जग "ग्लोबल व्हिलेज' होत आहे पण "लोकल' रिलेशनशिपला या ग्लोबलायझेशनमध्ये स्थान नाही. नात्यांमधील भावना, अनुभव प्रचिती कायम रहाण्यासाठी नातेवाईकांनी सामायिक सामूहिक उत्सव, सुख-दुःखाच्या प्रसंगात उत्साहाने, आनंदाने, सहभावनेने एकमेकांसोबत काही अनुभव "शेअर' करणे आवश्यक असते. आपण सगळे एक आहोत आपण एकमेकांचे, एकमेकांसाठी, एकत्र आहोत ही भावना निर्माण करणारे कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक सण-समारंभ-उत्सव-सोहळे भारतीय संस्कृतीने "संधी' देण्यासाठीच निर्माण केले आहेत. लग्न, मुंज, बारसे, मृत्यूनंतरचे दिवस, श्राद्ध, डोहाळजेवणे, मंगलागौर, दिवाळी, दसरा, संक्रात, जत्रा, कुलदैवताची पूजा, गावजत्रा, वारी, रथ, पालखी, सप्ताह, भंडारे, नवरात्र, गणेशोत्सव, किर्तन, दशावतारी मेळे असे असंख्य प्रसंग म्हणजे केवळ सामाजिक, सांस्कृतिक वारसा नाही, तर कुटुंबसंस्था आणि नातेवाईक-इष्टमित्रपरिवार व्यवस्था स्नेहाच्या-सहकार्याच्या-स्नेहभावनेच्या-सहभावनेच्या पायावर उभे करणारे आधारस्तंभ आहेत हे जर आपण लक्षात घेऊ तर आपण जे गमावतो आहोत ते मिळवण्यासाठी आपल्याला किती प्रकारच्या संधी वर्षातून किती वेळा मिळतात हे लक्षात येईल. माणसे अशा प्रसंगी शरीराने हजर होतात पण मनाने उपस्थित होत नाहीत परिणामी माणसे जमतात पण नातेवाईक गोळा होत नाहीत, दृष्टीभेट होते पण मनोमिलन होत नाही. भारतीय संस्कृती आणि कुटुंब संस्था यातच नातेसंबंधांचे व्यवस्थापन शास्त्र अंतर्भूत आहे. नातेसंबंधांचे व्यवस्थापन म्हणजे प्रत्यक्षात आपल्याच मनाचे व्यवस्थापन आहे. नाते हा व्यवहार नाही, ती भावना आहे. जर भावना आहे, तर ती मनात आहे. म्हणून नातेसंबंध हा, आपल्या मनाचा, दुसऱ्याच्या मनाशी असलेला संबंध आहे. नाते संबंधांवर दुष्परिणाम करण्यात टी. व्ही. वरील मालिकांचा मोठा वाटा आहे. या मालिका पूर्वग्रह आणि संशय, अविश्वास वाढवितात. अपरिपक्व कमकुवत स्त्रिया त्यामुळे नाते संबंध बिघडवतात. दुःखी, एकाकी होतात, "मी-माझे-मला' या ऐवजी "आपण-आपले-आम्हाला' ही दृष्टी स्वीकारल्याखेरीज नाती निर्माण वृद्धिगत होऊ शकत नाहीत. नात्यातल्या अलिखित आचार संहितेचे आणि निःशब्द नितीचे पालन उभय पक्षांकडून व्हावे लागते. ते कृत्रिमपणे नव्हे सवईने होण्यासाठी ते जीवनदृष्टी-जीवनमूल्य-जीवनसरणीचा एक भाग असावे लागते. नाते सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. आत्मीयतेच्या काठीच्या आधारे तोल सांभाळून ती करायची असते. "ठशश्ररींळेपीहळि ळी सर्ळींळपस ोीश ींहरप हश वशीर्शीींशी' हे सूत्र विसरायचे नसते. एकमेकांची सुखदुःखे वाटून घेण्याची भूमिका लागते. आज "प्रायव्हसी'च्या नावाखाली परकेपणा दाखवला जातो, नाते जपायचे तर थोडी झीज, तोशीस, व्यत्यय, मर्यादित आक्रमण सोसण्याची तयारी लागते. "स्वतः' पलीकडे जाऊन, दुसऱ्याचा आणि "दुसऱ्याच्या' भूमिकेतून स्वतःचा विचार करून चूक-बरोबर ठरवून प्रतिक्रिया देण्याची सवय स्वतःला लावावी लागते. सल्ला हल्ला वाटूनये अशा प्रकारे द्यावा लागतो. नातेवाईक जन्माने मिळतात आणि मित्र निवडता येतात हे खरे असले तरी नातेवाईकांना निवडलेले मित्र म्हणून वागवले तर त्यांच्याशी मैत्रीचे नाते जमू शकते व ते अधिक उत्कट होऊ शकते.नात्यांच्या व्यवस्थापनासाठी क्षमाशीलतेची गरज असते. "पझेसीव्हनेस' ठेवून चालत नाही. मत्सराला थारा नसतो. कुणी किती केले, दिले, घेतले, भोगले अशी दिल्या-घेतल्याची व्यावहारिक नोंद ठेवायची नसते. ज्याप्रमाणे आरशात आपल्याला आपलेच प्रतिबिंब दिसते तसेच आपल्या नातेवाईकांच्या मध्येही आपले प्रतिबिंबच आढळणार हे जर लक्षात ठेवलेत तर अनेक मुद्‌द्यांवर तुम्ही थोडे वेगळे वागाल. नाते संबंध आपोआप रहात-वाढत नाहीत, त्यासाठी चित्रात रंग भरावे, वाद्यात सूर आणावे, तसे नातेसंबंध रंगण्यासाठीही काही करावे."नातेसंबंधांचे व्यवस्थापन' या विषयाच्या संदर्भात तुम्ही आवर्जुन वाचावीत अशी ही काही पुस्तके 1) स्त्री विरुद्ध पुरुष, लेखक, शिवराज गोर्ले, राजहंस प्रकाशन. 225 रु. 2) तो आणि ती. अनुवाद डॉ. रमा मराठे, मेहता पब्लिशिंग हाऊस. 250 रु. 3) नवरा बायको का भांडतात? लेखक : संजय नाईक, इंद्रायणी साहित्य. 60 रु. 4) बाप लेक का भांडतात? लेखक : संजय नाईक. इंद्रायणी साहित्य. 50 रु. 5) सासू सुना का भांडतात? लेखक : संजय नाईक, इंद्रायणी साहित्य. 60 रु. 6) विवाह संस्कार, लेखक : बाळ सामंत, परचुरे प्रकाशन मंदिर. 125 रु. 7) स्पाउस, लेखिका : शोभा डे, पेंग्वीन प्रकाशन. रु.150 8) वर्तन-परिवर्तन लेखिका : अंजली पेंडसे, अनुश्री प्रकाशन. 200 रु. 9) मी मानवी हितसंबंध जोपासणारच, लेखक: उमेश कणकवलीकर, सक्सेस सपोर्ट सिस्टीम. 150 रु. 10) अपने परिवार को खुश रखने के सरल तरी के लेखक:प्रमोद बत्रा, थिंक आय.एन.सी. 256 रु. 11)सुसंवाद सहकाऱ्यांशी, अनुवाद : अविनाश भोमे, रोहन प्रकाशन. 80 रु. 12) लोकआदर प्राप्त करण्याच्या व्यवहार कुशल किमया, लेखक: वनराज मालवी, सेल्फ डेव्हलपमेंट पब्लिकेशन 65 रु. 13) चक्रम माणसाशी कसे वागावे?

भारतालाही हवा आहे एक "महंमद युनूस' गरिबांच्या उरावरून जातोय श्रीमंतांचा जुलुस!

भारतालाही हवा आहे एक "महंमद युनूस'
गरिबांच्या उरावरून जातोय श्रीमंतांचा जुलुस!
जगामध्ये गरीब व श्रीमंत ही दोन प्रकारची माणसे असतात. एकाकडे अमाप पैसा असतो तर एकाकडे अजिबात नसतो. जसे माणसांचे तसेच देशांचे. अमेरिकेसारखा धन संपन्न देश श्रीमंत असेल तर आफ्रिकेतला सोमालिया सारखा कंगाल दरिद्री अवस्थेतला देश असतो. हे सांगावयाचे कारण म्हणजे भारत हा विकसनशील देश या गटात मोडत असल्याने धड श्रीमंत राष्ट्रांच्या यादीत मोडत नाही आणि गरीब असला तरी दरिद्री नाही. आर्थिक दारिद्रय म्हणजे पुरेसा पैसा नसणे, अर्थनिर्माणाची साधने उपलब्ध नसणे, प्रचंड लोकसंख्येमुळे बेरोजगारीचे वाढते प्रश्न, नैसर्गिक आपत्ती उदा. महापूर, भूकंप, वादळे, आगी, नद्य़ांच्या प्रवाहाचे बदलणे, अशी अनेक प्रकारामुळे दारिद्रयावस्था येणे क्रमप्राप्त ठरते.कोलंबो मध्ये 1995 मध्ये झालेल्या "सार्क' शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांनी दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम प्रभाविपणे राबवण्याच्या दृष्टीने स्वतंत्र आशियाई समिती नेमली.दारिद्रय निर्मूलन होण्यासाठी या पूर्वी केलेल्या उपाय योजनांमधल्या त्रुटी शोधणं आणि दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्यांना आर्थिक प्रगती आणि मानवी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणे हे या समितीचे काम होते. दारिद्रय निर्मूलनासाठी गरिबांच्या संघटना उभारण्याची गरज आहे. त्यामुळे गरीब लोकांना बचत आणि गुंतवणूक करणं सुलभ होईल.गरीब महिलांना अधिकार दिल्यास त्या आपल्यावरील भार हलका करू शकतील. दारिद्रय निर्मूलनासाठी गरिबांच्या बचतीकडे किंवा गुंतवणीकडे आर्थिक दृष्टीकोनातून न पाहता श्रम शक्तीचं, मालमत्तेत रुपांतर करणं हाच महत्त्वाचा हेतू डोळ्यासमोर ठेवला गेला.दक्षिण आशियात ग्रामीण भागात दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ते अपरिहार्यपणे शेतीवरच अवलंबून आहेत. शेतीत प्रगती केली तर आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल केवळ अन्नधान्य उत्पादन हीच त्यांची मूलभूत गरज नसून तो समाजातील "किंमत' ठरवणाराही घटक आहे.दारिद्रय निर्मूलन कार्यक्रमात मानवी विकास हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा आणि शिक्षण, रोजगार व माहिती मिळण्याचा हक्क बजावण्यासाठी गरीब जागरूक व्हावेत यासाठी मानवी विकास होणं अत्यावश्यक आहे. आर्थिक प्रगतीचा हेतू गरिबांचा मानवी विकास साधणं हाच आहे.खुलं आर्थिक-औद्योगिक धोरण आणि गरिबांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून आखलेलं धोरण यांची सुरुवातीच्या काळात काही वेगळ्या स्तरावर अंमलबजावणी होत असली तरी विकास प्रक्रियेचं अंग असणाऱ्या या दोन्ही धोरणांचा सुयोग्य मेळ घालणं आवश्यक आहे.सार्क राष्ट्राचा प्रतिनिधीक स्वरूपाचा निष्कर्ष, अंदाज बघताना भारताबद्दल एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपण विचार करताना भारत विकसनशील देश म्हणून जग बघत असले तरी भारतात बहुसंख्य लोक दारिद्रय रेषेखालील जीवन जगतात. साहजिकच मूलभूत गरजांपैकी अन्न ही त्यांची सर्वात महत्त्वाची गरज आहे.दारिद्रय हा नेहमीच समाजात अस्तिवात असणारा घटक असल्यामुळे दारिद्रय ही संकल्पना सर्वांना परिचित असते. दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्याचं प्रमाण ठराविक निकषांवरून ठरवलं जातं. सर्व साधारणपणे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या किमान आर्थिक स्तर अथवा उत्पन्नावरून दारिद्रयाचं प्रमाण ठरविलं जातं.भारतात अधिकृत आकडेवारीनुसार 1987 मध्ये दारिद्रयाचं प्रमाण 29.9 टक्के होतं तज्ञांच्या स्वतंत्र गटाने केलेल्या पाहणीनुसार त्याच वर्षी गरिबीचं प्रमाण 45.9 टक्के होतं. दारिद्रय रेषा ठरविण्यासाठीचे आर्थिक किंवा पैशाच्या स्वरूपातील निकष एन. एस. ओ. च्या (नॅशनल सर्वे सॅंबल ऑर्गनायझेशन) 1973-74 मधील कौटुंबिक खर्च पाहणीतून निश्चित करण्यात आले. दारिद्रयाच्या मापन पद्धतीत दोष आणि अडचणी आहेत. दारिद्रय आणि पौष्टिक आहार किंवा पोषण या संबंधातील आकडेवारी पाहिल्यास असं दिसून येतं की आहाराबाबतची गरज काळानुसार बदलत असली तरी ती एका ठराविक मर्यादेपर्यंत नियंत्रित असते. ज्या ठिकाणी दारिद्रय रेषा एकदाच निश्चित करून गरिबांच्या, राहाणीमानाच्या, खर्चाच्या निर्देशांकानुसार वेळोवेळी बदल केले जातात. भारत स्वतंत्र झाल्यावर लहान शेतकऱ्यांना सरकारने सोयी व सवलती जाहीर केल्या. त्यांचे वैयक्तिक हित पाहिले गेले. पण पाच ते सात वर्षांनंतर मूल्य मापन करताना असे आढळले की ज्यांना मदत केली त्यांचे उत्पन्न वाढले परंतु त्यांची स्थिती मात्र सुधारली नाही. म्हणजेच जे वाढलेले उत्पन्न होते ते वाढत्या महागाईने संपवून टाकले. गरीब आणि लहान शेतकरी होते तिथेच राहिले. गरीब हे गरीबच राहातात ते त्यांच्या वर्तणुकीमुळेच.जोपर्यंत गरीब माणसाला जमीन, हत्याराची अवजारे, भांडवल इत्यादी मिळत नाही. हे सर्व त्याच्या मालकीचे होत नाही तोपर्यंत त्याची बेकारी हटणार नाही. त्याला कामाचा हक्क मिळाला पाहिजे. हे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बेकारांची संख्या वाढत जाणार. म्हणजेच त्यांना काम देण्याची गरज वाढत राहाणार, खर्च वाढत जाणार. लोकांचे काम वाढवावे लागेल. दुर्बलांना किंवा निर्बलांना आधार द्यावा लागेल. गरीब लोकांचे उत्पन्न वाढवावे लागेल. जमीन सुधारणा कायदे बदलण्याची पुन्हा गरज आहे. जमीन सुधारणा कायदे फार काही करू शकलेले दिसत नाहीत. कर्ज वाटपातही हाच प्रकार होताना आढळतो. सरकारच्या काही चांगल्या योजना आहेत पण त्यांची अंमलबजावणी योग्य व नियमित स्वरूपात होताना दिसत नाही.दारिद्रय आणि पौष्टिक आहार किंवा पोषण या संबंधातली आकडेवारी पाहिल्यास असं दिसून येतं की आहाराबाबतची गरज काळानुसार बदलत असली तरी ती एका ठराविक मर्यादेपर्यंत नियंत्रित असते. भारतातील दारिद्रय संपविणे शक्य आहे का? त्याचा कालावधी किती? असे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण सकारात्मक बाजूने विचार केल्यास व खालील बाबींवर सखोलपणे लक्ष दिले गेल्यास आमचे विचार आपणास नक्की पटतील.भारत हा मोठा देश आहे. मोठा म्हणजे भूभाग या दृष्टीने तसेच सांस्कृतिक व सामाजिक जडण घडणीने सुद्धा मोठा आहे. त्याला मोठी परंपरा आहे. जाज्वल्य इतिहास आहे. उत्तम संस्कृती आहे. सामंजस्य आहे. विविध धर्म, जाती, पंथ असले तरी संकट येताच एकोपा निर्माण होताना दिसतो. मग ते चीनचे आक्रमण लढ़ाई असो किंवा पाकिस्तानचे युद्ध असो तेव्हा प्रत्येक भारतीय हा "जवान' असतो. शत्रूला पाणी पाजायचेच या वृत्तीने तो झुंजतो."हरित क्रांतीद्वारे झालेल्या कृषिविकासामुळे आपल्याला थोडा फार दिलासा मिळाला कारण हरित क्रांतीने ग्रामीण अर्थ व्यवस्थेचे स्वरूप आमुलाग्र बदलवून टाकले. कृषिविकासाच्या प्रक्रियेत ग्रामीण भागातील अनेक बेरोजगारांना काम मिळालं, शेतीशी संबंधित उद्योगांना चालना मिळून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या. हरित क्रांतीच्या दृष्टीने सर्वात मोठी त्रूटी म्हणजे जिथे शेतीला अनुकूल अशी परिस्थिती (साधन सामग्री आणि पाणी पुरवठा या दृष्टीने) होती, त्या भागातील कृषि विकासाकडे सगळं लक्ष केंद्रित केलं गेलं आणि देशामधल्या बऱ्याच मोठ्या दुष्काळी भागातल्या शेती विकासाकडे मात्र दुर्लक्ष झालं. कोरड्या प्रदेशाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेलं कृषि संशोधनही मोठ्या प्रमाणात झालं नाही. जिथे जिथे हरितक्रांती कार्यक्रम जोमाने राबवला गेला तिथे गरिबांच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. तिथे साधन सामुग्री होती आणि पाणी पुरवठा उपलब्ध होता तिथे झपाट्याने कृषि विकास होऊ शकला.शहरी भागात कामगाराभिमुख धोरण असलेले उद्योगधंदे वाढले. त्यामुळे निर्यातीसाठीच्या मालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं. आयातीला पर्याय आणि शेतीला पूरक अशा औद्योगिक करणाची नीती अवलंबिल्यामुळे शेती विकासासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणा निर्माण करण्याची प्रक्रिया वाढू लागली. त्यानुसार शेतीची साधन सामुग्री, खतं, वाहनं यांच्या उद्योगात वाढ झाली. भारतातील दारिद्रयाची वाढ संपवायची असेल तर छोट्या शेतकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं महत्त्वाचं असणार आहे. सहकारी पतपेढ्यांची उभारणी, आहे त्या पेक्षा विस्तारित करून छोट्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं आणखी गरजेचं आहे. केवळ शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांनी हा विषय संपणार नाही तर काही ठोस योजना कार्यान्वित कराव्याच लागतील. दुसरं असं की देश आज स्वतंत्र होऊन साठ वर्ष होऊन गेली, पण बिहार सारखं राज्य मागासलेलं आहे. बिहार, झारखंड सारख्या मागास राज्यात ग्रामविकास शिक्षक तयार करणं तसेच ग्रामीण यंत्रणेत सर्वांना सुशिक्षित करणं, त्यांना किमान व्यावहारज्ञान मिळेल असा प्रयत्न करणं, ग्राम साक्षरता मोहिम वेगानं चालवणं, खेड्यात तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देणं किंवा विविध उद्योद धंदे कसे विकसित होतील या दृष्टीने पाहाणी करणं, ती कार्यान्वित करणं हे करावे लागेल.सामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टीने सरकारने एक दहा वर्षांचा नियोजनबद्ध कार्यक्रम करावा व तो पक्ष निरपेक्ष असावा, त्यात कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने किंवा पक्ष नेत्याने ढवळाढवळ करू नये. त्या कमिटीत डॉ. अब्दुल कलाम, महासंगणक तज्ञ भाटकर, मॉन्टेकसिंग आहुवालिया, जॉन पेट्रोझा, डॉ. लहाने यासारख्या विद्वान व सामाजिक कार्याच्या आवडीची मंडळी त्यात सदस्य म्हणून घ्यावीत व अशा कमिटीला ठराविक निर्बंध अधिकार प्रदान करावे की ज्या मुळे निर्णय प्रक्रिया वेगवान तर होईलच पण कार्याचे स्वरूप व निकाल योग्य प्रमाणात पाहावयास मिळतील.राजकीय हस्तक्षेपामुळे आज देशाची प्रगती खिळखिळी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे व काळाची गरज आहे. आज आपण बघतो आहोत की मागासले पणामुळे व प्रचंड गरिबीमुळे तरुणवर्ग नक्षलवादाकडे वळतो आहे व सरकार नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च करत आहे. हा खर्च किंवा सुरक्षा यंत्रणेची होणारी हानी थांबवण्याची मनोमन इच्छा असेल तर नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी 10 हजार कोटी रुपये सरकार खर्च करणार असेल तर, वर्षाला 1 हजार कोटी शिक्षित व उच्च पदस्थांच्या कमिट्यांकडे सुपूर्द करून हे सर्व बदलण्याची नितांत गरज आहे.तिसरे असे की आजची देशस्तरावरची शिक्षण व्यवस्था कमजोर व दुबळी झालेली दिसते. ग्रामीण भागातल्या प्राध्यापकांना जास्त पगार द्यावा व ग्रामीण विद्यार्थी खेड्यात शिक्षित व्हावा जेणे करून पुढे खेड्यांचा विकास होण्यास मदत होईल. आज दिसणारे चित्र उलटेच दिसते आहे. शिक्षण प्रणालीत इतर कामाचा बोझा वाढला आहे. निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांना ऍडमिशन्ससाठी कॉलेजेसचे खेटे घालावे लागत आहेत हे सर्व बदलल्याशिवाय पुढे जाता येणे अशक्य आहे.आरोग्य सुविधांचं विकेन्द्रीकरण करणेही गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य सेवा आहेत त्या पेक्षा दुपटीने उपलब्ध झाल्या पाहिजेत. आपला मित्रदेश रशियाकडे पाहिल्यास आपण सुधारलेल्या देशांकडे पाहिल्यास रशियामध्ये कामाचा हक्क नागरिकांना दिलेला आहे. काम करणे हे कर्तव्यही घटनेत ठरविले आहे. याचाच अर्थ आपल्या सरकारनेही असा "कामाचा हक्क' नागरिकांना उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्याचे काम असले पाहिजे. जो काम करीत नाही त्याला खायला मिळणार नाही हे तत्व भारतात लागू झाले पाहिजे. दारिद्रय म्हणजे काय? सभोवतालच्या उपयोगात आणण्यासारख्या वस्तू उपयोगात न आणता तशाच पडून ठेवणे म्हणजेच दारिद्रय. दारिद्रयाच्या वाटेवर न जाता संपन्नतेच्या मार्गावर जावे, उन्नतीच्या मार्गावर जावे. धनसंपन्न, वैभवशाली राहाणे हा कोणत्याही देशाचा कणा असावा, संपन्नता ही एखाद्या देशाची मक्तेदारी न राहाता त्याचा लाभ प्रत्येकाला घेता आला पाहिजे. तात्पर्य भारताच्या दारिद्रयाची वाट आता संपण्याच्या मार्गावर आली आहे, नव्हे; ती वाट संपलीच पाहिजे!

समान संधी आयोगाचा सुवर्ण योग लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार "कोटा' प्रयोग

समान संधी आयोगाचा सुवर्ण योग
लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार "कोटा' प्रयोग

केंद्रिय अल्पसंख्यांक मंत्री सलमान खुर्शीद यांनी नागपूर येथे एक महत्त्वाची घोषणा केली आहे. डॉ. झाकिर हुसेन विचार मंचच्या वतीने एक चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. "मुस्लीम समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक समस्या' हा या चर्चासत्राचा विषय होता. यावेळी भाषण करताना केंद्रिय अल्पसंख्याक मंत्री सलमान खुर्शीद म्हणाले की, "देशात राखीव जागांच्या प्रश्नांवरून नेहमी वाद होतात' या वादाचे मूळ या गोष्टीत आहे की, राखीव जागा किंवा सोयीसवलती लोकसंख्येच्या प्रमाणात, समाजातील विविध घटकांना मिळत नाहीत. आपल्याकडे हजारो जाती, उपजाती, धर्म आणि पंथ आहेत. नुसते मागासवर्गीय, ओबीसी, दलित किंवा अल्पसंख्य असे वर्गीकरण करून, राखीव जागा, संधी, सवलती दिल्यामुळे त्यातल्या पुढारलेल्या आणि आक्रमक अशा समाजालाच, मक्तेदारीने सर्व फायदे मिळतात. यामुळे संधी, सवलतींचा लाभ समाजातील खऱ्या अर्थाने दुर्बल घटकांना मिळतोच असे नाही. यावर एक क्रांतीकारक उपाय म्हणजेच जात, पोटजात, धर्म, त्यातील पंथ आणि संप्रदाय यांची लोकसंख्या लक्षात घेऊन, त्यांच्या लोकसंख्येतील टक्केवारीनुसार, त्यांना राखीव जागा, संधी आणि सवलती देणे. असेे केल्यास कोणत्याही धर्माला किंवा जातीला आपल्यावर अन्याय होतो आहे, किंवा दुसऱ्या जाती धर्माचे लोक आपल्या राखीव कोट्यावर आक्रमण करीत आहेत अशी भावना निर्माण होणार नाही. राखीव जागा, सोयी-सवलती या सवर्ण किंवा दलित, बहुसंख्य किंवा अल्पसंख्य असा कोणताही भेद न करता दिल्या गेल्या तर जाती-जातीमध्ये संघर्ष व धर्मामधील कलह जवळ जवळ नाहीसा होईल. विविध जाती आणि धर्मांना आपसात झुंजवून आपले राजकारण साधणाऱ्या संधीसाधू राजकारण्यांनाही आळा बसेल.आपल्या भाषणात सलमान खुर्शीद पुढे म्हणाले कि, "अलिकडेच नव्याने देशाची जनगणना झाली आहे, या जनगणनेचे निष्कर्ष लवकरच प्रसिद्ध होतील. यातून देशभरातील सर्व जाती, उपजाती, पोटजाती तसेच धार्मिक पंथ आणि संप्रदाय यांची लोकसंख्या आणि टक्केवारी स्पष्ट होईल. या टक्केवारीच्या आधारे जर राखीव जागा, सवलती आणि आर्थिक लाभ दिले गेले तर कोणाचीच तक्रार असणार नाही. यात आणखीन एक गोष्ट करता येण्यासारखी आहे. ती म्हणजे प्रगत आणि सुधारलेल्या जातीमध्ये राखीव जागा आणि आर्थिक लाभ हे आर्थिक निकषांवर घ्यायचे म्हणजे पुढारलेल्या प्रगत समाजातील दुर्बल घटकांनाही सरकारी योजनांचा आणि राखीव जागांचा लाभ होऊ शकेल. फक्त 25 टक्के जागा खुल्या ठेऊन 75 टक्के जागांवर जाती, धर्म निहाय कोटा सिस्टीम केली तर समाज झपाट्याने प्रगती करू शकेल.' सलमान खुर्शीद यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले की, "सर्व जाती धर्मांना लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक न्याय्य देण्याची प्रक्रिया तसा कायदा केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. असा कायदा करायचा असेल तर त्यासाठी संसदेची अनुमती आवश्यक आहे. बहुसंख्य आणि अल्पसंख्य अशा दोन्ही समाजाच्या विचार भावना प्रतिक्रिया लक्षात घेतल्याशिवाय असा कायदा करता येणार नाही. अशा कायद्याचा मसुदा तयार करणे हे ऐतिहासिक काम आहे. ज्याप्रमाणे देशाची घटना बनविण्यासाठी घटनासमिती स्थापना करण्यात आली होती, तशाच एखाद्या समितीकडे हा कायद्याचा मसूदा तयार करण्याचे काम सोपवावे लागेल. या समितीत सर्व जाती, धर्म, भाषा, प्रदेश यांना प्रतिनिधित्व द्यावे लागेल. त्या त्या समाजातील तज्ञ आणि विचारवंत अशाच व्यक्तींना या समितीत स्थान असेल. देशातील हा क्रांतिकारक बदल ठरेल. विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली घटनासमितीला जे महत्व होते तेच 21 व्या शतकात राखीव जागा विषयक या समितीला असेल. मंडळ आयोगानंतर बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या नव्या क्षेत्रातील संधी यामुळे जगात क्रांती झाली आहे. आता आर्थिक, सामाजिक, सांस्कृतीक प्रवाहांचा भारतीय लोक जीवनावर मोठा परिणाम होतो आहे. यापुढील काळात केवळ भारताचा विचार करून आर्थिक, सामाजिक न्यायाची धोरणे आखता येणार नाहीत. एकदा संपूर्ण जगात आपले स्थान काय, आणि जागतिक निकषावर आपण कसे, कुठे असायला हवे याचा विचार देशांतर्गत धोरण ठरवितांना करायचा म्हटले कि राखीव जागा, शैक्षणिक संधी आणि प्रशिक्षण, आर्थिक मदत या सर्वांचा हेतू जगात 2020 साली भारत महासत्ता म्हणून जगात पहिल्या क्रमांकावर असावा या उद्दिष्टांशी आपोआप जोडल्या जातात.'केंद्रिय अल्पसंख्यांक मंत्री सलमान खुर्शीद यांचे नागपूर येथील भाषण अत्यंत महत्त्वाचे होते. देशाच्या भवितव्याला क्रांतीकारक कलाटणी देणारा असा समान संधी आयोगाचा निर्णय घोषित केला. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या वर्तमान पत्रांनी या घोषणेची घ्यायला हवी होती तशी दखल घेतली नाही. सलमान खुर्शीद यांचे संपूर्ण भाषण दिल्लीतील एकाच वर्तमान पत्राने सविस्तर प्रसिद्ध केले. आमच्या वाचकांच्या माहितीकरता या अग्रलेखात सविस्तर गोषवारा प्रसिद्ध करीत आहोत. सलमान खुर्शीद आपली समान संधी आयोगाची कल्पना स्पष्ट करतांना म्हणाले कि, "संसदेत जो कायदा मांडायचा आहे त्याची पूर्व तयारी एक वेगळी समिती करेल. परंतु या समितीला दिशा देण्यासाठी आणि आज असलेल्या राखीव जागांच्या तरतुदींच्या न्याय अंमलबजावणीसाठी समान संधी आयोगाची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. या समान संधी आयोगाचे अध्यक्षपद सुप्रिम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशांकडे असेल. संसदेने समानसंधी विधेयक मंजूर केल्यानंतर, टक्केवारीनुसार राखीव जागा आणि आर्थिक मदतीचे लाभ सर्वांना मिळतात किंवा नाही हे पाहण्याचे काम या आयोगाचे असेल. कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार जसे या आयोगाकडे असतील तसेच या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्ति, संस्था, स्थानिक स्वराज्यसंस्था, राज्य व केंद्र सरकारांना शासन करण्याचेही अधिकार या समान संधी आयोगाला असतील. सध्या भारतात विविध धर्म, जाती, जमाती, आदिवासी, दलित, अल्पसंख्य यांच्यासाठी एकूण 13 आयोग कार्यरत आहेत. हे सर्व आयोग आपआपल्या क्षेत्रात काम करतात पण त्यांचा एकमेकांशी समन्वय नाही. परिणामी या आयोगांचे कार्य एकमेकांना हवे तसे पुरक होत नाही. या आयोगांना स्वायत्तता आहे पण अधिकार फक्त शिफारशी करण्याचे आहे. शिफारशीची अंमलबजावणी न करणाऱ्यांना शिक्षा करण्याचे अधिकार या आयोगांना नाहीत. समान संधी आयोग हा असा सर्वोच्च आयोग असेल कि तो विविध जाती, धर्म, दलित, आदिवासी, अल्पसंख्य या सर्वांसाठी असलेल्या आयोगांच्यामध्ये सुसुत्रता आणिल. विविध आयोगांनी केलेल्या शिफारसींची अंमलबजावणी समानसंधी आयोग संबंधीतांना करण्यास भाग पाडू शकेल. समान संधी आयोगाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तिला न्याय देण्यापेक्षा समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न राहील. आयोगाला विषयाच्या सीमा असणार नाहीत. शिक्षण, रोजगार आणि निवासव्यवस्थेचे काम लोकसंख्येच्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न समान संधी आयोगाच्या माध्यमातून झाल्यामुळे लोकशाही परिपूर्ण होईल.'केंद्रिय अल्पसंख्यांक मंत्री सलमान खुर्शीद यांचे समानसंधी आयोगाच्या निर्णयाबद्दल आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करतो. गेल्यावेळच्या केंद्रिय मंत्रीमंडळात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अ. र. अंतुले हे अल्पसंख्याक खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. बॅ. अंतुले यांची या खात्याबाबत कायम तक्रार असे कि, या खात्याला काम नाही आणि मंत्र्याला महत्त्व नाही. सलमान खुर्शीद यांनी गेल्या 100 दिवसांत अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन आणि विविध राज्य सरकारांना कामाला लावून दाखवून दिले आहे कि जिथे इच्छा अणि कर्तुत्त्व असेल तेथे रिझल्ट देता येतात. मंत्रीपदाला महत्व व्यक्तिच्या इच्छाशक्तिमुळे येते. बॅ. अंतुले थकलेले, भागलेले, दमलेले, हताश, निराश, उदास असे होते. त्यामुळे त्यांना असलेले अधिकारही वापरता आलेले नाहीत. मंत्री पदाचा उपयोग लालदिव्याची गाडी वापरण्यापलीकडे त्यांनी कधी केला नाही. अल्पसंख्यांक समाजाला मुसलमान असूनही कधी न्याय देऊ शकले नाहीत. त्यांची खासदारकी व मंत्रीपद गेल्यामुळे अल्पसंख्य समाजाने सुटकेचा निश्वाःसच सोडला असला पाहिजे.आम्ही जसे मुंबई मित्र आणि वृत्तमित्र या दैनिकांचे संपादक आहोत तसेच मराठा महासंघाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही आहोत. आमचे गुरुतुल्य मार्गदर्शक ऍड. श्री शशिकांत पवार हे राखीव जागांच्या बाबतीत एका विशिष्ठ भूमिकेवर ठाम आहेत. जातीनिहाय राखीव जागा आणि सवलती न देता, त्या आर्थिक निकषांवर दिल्या जाव्यात अशी त्यांची मागणी आहे. आमचे जेष्ठ स्नेही विनायकराव मेटे हे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून आंदोलन करीत आहेत. आम्हाला असे वाटते कि केंद्रिय अल्पसंख्याक मंत्री सलमान खुर्शीद यांनी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार संधी सवलती देण्याचा जो नवा समान संधी फॉर्मुला काढला आहे त्यामुळे ऍड. शशिकांत पवार साहेब आणि विनायकराव मेटे साहेब या मराठा समाजाच्या दोन्ही लढाऊ नेत्यांचे समाधान व्हायला हरकत नाही. नामदार सलमान खुर्शीद यांनी पाच विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर केलेली ही घोषणा निवडणूक आचार संहितेच्या कचाट्यात सापडू नये म्हणून तात्काळ वटहुकूम काढून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. सलमान खुर्शीद यांच्या घोषणेचे पुन्हा एकवार स्वागत आणि कुठल्याही राजकीय पक्षाने या विधायक पावलाला संकुचित राजकारण्यासाठी विरोध करू नये, एवढीच अपेक्षा.

खा.गोपीनाथ मुंडे, प्रवीण महाजनांच्याआरोपपत्रावर महाराष्ट्राला जवाब द्या!

खा.प्रमोद महाजनांची हत्या करणारे त्यांचे सख्खे भाऊ प्रवीण महाजन यांनी जुलै महिन्यात माझा अल्बम नावाचे एक स्फोटक खळबळजनक गौप्यस्फोट करणारे पुस्तक प्रकाशित केले. सहा महिन्यांपूर्वी दै.लोकसत्तामध्ये या पुस्तकातील एक प्रकरण प्रकाशित झाले होते. त्या "हेडलाईन'वर झळकलेल्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात अभूतपूर्व अशी खळबळ उडाली होती. संघ परिवार हादरून गेला होता. भारतीय जनता पक्षाचे नेते तोंड लपवून बसले होते. कार्यकर्ते हवालदिल झाले होते. आता तर संपूर्ण पुस्तकच प्रकाशित झाले आहे. असे म्हणतात की हे पुस्तक सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचू नये म्हणून "भाजपा'च्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांकडून एक व्यूहरचना करण्यात आली आहे. बहुसंख्य पुस्तक विक्रेत्यांनी हे पुस्तक आपल्या दुकानात ठेवायलाच नकार दिला आहे.यामागे अर्थातच संघ "परिवारा'चा दबाव आहे. ज्या काही पुस्तक विक्रेत्यांनी प्रवीण महाजनांचे हे पुस्तक ठेवण्याची "हिंमत' केली आहे तिथे "भाजपा' कार्यकर्त्यांना पाठवून "माझा अल्बम'च्या असतील तेवढ्या प्रती विकत घेऊन नष्ट केल्या जात आहेत. हे पुस्तक छापण्याची हिंमत महाराष्ट्रातील एकाही धंदेवाईक प्रकाशकाने न दाखवल्यामुळे प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.या पुस्तकात स्वर्गीय खा.प्रमोद महाजन आणि विद्यमान खा.गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रवीण महाजन यांनी फार गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यातील एक प्रकरण दै.लोकसत्तामध्ये प्रकाशित झाले तेव्हा खा.गोपीनाथ मुंडे, रेखा महाजन, पूनम महाजन यांनी 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा प्रवीण महाजन यांच्यावर ठोकण्याची घोषणा केली होती. पण अब्रुनुकसानीचा खटला महाजन-मुंडे कुटुंबावरच "बुमरॅंग' होईल अशा भितीने की काय कोण जाणे पण मुंडे-महाजन परिवाराने प्रत्यक्षात असा अब्रूनुकसानीचा खटला प्रवीण महाजनांवर भरल्याचे दिसले नाही. आताही "माझा अल्बम' हे पुस्तक प्रकाशित होऊन महिना लोटला तरी त्यावर अब्रुनुकसानीचा खटला मुंडे-महाजनांनी भरल्याची बातमी आमच्या वाचनात आलेली नाही.वास्तविक आगामी विधानसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील सूत्रे खा.गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आहेत म्हटल्यावर त्यांनी सर्वप्रथम मुंडे-महाजन परिवारावरील गंभीर आरोपांचे सार्वजनिक व्यासपीठावरून शंका निरसन करायला हवे होते. महाराष्ट्रात "भाजपा' म्हणजे पूर्वी "प्रमोद महाजन' अशी प्रतिमा होती. आज खा.गोपीनाथ मुंडे हाच महाराष्ट्र "भाजपा'चा चेहरा आहे. हा "चेहरा' जर डागाळलेला राहिला तर महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये भाजपा आणि पर्यायाने शिवसेनेच्याही भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. याकरीता शिवसेना नेत्यांनीही खा.गोपीनाथ मुंडे यांच्यावर दबाव निर्माण करून प्रवीण महाजन यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणे खा.मुंडे यांना भाग पाडले पाहिजे.खा.गोपीनाथ मुंडे आणि रेखा-पूनम महाजन परिवारासाठी तर "माझा अल्बम' पुस्तकातील प्रवीण महाजन यांच्या प्रत्येक विधानाचा त्यांच्या बाजूने जाहीर खुलासा करण्याची गरज आहे. अब्रुनुकसानीचा दावा प्रवीण-सारंगी या लेखक-प्रकाशक दांपत्यावर करायचा किंवा नाही हा मुंडे-महाजन परिवाराचा खाजगी प्रश्र्न असला, तरी प्रवीण महाजनांनी "माझा अल्बम' या पुस्तकात केलेल्या प्रत्येक आरोपयुक्त विधानाचा सार्वजनिक व्यासपीठावरून खुलासा करणे ही मुंडे-महाजन परिवाराची जबाबदारी आहे, यात शंका नाही. मुंडे-महाजन परिवार महाराष्ट्रातील पवार-चव्हाण-मोहिते-पाटील-पाटील अशा राजकीय घराण्यांपैकी एक आहे. आम्ही प्रवीण महाजनांच्या आरोपांची दखलच घेऊ-महत्त्व देऊ इच्छित नाही असे मुंडे-महाजन यांनी म्हणणे ही पळवाट आहे. महाराष्ट्रातील जनतेला खा.गोपीनाथ मुंडे यांच्याकडून प्रवीण महाजनांच्या प्रत्येक विधानाचा सविस्तर आणि संपूर्ण शंका निरसन करणारा खुलासा हवा आहे. रेखा आणि पूनम महाजनांनीदेखील मुंडे यांच्या पत्रकार परिषदेत येऊन आपल्या विषयी प्रवीण महाजनांनी केलेल्या आरोपांचा इन्कार किंवा पुराव्यांनिशी खुलासाही करायला हवा. याला पर्याय नाही. महाराष्ट्राला मुंडे-महाजनांकडून प्रवीण महाजनांच्या ज्या विधानांसंदर्भात खुलासा हवा आहे ती आरोपवजा विधाने अशी : ("माझा अल्बम' या प्रवीण महाजन लिखित आणि सारंगी महाजन प्रकाशित पुस्तकातील "आरोपपत्र' म्हणता येईल अशा मुंडे-महाजन परिवार विषयक विधानांची सूची पुढे दिली आहे. सोबत ते विधान असलेला पृष्ठक्रमांक दिला आहे.)प्रवीण महाजन यांची मुंडे-महाजन परिवारावरील आरोपपत्र वजा विधाने : * पृष्ठ क्रमांक 5 : बड्या उद्योगपतींकडून कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्याची हातोटी असलेला प्रमोद, कधी वाजपेयींच्या तर कधी अडवाणींच्या विश्र्वासातला म्हणून ओळखला जाणारा प्रमोद, पक्षाचा आधारस्तंभ होता हे खरेच. पण हे त्याचे बाह्यरूप होते. पत्रकारांना तेच रुप माहित होते. दिल्लीच्या आणि काही मुंबईच्या पत्रकारांना प्रमोदची पंतप्रधान व्हायची महत्त्वाकांक्षा ठाऊक होती. त्याचप्रमाणे प्रमोदच्या चारित्र्याविषयी संघ परिवारात असलेल्या गंभीर तक्रारीही पत्रकारांच्या कानावर होत्या. पैसे, मैत्रिणी, सत्तेची त्याला चढू लागलेली धुंदी पत्रकारांच्या कानावर येत असे ती भाजपाच्याच अनेक नेत्यांकडून वा या भानगडींना सांभाळून घेणाऱ्या कार्यकर्त्यांकडून. प्रमोदची पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षकचेरीतील कर्मचाऱ्यांमध्ये एक दहशत होती. कोणताही कार्यकर्ता किंवा कर्मचारी केव्हाही त्या पदावरून हटवला जाऊ शकतो आणि प्रमोद शब्दश: देशोधडीला लावू शकतो. अशी ताकद त्याच्याकडे होती हे त्यानेच हुशारीने पसरवले होते.पृष्ठ क्र.5 : अनेक पत्रकारांचे, अगदी वार्ताहरांपासून संपादकांपर्यंत आणि तरुण देखण्या स्मार्ट महिला पत्रकारांपासून उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांपर्यंत प्रमोदने स्वत:चे असे एकवर्तुळ निर्माण केले होते. त्या वर्तुळाचा दबाव भाजपाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांवर होता. त्या दबावामुळेच प्रमोदची अरेरावी, त्याच्या बेबंद बाहेरख्यालीपणा खपून जात असे. प्रमोद स्वत: वारंवार परदेश दौरे करीत असे. भाजपात प्रमोद परदेश दौऱ्यात काय करतो हे एक गूढच असे. या दौऱ्यांमध्ये त्याच्या बायकोऐवजी दुसरीच कुणी तरुणी गेल्याची कुजबुज पक्षात चाले. हळूहळू परदेशातच नव्हे तर इथल्याच पंचतारांकित हॉटेलात, 1201 पूर्णा या वरळीतील फ्लॅटमध्येही फॅशनेबल श्रीमंत मैत्रिणींचा वावर वाढल्याचे बोलले जाऊ लागले.पृष्ठ क्र.6 : प्रमोदचे मंत्रीपद जायला जी अनेक कारणे होती त्यात हा बाहेरख्यालीपणा हेही एक कारण होते.पृष्ठ क्र.7 : जोपर्यंत आपण पक्षाला निधी पुरवतो आणि शरद पवार, जयललिता, बाळासाहेब ठाकरे यांचा "भाजपा'शी संवाद घडवून आणतो तोवर आपल्या व्यक्तिगत चारित्र्याची कुणी चौकशीही करू नये असे प्रमोद जाहीरपणे सांगत असे.पृष्ठ क्र.8 : पुढेपुढे रेखावहिनींकडूनही वाजपेयी-अडवाणी-मुरली मनोहर जोशींपर्यंत प्रमोदच्या बदफैलीपणाच्या तक्रारी जाऊ लागल्या. जो वेगाने वर जातो, तो तितक्याच वेगाने खाली येतो तसे प्रमोदचे होऊ लागले.पृष्ठ क्र.16 : माझ्या आईवडिलांच्या वारंवार होणाऱ्या कडाक्याच्या भांडणांचे मूळ बहुधा प्रमोदच्या वागण्यातच असे.पृष्ठ क्र.17 : प्रमोदच्या टेन्शनमुळेच झालेल्या आईवडिलांच्या भांडणातून वडिलांचा मृत्यू झाला.पृष्ठ क्र. 23 : प्रमोदला तसा मनातून कोणाविषयीही आदर नव्हता. संघाबद्दलचे त्याचे विचार धक्का देणारे होते. तो मला म्हणाला होता,"जसे गणपती वर्षातून एकदा दहा दिवस येतात तसाच संघाचा वापर फक्त निवडणुकांपुरताच करायचा असतो.' प्रमोद हा "फिक्सर' "डबल डिलर' कारस्थानी, विधी निषेधशून्य आणि नव्या राजकारण्यांमधील सर्वात यशस्वी राजकारणी होता. अमर सिंगांप्रमाणे!पृष्ठ क्र.24 : 1996 च्या सुमारास गोपीनाथ मुंडे यांच्या बरखा प्रकरणाचा गाजावाजा मुंड्यांना शह देऊन काबूत ठेवण्याकरता प्रमोदनेच केला.पृष्ठ क्र. 24 : निवडणुका म्हणजे निधी संकलन. त्या पैशातूनच तो ह्याचे खाजगी शौक पुरवीत असे. त्याने पक्षाकडे कधीही सर्व सोर्सेसची माहिती दिली नाही आणि तशी ती कधी द्यायची नसते हे तो मला आवर्जून सांगत असे.पृष्ठ क्र.25 : रेखावहिनींना प्रमोदपासून घटस्फोट हवा होता.पृष्ठ क्र.25 : गोपीनाथ मुंडे यांची पत्नी बिन्नी हिच्या नावावरील वरळीच्या 1201 पूर्णा या फ्लॅटचा वापर प्रमोद भानगडींसाठी करीत असे.पृष्ठ क्र.25 : प्रमोदची मजल साक्षात आईवर हात उगारण्यापर्यंत गेली होती.पृष्ठ क्र.26 : ज्या श्र्वेता तिवारीच्या प्रमोदसोबतच्या स्वैराचारी वागण्याबद्दल त्याचा मुलगा राहुलने माझ्याकडे तक्रार केली होती, त्याच श्र्वेता तिवारीशी राहुलने पुढे लग्न केले. (आणि नंतर घटस्फोटही घेतला.)पृष्ठ क्र.27 : प्रेम आणि व्याभिचार यात प्रमोदने फरक केला नाही.पृष्ठ क्र.27 : सुखदा इमारतीत दोन फ्लॅट असतानाही प्रमोद पूर्णा इमारतीत स्वतंत्र फ्लॅटमध्ये भानगडी करण्याकरताच राहत होता.पृष्ठ क्र.27 : सर्वांनी एकत्र रहायला पाहिजे असा आग्रह स्वत:च्या लग्नानंतर धरणारा प्रमोद स्वत: मात्र कुटुंब "सुखदा'मध्ये रहात असताना "पूर्णा'मध्ये एकटा राहत होता.पृष्ठ क्र.28 : 2004 च्या विधानसभा निवडणुकीत झालेले कर्ज फेडण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी राज्यसभेची भाजपाच्या कोट्यातील महाराष्ट्रातील एक जागा उद्योगपतीला विकण्याचा घाट घातला होता. प्रमोद महाजनांना मुंड्यांचे पक्ष अतिलाड करतो, असा राग होता.पृष्ठ क्र.29 : प्रमोदच्या भानगडींमुळे नाराज पक्षश्रेष्ठी मला छळतात असे संतापून गोपीनाथ मुंडे म्हणत.पृष्ठ क्र. 32 : निवडणुकांपेक्षा पक्षाची अधिवेशने भरवणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते असे प्रमोद म्हणे.पृष्ठ क्र. 33 : आणीबाणीत घरात लपून बसलेला प्रमोद महाजन घरातच कागद घेऊन हगायला बसत असे, आणि मी ती घाण साफ करायचो.पृष्ठ क्र.35 : 1995 मध्ये शिवसेनेला घाबरवून मुंड्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळवून दिले.पृष्ठ क्र.38 : प्रमोदला मध्यमवर्गीय संघवाले आवडत नसत. त्याला "सिलेब्रेटी' आवडत असत.पृष्ठ क्र.41 : प्रमोदचे अलकनंदा प्रकरण बाहेर आले तेव्हा मुंड्यांचेही असेच प्रकरण असल्याचे समर्थन प्रमोदने केले.पृष्ठ क्र.44 : प्रमोदला स्वत:लाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्याने नाईलाजाने मुंड्यांना उपमुख्यमंत्री केले.पृष्ठ क्र.45 : प्रमोदला त्याच्यावर अवलंबून नसलेल्या माणसांचा तिटकारा होता.पृष्ठ क्र.45 : लेटलतिफ मुंड्यांचा तो जाणूनबुजून अपमान करीत असे.पृष्ठ क्र.48 : प्रमोदचा पी.ए.विवेक याचा मृत्यू रहस्यमय होता पण ते गूढ उकलण्याचा प्रयत्न केला गेला नाही.