Saturday, July 25, 2009

आरे गवळीवाड्यातील "कालीया'मर्दन

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
आरे गवळीवाड्यातील "कालीया'मर्दन
पत्रकारीतेत ज्यांना आम्ही आदर्श, दीपस्तंभ, मराठी पत्रकारीतेचे महागुरू मानतो ते आहेत "मराठा' दैनिकाचे संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आचार्य अत्रे यांनी "मराठा' दैनिकाचे संपादन करीत असतानाच 1957 ते 1960 या काळात संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीचे नेतृत्व केले. संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे त्यांनी निवडणूकदेखील लढवली. मुंबईतल्या साम्यवादी आणि समाजवादी कामगार चळवळीत सक्रिय सहभागी होत आचार्य अत्रे यांनी "मराठा' हे मराठी कामगारांच्या सुखदु:खांच्या अविष्काराचे माध्यम आणि आंदोलनांचे मुखपत्र बनवले. आचार्य अत्रे यांचा सक्रिय संपादकाचा वारसा चालविणारे मराठी पत्रकारीतेतील उत्तुंग "टॉवर' म्हणजे "नवाकाळ'कार निळूभाऊ खाडीलकर. "नवाकाळ'चे संपादन करीत असतानाच त्यांनी "प्रॅक्टीकल सोशॅलिझम फ्रंट' ही संघटना काढली. गिरणी कामगारांच्या प्रश्र्नावर निळूभाऊ थेट रस्त्यावर उतरले. आम्ही आचार्य अत्रे आणि गुरुवर्य निळूभाऊ खाडीलकर या दोन आदर्श संपादकांनी चालविलेल्या व्रताचा निष्ठेने अंगीकार केला असल्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्र्नांवर थेट रस्त्यावर उतरून,"पब्लिक'च्या खांद्याला खांदा भिडवून आंदोलनात सहभागी होत आहोत. मेट्रो रेल्वेचा प्रश्र्न, 11 वीचा ऑनलाईन ऍडमिशनचा प्रश्र्न याच भूमिकेतून आम्ही हाताळले.
दैनिक मुंबई मित्र आणि दैनिक वृत्तमित्रच्या माध्यमातून आम्ही समाजातील अनेक अन्यायग्रस्तांची दुखणी वेशीवर टांगत असतो. व्यथा मांडत असतो. असंतोषाला वाचा फोडत असतो. प्रश्र्न सोडविण्याचे काम ज्या शासकीय-प्रशासकीय यंत्रणांचे आहे त्यांच्यावर लोकमताचा दबाव निर्माण करणे हे वृत्तपत्रांचे काम आहे. लोकमत जागृत करणे, संघटित करणे आणि त्यांच्या सामूहिक शक्तीच्या बळावर प्रश्र्न सोडवून घेणे यात संपादकाने पुढाकार घ्यायला हवा असे आमचे मत आहे. त्यामुळे "मुंबई मित्र'च्या कार्यालयात रोज साऱ्या मुंबईतून लोक येत असतात. त्यांच्या समस्या सांगत असतात. दाद-फिर्याद मांडत असतात. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेतो. जिथे बातमी किंवा अग्रलेख देऊन प्रश्र्न सुटेल असे वाटते तिथे ते करतो अन्यथा आंदोलन पुकारतो.
गोरेगावच्या आरे कॉलनीतील कर्मचारी, रहिवासी जेव्हा आम्हाला भेटले तेव्हा त्यांनी कथन केलेली आरे डेअरीच्या वाताहतीची "दास्तान' ऐकून आम्हाला सखेद आश्र्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्र दु:शासनाने शासकीय दूध योजनेचा गळा घोटण्याचे जे कारस्थान रचले आहे ते भयानक आहे. महाराष्ट्र शासनाला आरे डेअरी बंद पाडायची आहे. नुसती डेअरीच बंद करायची नाही तर शासकीय दूध व्यवस्था बंद करून या क्षेत्रात खाजगी उत्पादक आणि वितरकांना रान मोकळे करायचे आहे. शासकीय दुग्धव्यवसाय खात्याकडे असलेले हजारो एकरांचे भूखंड खाजगी बिल्डर, उद्योगपती, स्पेशल झोनचे प्रवर्तक यांच्या घशात घालण्याचा डाव महाराष्ट्र शासनाने रचला आहे. सर्वसामान्य दूध उत्पादकाला रास्त भाव देणारी आणि गोरगरीब मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या भावात दूध देणारी ही शासकीय योजना जर महाराष्ट्र सरकारने आपणहून बंद केली तर टीका होईल हे ठाऊक आहे. त्यामुळे शासनाने ही शेतकरी दूध उत्पादकाचे शोषण टाळणारी आणि ग्राहकाला शुद्ध कसदार दूध रास्त भावात देणारी योजना स्वत:हून बंद केली नाही तर तोट्यात जाऊन बंद पडली असा कांगावा करता यावा हा महाराष्ट्र शासनाचा डाव आहे.
आरे दूध डेअरीत महाराष्ट्र शासनातील "विषारी कालीयां'नी दूधात विषाचे गरळ मिसळण्याचा उद्योग कसा चालवला आहे याचा पर्दाफाश आम्ही करावा असा आग्रह आम्हाला आरे डेअरीतील गोरेगाव युनिटच्या कर्मचाऱ्यांनी केला. त्यांनी दिलेल्या माहितीवरून हे प्रकरण फार गंभीर आहे हे आमच्या लक्षात आले. आरे डेअरीच्या फक्त गोरेगाव युनिटचा हा प्रश्र्न नसून कुर्ला, वरळी अशा सर्वच डेऱ्या बंद करण्याचा कुटील डाव उघडकीस आणण्याची गरज आमच्या लक्षात आली. शासकीय दूधयोजना सध्या मुडदूस झालेल्या अवस्थेत आहे ही वस्तुस्थिती आहे पण एकेकाळी बाळसेदार असलेल्या या "बाळा'ची अशी कुपोषित अवस्था कोणी केली? ती करणारे लबाड लोक "आरे'च्या व्यवस्थापनात आहेत. ज्या गैरप्रकार आणि गैरव्यवहारांमुळे एकूणच दुग्धविकास खात्याची वाट लागली ते "शासकीय बाजीराव' मंत्रालयात आणि कार्यालयातच आहेत. ज्या दुग्ध सम्राटांनी शासकीय दूध योजनेचे लोणी एकेकाळी मटकावले आणि आता पाणी ओतून मोकळे झाले ते राजकीय नेतेच आज मंत्री, आमदार म्हणून सत्तेत आहेत. दुग्धविकास खात्याची वाट बाहेरून कुणी येऊन लावलेली नाही ती आतल्या आणि आपल्याच लोकांनी लावली.
जेव्हा दुधाला भाव बाहेर मिळत नाही तेव्हा दबाव आणून आपल्या खाजगी किंवा सहकारी दूध डेऱ्यांचे दूध शासकीय दूध योजनेला ज्यांनी घ्यायला लावले तिच मंडळी आता बाहेर दुधाला चांगला भाव मिळतो आहे म्हटल्यावर शासकीय दूध योजनेला करारानुसार दूध देणे कंपलसरी असूनही दूध द्यायला तयार नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या बड्या नेत्यांच्या दूध डेअऱ्यांनी थेंबभर देखील दूध शासकीय दूध योजनेला दिले नाही आणि चढत्या भावाने बाहेर विकले त्यांना कसलाही जाब महाराष्ट्र शासनाने किंवा दुग्धविकास खात्याने विचारलेला नाही. कसा विचारणार? कारण ज्यांनी दुग्धविकासखात्याचा करार मोडला त्या डेअऱ्यांचे गॉडफादर हर्षवर्धन पाटील, अजितदादा पवार असे मातब्बर मंत्रीच आहेत. महाराष्ट्रात सध्या खाजगी आणि सहकारी दूध उत्पादकांनी दूध आणि दूधापासून बनविलेल्या पदार्थांचे मार्केट काबीज केले आहे. त्यांची गुजरातमधल्या "अमूल'सारख्या ब्रॅंडशी जीवघेणी स्पर्धा चालू आहे. गोकूळ, वारणा, महानंद अशा डझनभर "दूध'वाल्यांना "आरे'चे स्वस्त आणि मस्त, ताजे आणि निर्भेळ दूध स्पर्धेतून बाद व्हायला हवे आहे. त्यासाठी आरे डेअरीचा गळा घोटण्याचे कारस्थान चालू आहे.
शासकीय दूध योजना बदनाम करण्याच्या कटाचा एक भाग म्हणजे डेअरीला दूध पुरवठा पुरेसा करायचा नाही. त्यामुळे विविध केंद्रांवर दुधाचा तुटवडा निर्माण होतो. अनियमीत आणि अपुऱ्या दूध पुरवठ्यामुळे ग्राहक तुटतो. तो खाजगी दूध डेऱ्यांकडे वळतो. मग दूधजन्य पदार्थांबाबतही अशीच बोंब झाली की तेही मार्केट नामशेष होते. एकदा ग्राहक दुसऱ्या दूध आणि दूधजन्य पदार्थांकडे वळला की मग तो पुन्हा "आरे'कडे येत नाही आणि मग दूध आणि माल खपत नाही म्हणून दिवाळे जाहीर करायला "आरे'चे व्यवस्थापन आणि मंत्री मोकळे. या सर्व कारस्थानातला अत्यंत हीन आणि नीच प्रकार म्हणजे गोरेगावच्या आरे प्रकल्पाची दुग्धविकास खात्याशी संगनमत करून मुंबई महापालिकेने केलेली नाकेबंदी. गोरेगावच्या आरे प्रकल्प आणि वसाहतीचे पाणी तोडून महापालिकेने या कटातली आपली सह-खलनायकाची भूमिका पार पाडली. "आरे' व्यवस्थापनाने गोरेगाव युनिटचे दूध तोडून "डेअरी'ची विल्हेवाट लावण्याचा घाट घातला. गोरेगाव डेअरीचे कर्मचारी-कामगार आम्हाला भेटले तेव्हा या सर्व प्रकाराने व्यथित आणि संतप्त झालेले होते. आम्ही त्यांना "शब्द' दिला आणि त्याप्रमाणे "मुंबई मित्र'ने तोफ डागली.
"मुंबई मित्र'च्या भडीमारामुळे आरे व्यवस्थापन हादरले. मंत्रालयात भूकंप झाला. महापालिकेत सुरुंग फुटले. "मुंबई मित्र'च्या दणक्याने आरे डेअरीचा आणि कर्मचारी वसाहतीचा गोरेगाव प्रकल्पासाठीचा पाणी पुरवठा पुन्हा सुरू झाला. गोरेगाव प्रकल्पावरील दुधाचा स्त्रोत पुन्हा पूर्ववत केला गेला. गोरेगाव आरे वसाहतीमधील कामगार कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने आमचा भव्य सत्कार केला. सत्काराच्या निमित्ताने कामगार कर्मचाऱ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यांच्यामुळे आम्ही भारावून गेलो. आमची जबाबदारी यामुळे अधिक वाढली आहे. "आरे'च्या केवळ गोरेगावातीलच नव्हे तर वरळी, कुर्ल्यातील कामगार-कर्मचाऱ्यांनीही आम्हाला सोबत येण्याची विनंती केली आहे. आम्ही ती मान्य केली आहे. आम्ही "आरे' गवळीवाड्यात एक कालीया मर्दन नुकतेच केले आहे. आता दुग्धविकास खात्यातील कंसमामांचे दमन करण्याचेही कार्य सर्वांनी मिळून करायचे आहे. आम्ही सिद्ध आहोत. "आरे'च्या कर्मचाऱ्यांनीही सज्ज रहावे!

Friday, July 24, 2009

खाकी वर्दीतील "माणूस'"पालक'"शिक्षक'विश्र्वासराव नांगरे पाटील "देशरक्षक'!

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
खाकी वर्दीतील "माणूस'"पालक'"शिक्षक'विश्र्वासराव नांगरे पाटील "देशरक्षक'!
दोन दिवसांपूर्वी आम्ही ऑन लाईन ऍडमिशन्सच्या प्रश्र्नावर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मोर्चा घेऊन गेलो होतो. महाराष्ट्र शासनाने ज्या पध्दतीने 11 वीच्या ऑनलाईन ऍडमिशन्सचा विषय हाताळला आहे, त्यामुळे विद्यार्थी प्रक्षुब्ध आहेत. पालक संतप्त आहेत.आम्ही चार्नीरोडच्या शिक्षण खात्याच्या कार्यालयापाशी समूहाने पोहचलो तेव्हा वातावरण तापलेले होते. काहीही घडू शकेल अशी स्थिती होती. नेहमीप्रमाणे विद्यार्थी-पालक भेटायला येत आहेत म्हटल्यावर महत्त्वाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी पळ काढला होता. परिस्थिती स्फोटक आणि नाजुक, संवेदनाशील होती. कोणतीही चळवळ एक लढाई समजून त्यात उतरायचे हा आमचा स्वभाव आहे. आमजनतेच्या सोबत त्यांच्या प्रश्नांसाठी वेळ आली तर प्राणांचीही पर्वा करायची नाही हा आमचा बाणा आहे."तन,मन,धन, प्राण, क्षण,असेे सर्व काही समर्पित करून युध्दात उतरणाऱ्या सेनापतीवरच त्याचे सैन्य विश्र्वास ठेवून आपल्याही प्राणांची बाजी लावते' हे महात्मा गांधींचे वचन आम्ही मार्गदर्शक सूत्र मानतो. आज मराठा महासंघ, अभिजीत राणे फाऊंडेशन आणि मुंबई मित्र-वृत्त मित्र वृत्तपत्र समूह यांच्याकडे मुंबईतला ऑन लाईन 11वी ऍडमिशन विरोधातील चळवळीचे नेतृत्व आले आहे.कारण आमच्या बांधीलकीची विद्यार्थी पालकांना खात्री आहे. इतर राजकीय नेते 11 वीच्या पालक-विद्यार्थी यांच्याऐवजी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना, ज्यांचा 11 वीशी तर सोडाच पण महाविद्यालयांशी, शिक्षणाशी देखील काही संबंध नाही, घेऊन "स्टंट' आणि "शोबाजी' करत असताना हजारो विद्यार्थी- पालक आमचे नेतृत्व स्वीकारून झुंजीत उतरतात हा विश्वास जपण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.
प्रक्षुब्ध विद्यार्थी आणि संतप्त पालक यांचा एवढा मोठा जमाव घेऊन आम्ही शिक्षण खात्याच्या इमारतीवर "बेधडक देधडक' पोहोचलो आणि तडक आणि कडक कारवाईसाठी शंखनाद केला. साधारणत: जमावाने असे उग्ररूप धारण केले की पोलिसांची एकच भूमिका असते लाठीमार, अश्रुधूर करून जमावाला बेदम मारझोड करीत पिटाळून लावायचे. मोर्चातील नेत्यांना अटक करून "मॉब' ला"लिडरलेस' करायचे. पुन्हा असा मोर्चा काढायची हिंमतच होणार नाही अशी दहशत पोलिसी बळावर निर्माण करायची. पण यावेळी आम्हाला आणि आमच्या सहकाऱ्यांना अगदी वेगळा अनुभव आला. आजवर आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. मेट्रो रेल्वे सारख्या उग्र, गंभीर आंदोलनामुळे तर आमच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता. एस.आर.ए. स्कीममध्ये भाडेकरूंची फसवणुक-शोषण-अन्याय करणाऱ्या अनेक मस्तवाल बिल्डर्सचा माज आम्ही आमच्या मुंबई मित्र-वृत्तमित्र या दोन तोफातून उतरवल्यामुळे पोलिसांनी आम्हाला विशेष संरक्षण दिले आहे.
संघर्ष आम्हाला नवीन नाही, "आल अंगावर तर घेऊ शिंगावर' ही आमची जीवनशैली आहे. आमचे अनुयायी जेंव्हा आमची ढाल होऊन पुढे उभे राहतात तेव्हा नेत्याने तलवार होऊन वार करायचे असतात हे सूत्र आम्ही मानतो. त्यामुळे शिक्षण खात्यावरच्या मोर्चात काहीही घडू शकते याची मानसिक तयारी आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी केली होती. प्रसंगी जेेलमध्ये देखील जाण्याची तयारी होती. 11 वीच्या ऑनलाईन ऍडमिशनमधील गोंधळामुळे 10-15 लाख विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे आम्ही चिंताक्रांत होतो. व्यथित होतो. संतप्त होता. तप्त होतो. विद्यार्थी-पालकही काय व्हायचे ते होईल पण आज धडा शिकवून इथून निघू अशा तयारीत होते. ज्येष्ठ वरिष्ठ अधिकारी तोंड लपवून पळून गेल्याचे कळल्यानंतर तर हा उद्रक अनावर झाला होता. शिवसेना स्टाईल,मनसे स्टाईल या दोन स्टाईल सध्या आंदोलनात प्रसिध्द आहेत. आम्ही "अभिजीत राणे स्टाईल' ही तिसरी आंदोलनाची स्टाईल दाखवून देण्याच्या तयारीत होतो.
पण एक चमत्कार घडला. अघटीत घडले. अनपेक्षित घडले. सुखद आश्चर्याचा धक्का बसला. मुंबईचे नामवंत वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्र्वासराव नांगरे पाटील यांनी "पोलीस' म्हणून नव्हे तर एक "माणूस' ही परिस्थिती हाताळली. विश्र्वासराव नांगरे पाटील हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त पोलीस अधिकारी म्हणून उपस्थित असले तरी त्यांच्यामधला "पालक' जागा होता. त्यांना कळत होते की या हजारो मुलांवर अन्याय झाला आहे. त्यांना ठाऊक होते की 11 वी ऑनलाईन ऍडमिशनच्या घोळामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. त्यांना विद्यार्थ्यांचा संताप समजून येत होता. राग साहजिक वाटत होता. विद्यार्थी-पालकांमधील हा असंतोष कारवाईचे तेल ओतून अधिक भडकण्याची ही वेळ नाही हे ते ओळखून होते. त्यांची सहानुभूती विद्यार्थी पालकांसोबत होती. "साप भी मरे और लाठी भी-ना तुटे' असा मार्ग विश्वासरावांनी शोधून काढला आणि विद्यार्थी-पालकांना न्याय दिला.
मराठा महासंघ, अभिजीत राणे युथ फोऊंडेशन, मुंबई मित्र- वृत्तमित्र यांच्यावतीने महाराष्ट्रातील 10 लाख 11 वीच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणारे शिष्टमंडळ शिक्षण खात्याचे अधिकारी एन.बी. चव्हाण यांना भेटले.शिक्षण खात्याच्या चुकांचे माप या शिष्टमंडळाने त्यांच्या पदरात घातले. विद्याथ्यार्र्ंच्या होणाऱ्या अतोनात नुकसानीची तपशीलवार उदाहरणे आणि पुराव्यांसहित माहिती दिली. आम्ही दिलेले तपशील इतके बालके , निर्विवाह होते की चूक कबूल करण्यावाचून अधिकाऱ्यांना गत्यंतरच नव्हते. अर्थात चुका कबूल करून घेण्यावर आमचे समाधान होणे शक्यच नव्हते. आम्हाला ऑनलाईन ऍडमिशनला थेट महाविद्यालयीन प्रवेशाचा पर्याय मान्य करून घ्यायचा होता. पहिली ऑनलाईन यादी प्रसिध्द झाल्यावरही 70 हजार मुले त्यानुसार मिळालेले प्रवेश स्वीकारत नाहीत यावरून ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे फसली आहेे हे स्पष्ट होत नाही का? या आमच्या खड्या प्रश्र्नावर शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते.
ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी प्रसिध्द झाल्यावर आणि त्यानुसार हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे नाकारल्यावर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांच्य प्रवेशाच्या हमीचे काय करणार? याही प्रश्र्नाला त्या अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते. 10 वीच्या विद्यार्थ्यांना ए.टी.के.टी दिल्यामुळे आणखी जे दीड-दोन लाख विद्यार्थी प्रवेशासाठी येणार त्यांना प्रवेश कुठे आणि कसा देणार? याही प्रश्र्नावर अधिकारी निरुत्तर झाले. अखेर आम्ही शिक्षण खात्याला "जुलाब इशारा' दिला. 72 तासात ऑनलाईन ऍडमिशनचा गोंधळ संपुष्टात आणून सर्व अगदी एकूण एक 11 वीत प्रवेश घेेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला जर हव्या त्या आभ्यसक्रमात आणि सोयीस्कर कॉलेजात प्रवेश मिळाला नाही. तर होणाऱ्या परिणामांची आणि आंदोलनांची जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि शिक्षण खात्यावर राहील असा "कडक - तडक-भडक' कारवाईचा इशारा दिला. 72 तास महाराष्ट्र शासनाला आम्ही दिले आहेत. आता विद्यार्थी-पालकांच्या सहनशक्तीचा अंत होत आला आहे.
या सर्व घटनाचक्रात आम्हाला जेष्ठ वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्र्वासराव नांगरे पाटील यांची भूमिका स्वागतार्ह आणि कार्यपध्दती गौरवास्पद वाटली. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी"वज्रादपि कठोराणी' होेऊन बाजी प्रभू देशपांड्यांच्या बाण्याने एकाकीपणाने "ताज' ची खिंड लढविण्याबद्दल जगात नाव झालेले विश्र्वासराव नांगरे पाटील यांचे एक "मृदूनि कुसुमादपि' असे समंजस, संयमी, सहकार्यशील "पालका'चे किंबहुना "शिक्षकां'चे रूप आम्हाला या निमित्ताने पहायला मिळाले. "पोलीस हा जनतेला मित्र वाटला पाहिजे' असे म्हटले जाते. विश्र्वासराव नांगरे पाटलांचा पोलीस आम्हाला पालक-शिक्षक देखील वाटला याबद्दल त्यांचे अभिनंदन करून सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थी युवक "पब्लिक' आंदोलनाबाबत अशी सौहर्दाची, सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे सुचविण्यासाठी आजच्या या अग्र लेखाचा प्रपंच आहे!

नक्षलवाद : प्रत्येक उत्तर चुकीचे ठरविणारा प्रश्र्न!

भारतात दहशतवादाची चर्चा मुख्यत: पाकिस्तान सरकारच्या आश्रयाखाली चाललेल्या मुस्लीम अतिरेक्यांच्या कारवायांबाबत होत असली तरी भारतात दहशतवादी कृत्यांचा आरंभ स्वातंत्र्य प्राप्तीपासूनच झाला. भारत-पाकिस्तान फाळणीच्या निमित्ताने उसळलेल्या दंगलीत निर्दयतेचे, क्रौर्याचे आणि धर्माधिष्ठित दहशतवादाचे भेसूर दर्शन घडले. महात्मा गांधींची हत्या हेही दहशतवादी कृत्यच होते. हैदराबाद, नक्षलबारी, बिहार, आंध्रप्रदेशात डावे अतिरेकी आणि काश्मीर, पंजाब, ईशान्येकडील राज्यात फुटीरतावादी गेली कित्येक दशके सक्रिय आहेत. जातीय, भाषिक, धार्मिक दंगली, राजकीय नेत्यांच्या हत्या, जमातींच्या बंडाळ्या, देशातून फुटून निघण्याच्या मागणीसाठी होणारी बंडखोरी हे सारे दहशतवादाचेच कमी-अधिक तीव्रतेचे अवतार आहेत. 2002 मध्ये गोध्रा कांडानंतरच्या दंगली आणि 14 मे 2002 ला जम्मूमधील कालुचाक येथील लष्करी तळावरचा हल्ला हे 26/11 च्या मुंबईवरील पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यापेक्षा भीषण होते.
पंजाबमधील दहशतवाद सध्या निवळला असला तरी काश्मीर आणि आसामसह ईशान्येकडील सर्व राज्यात तो आवाक्याबाहेर चालला आहे. नक्षलवादी चळवळीने देशातल्या 611 पैकी 200 जिल्ह्यांना ग्रासले आहे. देशातल्या हिंसाचारापैकी 88 टक्के हिंसाचार नक्षलवाद्यांमुळे घडतो आहे. सरकारची अकार्यक्षमता आणि न पाळलेली आश्र्वासने यातून नक्षलवाद फोफावतो असे डाव्या विचारवंतांचे म्हणणे असते. दारिद्रय आणि सामाजिक विषमता असलेल्या भागात नक्षलवाद्यांचे बस्तान सहजपणे बसते असे मानले जाते. काश्मिरमधील आणि अन्यत्रच्या मुस्लीम दहशतवाद्यांना पाकिस्तानची तर नक्षलवाद्यांना पूर्वीपासून चीनची आणि आता नेपाळमध्ये माओवाद्यांचे सरकार श्री प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर नेपाळची आर्थिक आणि शस्त्रास्त्राची मदत नक्षलवाद्यांना मिळते आहे. नेपाळमध्ये माओवाद्यांनी गेली 5 वर्षे, भारतात नक्षलवादी सध्या ज्यापद्धतीने दहशतवादी कारवाया करीत 200 जिल्ह्यात समांतर सरकार चालवीत आहेत, त्याच पद्धतीने कारवाया करून अखेर नेपाळवर कब्जा मिळवला. नक्षलवादी तुरुंग फोडून सहकाऱ्यांची सुटका करण्याकरिता बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, आंध्रमधील शहरात घुसल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे यापुढे फार काळ शहरेही नक्षलवादी हल्ल्यापासून मुक्त राहू शकणार नाहीत, अशी भीती आहे.
नक्षलवादी हिंसाचारासंदर्भात दोन प्रश्र्नांची चर्चा गेली अनेक वर्षे चालू आहे. या दहशतवादासंदर्भात सरकारने काय केले पाहिजे आणि काय करणे टाळले पाहिजे. एक सर्वसामान्य नागरिक म्हूणन आपल्यासारखा "आम आदमी' या दहशतवादाबद्दल काही करू शकतो का? निदान आपल्या संस्था, संघटना तरी काही करू शकतील का? "टेरेरिझम'ची आंतर राष्ट्रीय व्याख्या आहे-राजकीय हेतू करिता, निशस्त्र आणि प्रतिकार करू न शकणाऱ्या लोकांवर केलेला सशस्त्र, सुसंघटित हल्ला! दहशतवाद्यांच्या हिंसाचाराचा प्रतिकार करण्याचा एकच मार्ग अशा हल्ल्याने भांबावलेली आणि लोकमताच्या कारवाईसाठीच्या रट्याने दबलेली सरकारे अवलंबतात आणि तो म्हणजे अधिक सुसंघटित लष्करी आणि पोलिसी बळाचा वापर करून केलेला हिंसाचार! जगभर यावर विचारमंथन चालू आहे. 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत "दहशतवाद' या विषयावर शेकडो पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. "व्हॉईसेस ऑफ टेरर' हे त्यातले सर्वोत्तम मानले जाते. या सर्व चर्चेचा सूर असा आहे की जे दहशतवादी कायद्याविरुद्ध जाऊन करतात तेच सर्व सरकारे कायद्याच्या आधारे करू बघतात. दोघांचा उद्देश भीती, दहशत निर्माण करणे हाच असतो. दोन्ही रक्तरंजीत असतात. दोघेही आपण समाजाचे दुसऱ्याच्या अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी शस्त्रास्त्राचा वापर करीत असल्याचा दावा करतात. सरकार आणि अतिरेकी एकमेकाचा नैतिक दावा फेटाळून लावत आपली भूमिका न्यायोचित असल्याचे ठासून सांगतात.
दोघांमध्ये आणखी एक साम्य आहे ते म्हणजे सरकार जसे दहशतवादी संघटनेचे समांतर अस्तित्व मान्य करीत नाही, त्याचप्रमाणे एक दहशतवादी संघटना दुसऱ्या दहशतवादी संघटनेचे समांतर अस्तित्व मान्य करीत नाही. सत्ता उलथवून लावण्यात यशस्वी झालेले दहशतवादी त्यांच्या संघटनेचे सरकार देशात आले की क्रांतीकारक आणि हुतात्मा, शहीद ठरतात आणि आधीच्या सरकारचे प्रतिनिधी म्हणून लढणारे लष्कर, पोलीस गद्दार ठरून शिक्षापात्र होतात. प्रत्येक यशस्वी स्वातंत्र्यलढ्यानंतर त्या देशातील दहशतवादी हे आधीचे "व्हिलन' नंतरचे "हिरो' ठरतात हा जगभरचा इतिहास असल्याने दहशतवाद्यांचे अंतिम स्वप्न आधी समांतर आणि नंतर अधिकृत सरकारची स्थापना हेच असते. देशाविरुद्ध युद्ध पुकारून सशस्त्र लढा देणारे अतिरेकी दहशतवादी स्वत:ला क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक म्हणवून घेत जनाधार निर्माण करण्यासाठी सातत्याने शोषित, पीडित, दलित, आदिवासी समाजात प्रस्थापित सरकारविरुद्ध असंतोष पेटवीत असतात आणि या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आलेल्या सरकारी फौजांचा अत्याचार, दंडुकेशाही याला हा वर्ग बळी पडतो आणि परिणामी सरकारपासून दुरावतो, दहशतवाद्यांच्या, आपल्याकडे नक्षलवाद्यांच्या जवळ जातो. सरकार आणि नक्षलवाद्यांच्या लढाईत बहुधा चिरडला जातो तो सामान्य माणूस, मग तो कधी गडचिरोलीतला आदिवासी असेल नाहीतर ईशान्येचा नागा अथवा बोडो असेल.
दहशतवादी संघटना आणि सरकारांमध्ये एक फरक आहे आणि तो म्हणजे दहशतवादी संस्था, उघडपणे हिंसक कृत्याची जबाबदारी घेतात, तर सरकारला प्रतिहिंसाचाराबाबत उघडपणे समर्थन करणे शक्य नसते. सरकारलाही अतिरेक्यांबरोबरच त्यांना मदत करणाऱ्या किंवा सरकार मदत न करता अलिप्त राहणाऱ्या सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण करायची असते पण कायदा आणि मिडियाच्या दबावामुळे या कारवाया बाहेर वाच्यता होऊ न देता करण्याकडे सरकारचा कल असतो. "हिंसाचार रोखण्यासाठी हिंसाचार' हे सर्वच सरकारांचे सूत्र असते आणि काही वेळा समाजाचीही त्याला मान्यता असते. सरकार काय करते आहे? या प्रश्र्नाचे उत्तर लोक मागत असतात आणि त्यासाठी काहीवेळा सरकारला निरर्थक आणि भलत्याच लोकांवर हिंसक कारवाई करून "वुई मीन बिझनेस' असे दाखवावे लागते.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य पोलीस असतात कारण एकदा पोलीस फोर्स "डिमॉरलाईज' झाली की त्यांच्या समांतर सरकारची सत्ता अधिक बळकट होते. पोलीस दलावर हल्ला करून नक्षलवादी अन्य राज्यात जंगलाच्या माध्यमातून काही तासात पळून जातात. पोलीस आणि निमलष्करी दल जेव्हा त्यांच्या मागावर पोचतात तेव्हा त्यांना नक्षलवादी कोण, गावकरी कोण, नक्षलवाद्यांचे समर्थक गावकरी कोण हे कळत नाही. ते सरसकट सर्वांना आरोपी संशयित समजून बडगा वापरतात. यातून मग स्थानिकांमधला असंतोष वाढतो आणि त्यांची सहानुभूती सरकारऐवजी नक्षलवाद्यांकडे वळते. पोलीस आणि निमलष्करी दलांची मजबुरी अशी आहे की त्यांच्याकडे नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचे आधी आणि नंतरही नक्षलवाद्यांबद्दल फारशी माहिती नसते. जर एखादा आदिवासी पोलिसांचा खबऱ्या आहे, असा संशय आला तर त्याला गावासमोर नक्षलवादी निर्दयपणे मारून इतरांना पोलिसांशी संधान बांधण्याची हिंमत होणार नाही, अशी व्यवस्था करतात. त्यामुळे पोलिसांकडे नक्षलवाद्यांची माहिती देणारे खबरे जवळजवळ नाहीत. गडचिरोलीला बदली म्हणजे "पनिशमेंट' मानणाऱ्या पोलीस आणि अधिकाऱ्यांचे मनोधैर्य काय लायकीचे असेल याचीही आपण कल्पना करू शकतो.
नक्षलवादी चळवळ सुरू झाली तेव्हा ती बड्या जमीनदारांच्या विरुद्ध आणि भूमिहीन शेतमजुरांच्या बाजूने असल्याचे मानले गेल्यामुळे तिला वेगळे वलय होते. पण आता नक्षलवादी टोळ्या आणि खंडणी वसूल करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या यांच्यात काही फरक राहिलेला नाही. दहशतीच्या माध्यमातून समर्थकांकडून देणग्या आणि विरोधकांकडून खंडण्या गोळा करणे हा अंमली पदार्थांच्या तस्करी खालोखाल नफा देणारा धंदा जगभर मानला जातो. भारतातले नक्षलवादी नेपाळच्या सीमेपासून थेट आंध्रपर्यंत सलग 200 जिल्ह्यात आता नेपाळमधल्या माओवाद्यांप्रमाणे समांतर सरकार स्थापन करून उद्योगपती, व्यापारी, ठेकेदार यांच्याकडून दरवर्षी 1 हजार ते 1500 कोटी रुपयांच्या खंडण्या वसूल करतात, असे सरकारी अहवाल आहेत. आज भारतीय लष्कराकडे आहेत ती सर्व शस्त्रास्त्रे, दारुगोळा नक्षलवाद्यांकडे आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांची या नक्षलवाद्यांचा मुकाबला कसा करावा याबाबत मती कुंठीत झाली आहे. नक्षलवाद्यांनी भारताविरुद्ध गनिमी युद्ध पुकारले आहे पण हे युद्ध राज्यांच्या राजधानीत नव्हे तर जंगलात चालले आहे. त्यामुळे त्याची भयावहता आपल्या लक्षात आलेली नाही, इतकेच!

मरणांत खरोखर जग जगते

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
मरणांत खरोखर जग जगते
जीवन हे एक कोडे आहे. मृत्यू हे एक रहस्य आहे. कोळ्याने विणलेल्या जाळ्यात अडकलेला कीटक जसा, सुटकेसाठी जेवढा अधिक धडपडतो, तेवढा त्या जाळ्यात अधिक गुरफटतो, तसे जीवनाचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न करणारा, अधिकच कोड्यात पडत जातो. मृत्यूचे रहस्य तर अंतराळातल्या कृष्णविवरासारखे आहे. सुरुवात कळत नाही, शेवट आढळत नाही. जीवनाची प्रीती आणि मृत्यूची भीती या हिंदोळ्यावर माणसाचे मन कायम आंदोलत असते.
10 वर्षांपूर्वी बाळ सामंत यांचं एक अद्‌भुत पुस्तक वाचलं. "मरणात खरोखर जग जगते' हे त्या पुस्तकाचं नाव! अस्वस्थ झालो. बेचैन झालो. लक्षात आलं. मरण्याची कल्पना प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा भयंकर आहे. जगण्याच्या नादात अटळ अपरिहार्य अशा आपल्याच मरण्याच्या क्षणाचे भान राहिलेले नाही. मृत्यू पाहिले होते. मृत्यूची अनेक रूपे पाहिली होती. श्वास सोडावा तितक्या सहजतेने प्राण सोडताना आजोबांना पाहिलं होतं. महापुराच्या पाण्याबरोबर वहात जाणाऱ्या माणसाने काठावर येण्यासाठी हातपाय मारीत आधार शोधीत प्राणांतिक धडपड करावी आणि अखेर पाण्याच्या लोंढ्याने त्याला भोवऱ्यात भिरकावून गिळून टाकत फरफटत घेऊन जावे तसे प्राण हिरावून काळाने ओढून नेताना पाहण्याचं दारुण दु:ख माझ्या जिवलग मित्राला अनंताला झालेल्या प्राणघातक अपघाताचे वेळी असहाय्यपणे पाहिले होते.
उंदराला मांजराने खेळवावे तसे मृत्यूने जीवघेणा खेळ करीत मारलेला प्रकाश माझ्या डोळ्यापुढे आहे. अचानक फ्यूज जाऊन अंधार पसरावा तसा गप्पा मारीत बसलेला अप्पा हार्टऍटॅकने वाक्य अर्धे सोडून जाताना पाहिला होता. अजगराने विळखा घालून हळूहळू प्रदीर्घ काळ एखाद्या हरणाला ते जिवंत असतानाच गिळत रहावे तसे कॅन्सरच्या अजगरी विळख्यात गुदमरत गेलेले अण्णासाहेब पाहिले होते.
मृत्यूची अनेक रूपे पाहताना कधीतरी आपल्याही वाट्याला यातले एक रूप घेऊन मृत्यू येणार आहे हे जाणवले नव्हते. पण बाळ सामंतांचे पुस्तक वाचले आणि मरण्याच्या जाणीवेने माझ्या जगण्याची शैली बदलली. मृत्यूचा शोध घेण्यासाठी मी जन्माच्या घटनेचा अभ्यास सुरू केला. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनिश्र्चित कालीन प्रवासाचे नाव जीवन असेल तर आपण हा प्रवास कोणत्या दृष्टीकोनातून काय भूमिका घेऊन करायचा हा एक नवाच विचार मनात पिंगा घालू लागला.
जीवन हा एक प्रवास असेल तर तो आपण केवळ रोजीरोटी देणाऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नाईलाजाने कराव्या लागणाऱ्या लोकल प्रवासासारखा करायचा? की पर्यटनासाठी मौजमजा, आनंद, सुख, समाधान शोधत प्रेक्षणीय स्थळे पाहत आणि नवनवीन अविष्कार अनुभवत करावा तसा जीवनाचा प्रवास करायचा हा ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनाचा आणि भूमिकेचा प्रश्र्न आहे. पर्यटनाऐवजी काहीजण तीर्थयात्रेच्या निमित्ताने आत्मिक, अध्यात्मिक, मन:शांतीसाठी पवित्र क्षेत्रे, पूज्य मंदिरे, साधू संत, सत्पुरुष यांची पावन दर्शने घेत प्रवास करतात तसाही काही जणांना जीवनप्रवास करावासा वाटेल.
माझ्या असं लक्षात आलं की आपल्या हातावर घड्याळ आहे, त्यामुळे आपल्याला वेळाची जाणीव कायम राहिली पण काळाचे भान त्या घड्याळाने कधी करून दिले नाही. झालेली वेळ दाखविणारी शेकडो घड्याळे भिंतीवर दिसली पण गेलेली वेळ सांगणारे घड्याळ त्यात एकही नव्हते. वाढदिवस साजरे करताना वयाची किती वर्षे झाली हे सांगणाऱ्या मेणबत्त्यांनी किती वर्षे वाया गेली त्याचा आकडा कधी दाखवला नाही. कॅलेंडर जुने झाले म्हणून बदलले, पण नव्या वर्षात नव्या कॅलेंडरला जुन्याच खिळ्यावर नव्याने टांगावे तसे मी तोच तसाच राहून फक्त वर्ष नवे म्हणून सारे नवे मानले, स्वत:ला वर्षानुसार बदलण्याऐवजी कॅलेंडरेच फक्त बदलत राहिलो.
टी.व्ही.वरच्या "कौन बनेगा करोडपती'मध्ये कार्यक्रम ऐन रंगात आलेला असताना आणि प्रश्र्नाचे उत्तर आता हॉटसिटवरला स्पर्धक सांगणार आणि करोड रुपये जिंकणार असे वाटत असताना अचानक टोल पडावा आणि "समय समाप्ती की घोषणा' व्हावी आणि प्रकाशझोतासह वलयांकित रंगमंचावर सन्नाटा पसरावा तशी मृत्यूची जाणीव बाळ सामंतांचे ते "मरणात खरोखर जग जगते' या पुस्तकाने करून दिली आणि मग काय गमावले, काय कमावले, काय सापडले, काय हरपले, काय मिळाले, काय गळाले, काय जिंकले, काय हरले, काय केले, काय करायचे राहून गेले याचा जमाखर्च करायला बसलो तर हिशेबच लागेनासा झाला. बेरीज करायला गेलो तर वजाबाकीचे आकडे छेद द्यायला लागले, गुणाकाराचे चिन्ह मांडूनही उत्तर भागाकार केल्यासारखे येऊ लागले. मनासारखे पत्ते आले नाहीत तरी डाव खेळावाच लागतो, आहे त्या पानांमधून रमी जुळवता येत नसेल तर गड्डीतून अनुकूल पत्त्यांचा शोध घेऊन रमी जुळवायचा प्रयत्न करावा लागतो, आपलं नशीब केवळ आपले पत्ते जुळण्यावर नसते तर दुसऱ्याची रमी आपल्याआधी लागण्या न लागण्यावर अवलंबून असते. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, पद हे सगळं असंच आपल्या आणि त्याहीपेक्षा दुसऱ्याच्या हातात कोणते पत्ते येतात यावर अवलंबून असतं. मग आपल्या हातात या खेळात काय असतं? पत्ते लपवून नसलेले पत्ते असल्याचा आभास निर्माण करून समोरच्याला चकवणं की असलेल्या पत्त्यांची अनपेक्षित उतारी करून प्रतिस्पर्ध्याला चुकवणं? मग जीवन हे यशस्वी कशामुळे होतं? माझ्यामुळे की दुसऱ्यामुळे? अपयशाचं कारण कोण असतो? मी किंवा दुसरा असाच कुणी? जगणं तर माझ्या हातात नाही. मरणं देखील नाही. मग जगण्या-मरण्याच्या संदर्भात माझं असं काय आहे? मी जर इतका पराधीन, परावलंबी आहे तर मग "मी-माझे-मला' याचा एवढा अहंकार कुठून आला, कसा आला, का आला. मरण्याचा क्षण "त्यांने' ठरविला मग जगण्याचा क्रम तरी माझ्या हातात आहे का?

प्रकृती आणि संस्कृती : "निसर्गधर्मा'ची महती

समाज म्हणजे काय! ज्ञात-अज्ञात, दृश्य-अदृश्य, व्यक्त-अव्यक्त अशा भावना-विचार-आचार सूत्रात सामूहिक रुपात एकमेकांशी बांधलेली पण व्यक्तिगत स्वतंत्र, स्वायत्त, स्वयंभू अस्तित्व अबाधित ठेवणारी मानवी समूह संरचना म्हणजे समाज!
समाज आणि त्यातील व्यक्ती यांचे परस्परांशी नाते कसे असते? समूहरुपात समाज म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती, व्यक्तिगत पातळीवर एक स्वतंत्र अस्तित्व टिकवून असते. बहुसंख्य व्यक्तींचे सामाजिक गुण-दुर्गुण यांच्या सामुदायिक बेरजेतून "समाजा'चे म्हणून "विशेष' व्यक्तिमत्व आकाराला येते. समाजाचा व्यक्तिंवर आणि व्यक्तिंचा समाजावर असा प्रभावाचा "टू-वे-ट्रॅफिक' सतत चालू असतो. व्यक्तींच्या घडण्या-बिघडण्यातून समाज घडतो. बिघडतो. घडणे किंवा बिघडणे कशाला म्हणायचे याचे निकष काही चिरंतन शाश्वत जीवनमूल्यांच्या आधारे निश्र्चित झालेले असतात. ही चिरंतन शाश्वत मूल्ये माणूस आणि प्राणी यांच्यातील भेद-फरक अधोरेखित करून माणसाचे "माणूसपण' कशात आहे हेच आपल्याला सांगतात. माणसाचे शरीर हे संगणकाच्या भाषेत "हार्डवेअर' तर त्याचे मन हे "सॉफ्टवेअर' आहे. "हार्डवेअर' हा "परिसरांचा परिणाम असतो तर "सॉफ्टवेअर' हे "संस्कारा'तून आकार घेत जाते. व्यक्ती आणि समूहांच्या हार्डवेअर+सॉफ्टवेअर च्या कॉंबीनेशनमधून "समाज' नावाचा "सुपर कॉम्प्युटर' कार्यरत होतो.
व्यक्तीच्या मनाचा "सॉफ्टवेअर' संस्कारातून घडतो किंवा बिघडतो म्हणजे नेमके काय-कसे होते? या प्रश्र्नाचे उत्तर काही उदाहरणांमधून आपण बघुया. माणूस जन्माला आल्यापासून डोळे, नाक, कान, त्वचा, मुख या पंचज्ञानेंद्रियांमार्फत ज्ञान म्हणजे संस्कार घेत असतो आणि त्यातून त्याची वृत्ती-प्रवृत्ती-दृष्टीकोन-अविष्कार संस्कारित होत असतो. समाज नावाच्या "सुपर कॉम्प्युटर'मध्येही व्यक्तीप्रमाणे सामूहिक स्वरुपात असे "संस्करण' होत असते. व्यक्तिंमध्ये आढळणाऱ्या वृत्ती-प्रवृत्ती-दृष्टीकोन यातील गुणदोषांचे मूळ या "सॉफ्टवेअर' घडविणाऱ्या संस्कारांमध्ये असते म्हणूनच भारतीय संस्कृतीत संस्काराला विशेष स्थान-मान-महत्त्व आहे. सोळा संस्कारांपासून सांस्कृतिक परंपरेची सुरुवात फक्त भारतातच आहे. भारतीय संास्कृतिक-सामाजिक जीवनातला प्रत्येक सोहळा-कृती-कर्म-कांड-पूजा-अर्चा हा एक संस्कार मानला आहे. विवाहालाही "विवाह संस्कार' म्हणणारा हा जगातला एकमेव देश आहे. मुंज हा संस्कारच. इतकेच नव्हे तर अंत्यविधीलाही "अंत्यसंस्कार' फक्त या भारतातच म्हणताना दिसेल. प्रत्येक मंत्र, प्रत्येक यंत्र, प्रत्येक तंत्र, प्रत्येक स्त्रोत यातील अक्षरे आणि कृतींसोबतच्या आकृतीमधील रचना ही सगळी संस्कारांची परिभाषा आणि प्रतिकरुपे आहेत. संस्कारांना असे महत्त्व देणारी भारतीय संस्कृती माणसाच्या शारीरिक सुखांपेक्षा मानसिक उन्नतीचा अधिक विचार करते. मानसिक उन्नतीचे मूल्य भौतिक प्रगतीपेक्षा अधिक मानते. अध्यात्मिक, पारलौकिक जीवनाचा केंद्रबिंदू आत्मा तर ऐहिक जीवनाचा मध्यबिंदू मन मानणारी भारतीय संस्कृती आहे. म्हणून "मना'ची चिंता करणारी भारतीय संस्कृती "मनी'ची विवंचना करणाऱ्या पाश्र्चात्यांपेक्षा वेगळी आहे.
आज भारतीय समाज आणि या समाजातील व्यक्ती चक्रव्यूहात मध्यभागी जाऊन बाहेर पडता येऊ न शकणाऱ्या "अभिमन्यू'सारख्या संभ्रमित झालेल्या अवस्थेत असण्याचे कारण चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविणारा सद्‌सद्‌विवेकबुद्धी रुपी कृष्णाचा सल्ला अर्धवट ऐकून पूर्ण ऐकण्याआधी चक्रव्यूहात शिरण्याची केलेली घाई हेच आहे. बाहेर कुठून, कसे पडायचे! याची माहिती करून घेण्याआधी आत-चक्रव्यूहात शिरण्याची घाई करतात ते फसतात आणि अभिमन्यू होऊन धारातीर्थी पडतात. परिस्थिती बदलणे-न बदलणे दरवेळी आपल्या हातात असते असे नाही पण मनस्थिती बदलणे तर निश्र्चितपणे आपल्या हाती आहे. मनस्थिती हा मनावरील संस्कारांचा परीपाक असते. एकाच घटना-प्रसंग-आपत्तीला वेगवेगळी माणसे वेगवेगळ्या प्रकारे सामोरी जातात कारण त्या त्या व्यक्तींवरील संस्कार वेगवेगळे असतात. माणसे मुळात फक्त माणसे असतात पण त्यांचे वागणे-बोलणे-करणे किंवा न करणे हे त्यांच्या मनावर बदलते-अवलंबून असते. जो सतत शिकतो-संस्कारित होत असतो तो माणूस! शिकण्याची-संस्कारित होण्याची त्याच्या मनाचे सॉफ्टवेअर घडण्या-बिघडण्याची प्रक्रिया जन्मभर चालू असते. लहानपणी ती अधिक तीव्र सखोल आणि दूरगामी परिणाम करणारी असते.
संस्काराचा प्रारंभ हा घरातून होतो हा प्रारंभ, शुभारंभ ठरावा असे वाटणाऱ्या पालकांना "शुभ' "सत्य' बोलण्याची "सुरुवात' स्वत:पासून करण्याची जाणीव असावी लागते. फोनवर समोरच्याशी खोटे बोलणारा, मोबाईलवर दिशाभूल करणारी माहिती देणारा किंवा "मी घरात नाही' असे मुलाला सांगणारा बाप मुलाला "खरे बोलत जा' असे कुठल्या तोंडाने सांगणार आणि खोटारडेपणा करणाऱ्या बापाचा मुलगा "खरे बोलणारा' कसा निपजणार! माझ्या वागण्या-बोलण्याचा नुसता परिणाम नव्हे तर संस्कार माझ्या मुलाच्या मनाच्या-मेंदूच्या सॉफ्टवेअरच्या जडणघडणीवर होतो आणि तो घडतो किंवा बिघडतो हे भान किती टक्के आईबापांना आहे? त्यांना मुलांबद्दल तक्रार करण्याचा काय नैतिक अधिकार आहे? खोटं बोलणारा बाप मुलाला खोटं बोलायला शिकवतो आणि मुलाची खोटं बोलण्याची सुरुवात बापाशी खोटं बोलण्यापासून होते तेव्हा तोच बाप रागावतो आणि खरे बोल म्हणतो. पण हे मुलाच्या मनाचे सॉफ्टवेअर कोणी बिघडवले?
एक वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी भेटले. अधिकारी होते तेव्हा "सुखी माणसाचा सदरा' जणू आपल्याच अंगावर आहे अशा थाटात वावरायचे. सत्ता-संपत्ती-सुख-साधने सारे पायाशी त्यामुळे मुले गेली परदेशी, बायको झाली स्वर्गवासी आणि स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मागचा आकडा गेल्यावर शून्ये उरून शून्यांची बेरीज शून्यच व्हावी तसे साऱ्या नात्यांचे भागाकार आणि संबंधांची वजाबाकी होऊन जीवनात शून्य, जीवन म्हणजे शून्य उरले. मग एक दिवस पूर्वी तुच्छ, क्षुद्र वाटणारा शिपाई नातवंडाला खांद्यावर बसवून आनंदात खेळवताना पाहिला आणि काय कमावलं याचा विचार आयुष्यभर करणाऱ्या त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आपण काय गमावलं ते लक्षात आलं. आपल्या शून्य उत्तर आलेल्या जीवनाच्या गणिताचं कोडं उलगडलं. आपल्या अंगावरचा "सुखी माणसाचा सदरा' त्यांना शिपायाच्या अंगावर नातवंडांच्या खेळण्याने चुरगळूनही फुल चुरगळल्यावर त्याचा गंध दरवळावा तसा झळकताना दिसला. म्हणूनच शकुंतलेच्या भरताला कडेवर घेऊन "नातवाच्या पायाची धुळीने आजोबाचे अंग मळण्यासारखे आणि त्याच्या गोड लाथांनी गुदगुल्या होण्यासारखे सुख गृहस्थाच्या जीवनात नाही' असे कण्वमुनी का म्हणाले हे तेव्हा त्याला कळले. संस्कृतीचा संस्कार माणसे जोडणारा असतो आणि माणसाला एकाकी पडू न देणारा असतो.
निसर्ग म्हणजे प्रकृती तर निसर्गाच्या चक्राशी मानवी जीवनाची समतोल सांगड ही संस्कृती. प्रकृती आणि संस्कृती यांचं नातं अतूट आहे. प्रकृतीतूनच संस्कृतीचा उदय आहे म्हणून संस्कृतीचं कार्य प्रकृतीचं पोषण करणं आहे. प्रकृतीचं-निसर्गाचं शोषण करणं म्हणजे संस्कृतीचं विकृतीत रुपांतर करणं आहे. एक सुंदर कल्पना आहे. परमेश्र्वराच्या जेव्हा लक्षात आलं की तो प्रत्येक मुलाचं पालनपोषण, संरक्षण, संवर्धन करण्यासाठी स्वत: जाऊ शकत नाही तेव्हा त्याने आपल्यातला वात्सल्याचा अंश घेऊन "आई' निर्माण केली. तसंच जेव्हा त्याला वाटले की निसर्गातील जीवजंतू-पक्षीप्राणी-झाडेवनस्पती यांचं व्यवस्थापन ही आपल्या एकट्याची गोष्ट नाही तेव्हा त्याने पक्षी-पशू-प्राप्ती-जीवजंतू यांच्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धिचा मानव निसर्गाच्या व्यवस्थापन आणि संवर्धनासाठी निर्माण केला. पण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, तसा माणूसच काळाच्या ओघात इतका स्वार्थी झाला की तो ज्या निसर्गाचा "तारक' व्हायचा तो "मारक' म्हणून वावरू लागला. निसर्गाला गुलाम करण्याची स्वप्ने पाहू लागला. निसर्गाचे नियम आणि निसर्गचक्राची गती बदलण्याचे प्रयत्न करू लागला. निसर्गाला अभिप्रेत, समरसता, एकरूपता सोडून निसर्गाशी संघर्ष करण्यात धन्यता मानू लागला. हा संघर्ष प्रकृती विरुद्ध विकृती असा आहे. निसर्गावरील अत्याचारातून निसर्गाचा प्रतिकार आता वेगवेगळ्या रुपांमध्ये प्रगट होऊ लागला आहे. भूकंपापासून सुनामीपर्यंत, अवर्षणापासून अतिवृष्टीपर्यंत, व्हायरसजन्मरोगांपासून साथीच्या रोगांपर्यंत निसर्ग आपला प्रतिकार करतो आहे. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या घटना आणि "ओझोन' थराच्या विपरांपासून उत्तर-दक्षिण धु्रवांच्या वितळण्यापर्यंतच्या दुर्घटना या मानवी विकृतीच्या दुष्परिणामांचे पुरावे आहेत. देवाने ज्या मानवाला निसर्गाचे वरदान दिले त्याच निसर्गाचा शाप मानवाने ओढवून घेतला आहे. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य हे की इथे पापाचे परिमार्जन करण्यासाठी प्रायश्र्चित्ताची व्यवस्था आहे आणि शापासाठी उ:शाप मिळण्याची तरतूद आहे. आपली ही सिरीयल म्हणजे मानवाने निसर्गाच्या संदर्भात केलेल्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी केलेला प्रायश्र्चित विधी आहे. उ:शाप मिळवण्यासाठी केलेली साधना आहे. तपश्र्चर्येने, आराधनेने जसा ईश्र्वर प्रसन्न होतो तशी निसर्गाला देव समजून त्याची साधना-आराधना करणारी भारतीय संस्कृती आहे. इथे झाडं-पानं-फुल-वेली-अंकुर-डोंगर-नद्या-प्राणी-पक्षी याना देवता स्वरुपात पाहिले-पूजले जाते असा हा देश आहे. पंचमहाभूतांना देवत्व देणारी वैहिक संस्कृती आणि निसर्गाला ईश्र्वर शक्तीचा साक्षात्कार मानणारी आर्य संस्कृती या गंगाजमनांच्या संगमातून भारतीय संस्कृती प्रवाहित झाली आहे. भोगातून रोगाकडे, चंगळ करता करता अमंगळाकडे आणि वासनेतून विषाकडे निघालेल्या पाश्र्चात्य संस्कृतीला अडवण्याचे आणि विकृतीच्या जागी पुन्हा प्रकृतीला प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य फक्त भारतीय संस्कृतीत आहे. म्हणून आमची ही मालिका जीवनाच्या व्यवस्थापनाचा गाभा मनाच्या व्यवस्थापनात आहे, असे मानते आणि मनांच्या व्यवस्थापनातून जनांच्या जीवनाचे व्यवस्थापन निसर्गाच्या नियमांशी सुसंगत करून जीवनाची रंगत निसर्गाच्या रंगसंगतीशी जुळवता येईल असे मानते. धरतीवर स्वर्ग आणणे म्हणजे इथला निसर्ग त्याच्या मूळ ईश्र्वरी संकेतांनुसार मुक्त विकसित होऊ देणे हाच आहे. निसर्ग-प्रकृती ही मानवाची माता तर संस्कृतीप्रेरित निसर्गधर्म हा पिता आहे. हिंदू-मुस्लीम-ख्रिश्र्चन-जैन-बौद्ध-शीख या सर्वांचा-सर्व धर्मांचा आद्यधर्म आहे-निसर्गधर्म!

मुंबईकरांचे लई नाही मागणे, सुसह्य करा रोजचे जगणे

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
मुंबईकरांचे लई नाही मागणे, सुसह्य करा रोजचे जगणे
विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळे येत जातील तसे राजकीय नेते, व्यावसायिक वक्ते आणि मैदानात उतरलेले कार्यकर्ते या निवडणुकीमधील "कळीचा मुद्दा-मुख्य इश्यू' काय यावर नाना प्रकारचे अंदाज व्यक्त करू लागतील. वृत्तपत्रांमधून वाचकांचे कौल मतदान कोणत्या मुद्यावर होणार? या प्रश्र्नावर आजमावले जातील. टी.व्ही.चे चॅनल्स, एस.एम.एस.च्या माध्यमातून निवडणूक कोणत्या प्रश्र्नावर लढली जाते आहे याचे तर्क मांडतील.
मग कुणी म्हणतील की आगामी विधानसभा निवडणूक भाषिक अस्मितेच्या मुद्यावर लढली जाईल. लगेच या युक्तिवादाचा प्रतिवाद करणारे पुढे येतील. म्हणतील कुठल्या एका भाषेची अस्मिता हा विषय घेणाऱ्याला मुंबईतील मतदारांचे व्यापक समर्थन कसे मिळणार? कारण मुंबईत कुठल्याच भाषिक वर्गाचे बहुमत नाही. म्हणजे ज्याला कुणाला निवडणूक नुसती लढवायची नसून जिंकायची आहे त्याला आपला पाया एका नव्हे अनेक भाषिकांमध्ये घालावाच लागणार. मुंबईच्या लोकसंख्येची भाषिक वर्गवारी जर 2001 च्या जनगणनेच्या आधारे पाहिली तर मराठी भाषिक सुमारे 23 टक्के, हिंदी भाषिक सुमारे 43 टक्के, उर्दू भाषिक सुमारे 17 टक्के, इंग्रजी भाषिक सुमारे 7 टक्के, गुजराथी भाषिक 9 टक्के आणि दक्षिण व इतर भाषिक सुमारे 1 ते 2 टक्के अशी मुंबईची भाषिक रचना आहे. हिंदी भाषिक म्हणून जरी गट 43 टक्के एवढा मोठा असला तरी त्यात मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, झारखंड, बांगलादेशी असे भाषनिहाय बोली आणि प्रदेशानुसार पोटभेद पडतात. भाषा हिंदी असा उल्लेख असला तरी त्या हिंदी भाषिकातही प्रादेशिकतेचे रंग स्वतंत्रपणे आहेत ते विचारात घ्यावे लागतात.
याचा अर्थ असा की कुठलाही पक्ष किंवा उमेदवार त्या त्या भाषेच्या जनसमुदायासमोर बोलताना त्या त्या भाषिकांच्या अस्मितेला आवाहन करीत असला, भाषिक अहंकाराला त्यांची मने आणि पर्यायाने मते जिंकण्यासाठी फुंकर घालीत असला तरी तो मनातून हे ओळखून असतो की केवळ याच एका भाषिकांच्या भरवशावर मी राहिलो तर निवडणुकीत माझे काही खरे नाही. किंबहुना मी वाजवीपेक्षा जास्त भर देऊन या भाषिकांच्या सभेत बोललो आणि ती बातमी किंवा माझे बोलणे इतर भाषिकांमध्ये पोहचले तर मला त्यांच्या नाराजीला तोंड देण्याची पाळी येईल.
मग चतुर राजकारणी वक्ता एका भाषेला आई म्हणतो दुसरीला मावशी तिसरीला आत्या तर चौथीला काकी. श्रोतेही काही कमी बिलंदर नसतात. त्यांनाही कळत असते की वक्ता राजकीय नेता आहे त्यामुळे तो "गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास' असे दोन्ही दगडांवर पाय ठेवून "चित भी मेरी, पट भी मेरा, छाप आया तो मै जिता, कॉंटा आया तो तू हारा' अशी चलाखी करतो आहे. पण प्रेमात आणि युद्धात तसेच निवडणुकीत सारे काही क्षम्य असते. असे आता उमेदवारच नव्हे तर मतदारही मानू लागले असल्यामुळे कुणी नेत्याच्या-वक्त्याच्या या भाषिक दुटप्पीपणाला आक्षेपही घेत नाही किंवा त्यामुळे हुरळून मतेही देत नाहीत.
केवळ भाषिक भावनेला आवाहन करून मते मिळवण्याचे दिवस कधीच संपले. हे ज्या नेत्यांना अजून उमगलेले नाही ते कुठलाच मुद्दा, मते मागण्यासाठी किंवा भावना चेतवण्यासाठी सापडला नाही की शिळ्या कढीला ऊत आणावा, विझलेल्या निखाऱ्यावरची राख फुंकून ठिणगी पेटते का पहावे, सूत्र तुटलेल्या पतंगाला शेपटी धरून उडविण्याचा प्रयत्न करावा तसे भाषिक अहंकार, अस्मिता यावर गदारोळ उठवण्याचा प्रयत्न करून बघतात. पण आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व भाषिक सरमिसळ बघता याविषयावर, मुद्यावर ना कुणा पक्षाला मते मिळतील ना उमेदवाराला.
गेल्या लोकसभा, निवडणुकीत बदलत्या काळाची पावले ओळखू न शकलेल्या काही पक्षांनी, नेत्यांनी, उमेदवारांनी भाषिक अस्मिता, अहंकार हा निवडणुकीचा मुद्दा करून पाहिला पण तो साफ अपयशी ठरला. अर्थात आश्र्चर्याची गोष्ट अशी की आजही त्या मुद्याला हवा देण्याचा आणि काही साधते का बघण्याचा प्रयत्न होताना दिसतो. पण ही गोष्ट आता पक्की लक्षातच ठेवायला हवी की महापालिका निवडणूक भाषिक आवाहनावर जिंकणे कुणालाही शक्य नाही. किंबहुना कुठल्या एका भाषिकांचा अनुनय करताना इतर भाषिकांची नाराजी ओढवून घेण्याचे प्रसंग अधिक येणार!
मग जर भाषिक आवाहनावर ही विधानसभा निवडणूक जिंकता येणार नाही हे स्पष्ट आहे तर काय धार्मिक आवाहनावर ही निवडणूक कुणी जिंकू शकेल काय? अर्थातच याही प्रश्र्नाचे उत्तर नाही असेच आहे. लोकसभा निवडणूक ही स्थानिक दैनंदिन समस्या, प्रश्र्न, अडचणी, सोयी-सुविधा, नागरी साधने यांच्याशी बिलकुल निघडीत नसते तर एका व्यापक राष्ट्रीय धोरणासाठी तिथे मतदान होते. अनेक पक्षांना, नेत्यांना तिथे असे वाटले होते की एका विशिष्ट धर्माच्या भावनैक आवाहनावर मते मिळवता येतील. आणखी एका वर्गाला अमुक एकामुळे आपला धर्म धोक्यात आहे अशी आवई उठवून विशिष्ट धर्माच्या मतदारांना मतदानासाठी एक गठ्ठा बांधता येईल असे वाटले होते. जवळ जवळ प्रत्येकच धर्मात एक हितसंबंधी गट असा असतो की जो त्या धर्माच्या बाजूने बोलण्यासाठी कुठल्यातरी दुसऱ्या धर्माला विरोध करीत असतो आणि तमक्यामुळे आपला धर्म धोक्यात असल्याची आवई उठवीत असतो. पण भारतीय परंपरा, संस्कृती आणि कित्येक हजार वर्षांपासून सातत्याने चालू असलेले सामाजिक अभिसरण यांचा प्रभाव भारतीय जनमानसावर इतका जबरदस्त आहे की इथे कुठल्याही धार्मिक भावनेला चेतवून निवडणुका जिंकणे आजवर कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही आणि धार्मिकतेचा दावा करणाऱ्या पक्षांनाही सत्तेवर इतरांच्या मदतीने यावे लागले आणि सर्वसमावेशकतेने सर्व धर्मियांना आश्र्वासित करावे लागले. मुंबई महानगर हे मन:पूर्वक सर्व जाती, धर्म, पंथीयांचे सामाजिक अभिसरण जपणारे आहे. इथे जातीयता, कट्टर पंथीय धार्मिकता, दुजाभाव, पक्षपात, विषमता नाही हे तर मुंबईकडे ग्रामीण भागातून येणाऱ्या दलित, पीडित, उपेक्षित अशा लाखो लोकांचे भारतभरातून आकर्षण आहे. मग हे मुंबई शहर धार्मिकतेला जर लोकसभा निवडणुकीत थारा देत नाही तर विधानसभा निवडणुकीत धार्मिक आवाहनाला कोण प्रतिसाद देणार? अर्थातच येत्या विधानसभा निवडणुकीत भाषिक तशाच धार्मिक मुद्यावर मतदारांना आकर्षित करता येणे अशक्य आहे. मुंबई हे जातीयता न पाळणारे शहर आहे. इथला मुंबईकर जातीपातीच्या जंजाळातून सार्वजनिक जीवनात तरी मुक्त आहे. त्यामुळे धार्मिक नाही. तशीच जातीय भावना निवडणुकीत भडकवणे कुणाला राजकीयदृष्ट्याही परवडणारे नाही. मग निवडणुका काय मुद्यावर लढल्या जाणार? तर तो मुद्दा एकच आहे आणि तो म्हणजे सर्वसामान्य आम जनतेला जीवन सुसह्य आणि सुखद करणारा पक्ष किंवा उमेदवार कोण वाटतो यावर मतदान होणार आहे. मुंबईकरांना भव्य दिव्य स्वप्नांची ओढ नाही. शांघाय, हॉंगकॉंग, सिंगापूर अशा एखाद्या शहराची डुप्लीकेट प्रतिकृती होण्यात मुंबईकरांना स्वारस्य नाही. मुंबईकरांचे मागणे एकच आहे आमचे दैनंदिन जीवन सुसह्य होईल एवढे बघा. सुसह्य जीवनाची मुंबईकरांची अपेक्षा कल्पना काय आहे? हे जो पक्ष आणि उमदेवार ओळखेल आणि आपण ते करू असा विश्र्वास निर्माण करील त्या पक्षाचा आणि उमेदवाराचा विजय येत्या विधानसभा निवडणुकीत पक्का आहे.
मुंबई शहराचे व्यक्तिमत्त्व काही निराळेच आहे. एखाद्या व्यक्तीला आपण अष्टपैलू म्हणतो तशी मुंबई आहे. मुंबईत राहणाऱ्या व्यक्तिच्या लक्षात मुंबईत काळाच्या ओघात होत गेलेले बद्दल प्रथमदर्शनी आणि सहजपणे लक्षात येत नाहीत पण बाहेरून, अधुनमधून बऱ्याच वर्षांनी मुंबईत आलेली व्यक्ती दोनपाच वर्षातही मुंबईत झालेले बदल पाहून आश्र्चर्यचकित होते. तिला आमुलाग्र बदलत चाललेली मुंबई पाहून धक्काच बसतो. त्याला दरवेळी मुंबई अधिक उंच, अधिक देखणी, अधिक आकर्षक आणि अधिकच श्रीमंत वाटते. पण हा मुंबईचा चेहरा नाही तो उत्कृष्ट मेक-अप्‌ केलेला आणि दोष लपवून फक्त दर्शनीय बाजू अधिक प्रदर्शनीय केलेला मुखवटा आहे. मुंबई सुंदर आहे तेवढीच कुरुप आहे. श्रीमंत आहे तशीच ती गरीब आहे. सुव्यवस्थित आहे तशीच अव्यवस्थित आहे. हवीशी वाटणारी आहे तेवढीच नकोशी होणारी आहे. एखाद्या वर्तमानपत्रात जसे फ्रंटपेज पासून स्पोर्टस्‌पेजपर्यंत आणि पेज थ्रीपासून क्राईम स्टोरीपर्यंत सर्व प्रकारचा मसाला ठासून भरलेला असतो, तशी मल्टी डायमेन्शनल मल्टीपरपज मल्टीपल प्रॉब्लेम्स असलेली मुंबई आहे. अशी ही मुंबई ज्याला कळली त्याला ब्रह्मज्ञानप्राप्तीचा आनंद व्हायला हरकत नाही. जगात आहे आणि मुंबईत नाही असे काही नाही. मुंबईत आहे पण जगात नाही असे मात्र खूप काही आहे.
पूर्वी नदीकाठाने वस्ती वाढायची. एकेक परिसर एकेका व्यवसायाची माणसे वाटून घेतल्यासारखी आपली जात, धर्म, भाषा यांचा दुवा पकडून घरे, झोपड्या बांधायची. मुंबईत नदी नाही. नदीची उणीव मुंबईची लाईफ लाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वे लाईन्सनी भरून काढली आणि रेल्वेच्या पूर्व-पश्र्चिमेला वसाहती होत गेल्या. रेल्वे पश्र्चिम असो की मध्य पण आणखी एक वैशिष्ट्य 1990 पर्यंत सरसकट आढळायचे आणि ते म्हणजे रेल्वेच्या पश्र्चिम तिरावर अधिक सधन सुखवस्तू, उच्चभ्रू, वर्गाची प्रतिष्ठित मानली जाणारी वस्ती वाढायची तर रेल्वेच्या पूर्वेला कष्टकरी, श्रमिक, कामगार, कनिष्ठ आणि मध्यम वर्गीयांची स्थानिक मराठी भाषिकांची वस्ती वाढत राहिली. 1990 नंतर मुंबईतले कामगार केंद्रित उद्योगधंदे बंद होत गेले आणि त्याऐवजी व्हाईट कॉलर जॉबस्‌ हजारोंनी निर्माण झाले. बांधकाम आणि गृहनिर्माण व्यवसायात अभूतपूर्व तेजी आली. दिसेल, मिळेल तिथे भूखंडांवर उत्तुंग इमारती उभ्या राहू लागल्या. जुन्या चाळी, वाडे, इमारतींच्या जागी येणाऱ्या या गगनचुंबी इमारतींमध्ये नवश्रीमंत वर्ग रहायला आला आणि आधी त्या भूखंडावर राहणारे गरीब झोपडपट्टयांमध्ये तर मध्यमवर्गीय डोंबिवली-कल्याण-बदलापूर-वसई-विरार-भाईंदर असे उप-उपनगरात मिळणारी भाड्याची किंवा कमी किंमतीची घरे यात स्थलांतरित झाले. यामुळे मुंबईचे बाह्यस्वरूप तर बदललेच पण अंतरंग, अंतर्गत रचनाही बदलली. मुंबई समजावून घ्यायची असेल त्याला लोकवस्तीत झालेले आर्थिक सामाजिक स्थित्यंतर आणि स्थलांतर हाही विषय समजावून घ्यायला हवा.
2000 सालानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे निकाल राजकीय पक्षांना आणि अंदाज बांधणाऱ्या व्यावसायिक पंडितांना धक्कादायक वाटले याचे कारण भूगर्भातील हालचालींची नोंद न घेणाऱ्यांना जसा भूकंपाचा मानसिक धक्का बसतो तसा मुंबईअंतर्गत लोकप्रवाहातील मानसिक शारीरिक स्थित्यंतर, स्थलांतराची नोंद न घेणाऱ्यांना निवडणूक निकाल अनपेक्षित वाटले. मुंबई शहरात अध्यात्मिक कार्यक्रम-उपक्रमांना लाखो लोक गर्दी करीत असले तरी या महानगराला ध्यास, आकर्षण आणि ओढ आहे ती भौतिक सुख-सोयी-सुविधा-साधनांची गरीबापासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला उपलब्ध संधी, संपत्ती आणि साधनांचा पुरेपूर उपभोग घ्यायचा आहे. आधी स्वार्थ मग जमला तर परमार्थ या दृष्टीकोनाचा सर्वच चंगळवादी संस्कृतीत प्रभाव सर्वत्र असतो. श्रीमंत माणूस बारमध्ये जाऊन चैन करतो, ती न परवडणारा त्याला परवडेल अशा ठेल्यावर कंट्री पिऊन नशा करतो. दोघांची ओढ एकच असते-नशा! मल्टीप्लेक्स आले तरी अजून जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स हाऊसफुल करणारा आणि झोपडपट्‌ट्यांमधल्या गोडाऊनवजा व्हिडीओ पार्लरमध्ये असल्यातसल्या मसालेदार अनसेन्सॉर्ड फिल्म्स्‌ 5-10 रुपयात पाहणारा वर्ग हजारोंच्या संख्येने आहेच. हायफाय शॉपिंग मॉलमध्ये लाखो रुपये खर्च करणारे कस्टमर आहेत. तसेच छोट्या-मोठ्या दुकानात शेकडो रुपये कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चैनीची प्रसाधने यावर उधळणारा वर्गही आहेच. मुंबई शहरावर झालेला चंगळवाद, भौतिकता आणि आर्थिक मोहाची जादू याचा सर्वात मोठा परिणाम राजकारणावर झाला आहे हे अद्याप अनेक राजकीय पक्षांच्या आणि प्रस्थापित परंपरागत साच्यातून विचार करणाऱ्या नेत्यांच्या लक्षातच आलेले नाही.
चंगळवाद मनात असतो. ज्यांना तशी संधी, संपत्ती मिळते त्यांच्या चंगळवादाचे दर्शन-प्रदर्शन आपण बघतो. पण संधी आणि संपत्ती किंवा साधनांअभावी अव्यक्त राहिलेला पण मनात, शरीराच्या रोमरोमात भिनलेला चंगळवाद, सुखसाधनांचा अनिवार मोह लाखो मुंबईकरांची भूमिका ठरवीत असतो. अनेक विचारवंत, बुद्धिमंत मुंबईतील रस्त्यावर येऊन होणारी उग्र, तीव्र आंदोलने कुठे गेली? असा प्रश्र्न हल्ली वारंवार विचारताना दिसतात. याचे एक उत्तर असं आहे की एकेकाळी आंदोलनात पुढे असणारा "नाही रें'चा वर्ग आता प्रस्थापित "आहे रें'मध्ये गेला. आणि आज "नाही रें' मध्ये मोडणाऱ्या वर्गाचे सारे लक्ष आपण कधी "आहे रें'मध्ये जातो याकडे इतके लागलेले आहे की त्यांनाही आता आंदोलन करताना अपरिहार्यपणे सोसावी लागणारी झळ, त्रास, मनस्ताप यातले काही नको आहे. त्यांनाही स्थिर, सुरक्षित, सुखरूप आणि शारीरिक-मानसिक क्लेशाशिवाय आहे त्या परिस्थितीत शांतपणे जगायचे आहे. संघर्षाऐवजी सहभागातून, झगडण्याऐवजी समन्वयातून त्यांना मिळेल तेवढे हवे आहे.
सर्वसामान्य माणूस संघर्ष, आंदोलनं, चळवळी, मारामाऱ्या, द्वेषभावनेवर आधारित जाती-धर्म-भाषिक वैमनस्य यापासून स्वत:ला, कुटुंबाला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात इतका आहे की त्याचमुळे कुठला असा द्वेष-मत्सर-वैमनस्य यावर आधारित निवडणूक प्रचार आता प्रभावी ठरेनासा झाला आहे. उलट जात-भाषा-धर्म-प्रदेश यातील द्वेष आणि वैमनस्याचे राजकीय भांडवल करून निवडणूक जिंकू पाहणाऱ्या पक्ष किंवा उमेदवारांमुळे आपले आर्थिक हितसंबंध, सुख, शांती, स्वास्थ्य धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे आता मुंबईचे मतदार कुणातरी विरुद्ध असणाऱ्या पक्ष किंवा उमेदवारांऐवजी कुणाच्या तरी, कशाच्या तरी बाजूने मुख्यत: स्थैर्य आणि सुबत्ता यांची संधी आश्र्वासित करणाऱ्या पक्ष व उमेदवारांच्या मागे जाण्याच्या मन:स्थितीत आहेत. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत वादाऐवजी संवादावर आणि संघर्षापेक्षा समन्वयावर भर देणाऱ्या पक्षांना सुख-समृद्धी-सुरक्षितता यांचा ध्यास लागलेल्या मुंबईकरांचा कौल मिळण्याची शक्यता आहे. उमेदवाराची जात, धर्म, भाषा, प्रदेश याला आजवरच्या निवडणुकांमध्ये बरेच महत्त्व असे. शक्यता अशी आहे की येत्या निवडणुकीत मतदार जात, भाषा, धर्म, प्रदेश याऐवजी स्थैर्य आणि सुरक्षितता, सुख-सोयी-सुविधांची हमी यावर मते देतील.

स्वयंसेवी संस्थांचे "इमेज मार्केटींग' दानापासून अनुदानापर्यंत कसे करावे?

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
स्वयंसेवी संस्थांचे "इमेज मार्केटींग' दानापासून अनुदानापर्यंत कसे करावे?
समाजातील सधन व्यक्तींच्या संख्येत सतत वाढ होते आहे. फाईव्ह स्टार हॉटेल्स भरून वहात आहेत. शॉपिंग मॉल्सपासून ब्रॅण्डेड ज्वेलर्सपर्यंत पैसे उडविणाऱ्यांची झुंबड गर्दी उडालेली दिसते आहे. बंगले, अलीशान गाड्या, फार्म हाऊसेस, सर्वत्र वैभवाची रेकॉर्डब्रेक दर्शने-प्रदर्शने होताना दिसत आहेत. कोट्यवधी रुपये लग्न समारंभ, बर्थ डे पार्ट्यांवर खर्च केले जात आहेत. एकीकडे संपत्ती आणि साधनांचा असा महापूर आलेला असताना एन.जी.ओ.म्हणजे स्वयंसेवी संस्थांना मात्र दात्यांचा दुष्काळ का भेडसावतो आहे? शासकीय अनुदाना व्यतिरिक्त धनिकांच्या दानाचा लाभ स्वयंसेवी संस्थांना का होत नाही? एन.जी.ओ.स्वयंसेवी संस्था आपल्या सेवाकार्याची "इमेज' मॅनेजमेंट करून आपल्या "प्रोजेक्ट'चे "प्रॉडक्ट'मध्ये रुपांतर करून त्याचे "सेलेबल कमोडीटी' सारखे आकर्षक "पॅकेजिंग' करून हाय इन्कम सोसायटीत "मार्केटींग' करू शकत नाहीत का? की करीत नाहीत? की केले पाहिजे हे त्यांना समजत नाही? की कसे करावे हे उमगत नाही? की एन.जी.ओ.स्वयंसेवी संस्थांनी तुटपुंज्या, अपुऱ्या साधनात कार्य करण्यात त्यांना भ्रामक धन्यता वाटते? की स्वत: उपाशी राहिल्याशिवाय उपाशी लोकांची आणि स्वत: दळभद्री राहिल्याशिवाय दरिद्री लोकांची सेवा प्रामाणिकपणे करता येत नाही या गैरसमजुतीत ते भारतीय समाजसेवकांच्या परंपरेमुळे आजही आहेत? आपण सधन असू आणि आपल्या हाताशी साधने असतील तर आपण अधिक सक्षमतेने, कौशल्याने, प्रोफेशनली इफेक्टीव्ह ऍडमिनीस्ट्रेटीव्ह सेटअप्‌ उभारून अन्याय, शोषण, अत्याचार, पीडा, दारिद्रय, आजार, अनारोग्य, अशिक्षितपणा, बेरोजगारी, अज्ञान यांनी ग्रासलेल्या तळागाळातल्या समाजाला अधिक समर्थपणे उपयोगी पडू शकू हे या स्वयंसेवी संस्थांना पटलेले नाही का?
साधने ही संपत्तीच्या माध्यमातून संस्थांना मिळू शकतात पण संपत्ती संस्थांना दात्याकडूनच प्राप्त होते. ज्याच्याकडे संपत्ती आहे तो तिचा भोग-उपभोग, मुक्त-मनसोक्त पद्धतीने घेत असतो, त्यातच त्याला त्याच्या संपत्तीचे सार्थक आणि भोागच्या परमावधीत पुरुषार्थाची परिसीमा वाटत असते. धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी त्याला फक्त काम आणि अर्थ यात अर्थ आणि स्वार्थ आढळत असतो. हे सर्व काही माझे एकट्याचे आहे, माझ्या उपभोगासाठी आणि मला अधिक सधन करण्यासाठी आहे या भूमिकेत तो असतो. जे पीडित, वंचित, दु:खी, दरिद्री, अज्ञानी, अशिक्षित आहेत ते त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापाची किंवा या जन्मीच्या कर्माची फळं भोगत आहेत आणि तेच तसेच जीणे जगण्याची त्यांची लायकी आहे, असे त्या "सधन' माणसाचे मत असते. त्यामुळे आपण समाजाचे देणे किंवा या वंचितांचे काही करणे लागतो असे त्याला बिलकुल वाटत नाही.
तो "भीक' घालून "ड्राईव्ह इन' पद्धतीने "पुण्या'चे "रिफील' करून जातो पण भीक आणि दान यातला फरक त्याला कळत नाही आणि स्वयंसेवी संस्था तो कधी प्रबोधन करून त्याला सांगत नाहीत. भीक म्हणजे भिकाऱ्याला जन्मभर भीक मागत राहण्यासाठी उत्तेजन आहे तर, दान करणे म्हणजे भिकाऱ्याला भीक मागणे थांबवून स्वावलंबी होण्याची संधी देणे आहे. हे स्वयंसेवी संस्था सांगत नाहीत. त्यामुळे मुंबईत रोज भीक म्हणून 3 कोटी रुपये हजारो भिकाऱ्यांमध्ये वाटले जातात पण, स्वयंसेवी संस्थांची काही हजार-लाख वर्षाकाठी मिळवताना दमछाक होते.
"भीके'चा उगम उपभोगातून येणाऱ्या अपराधी भावनेतून होतो तर दानाचा उदय सद्‌भावना, सहभावना, सहयोग, सहकार्य, सहवेदना, सहानुभूती सहजीवनाच्या भावनाशील भूमिकेच्या कृतीशीलतेतून होतो आणि म्हणूनच भीक म्हणजे वाऱ्यावर विखुरलेले तण आहे तर दान म्हणजे मनाची मशागत करून सधन लोक पैसे मागणाऱ्याला भिकारी समजतात. कारण त्यांच्याकडे धनाची श्रीमंती असली तर मनाची श्रीमंती नसते. भिकारी हा लाचारीतून पैसे मागत असतो तर एन.जी.ओ.कर्तबगारीतून धनरुपाने बीज भांडवल मागत असतो. निसर्गात परागीभवनाचा सिद्धांत मूलभूत आहे. या फुलातल्या पुंकेसरांचे परागीभवन दुसऱ्या फुलातल्या स्त्री केसराशी होऊन दोन्ही फुले फुलतात आणि बाग बहरते. स्वयंसेवी संस्थांसाठी दान हे एक प्रकारचे सामाजिक समृद्धीचे परागीभवन आहे. यानेच समाजाची बाग बहराला येणार आहे. जो देतो तोही काही घेतो ही प्रक्रिया फक्त दानात घडते. तो धन देतो आणि ज्याला देतो त्याचे मन घेतो. यापेक्षा आणखी मिळवायचे ते काय?
मधमाशा हजारो फुलांवर फिरतात. बसतात. त्या फुलांमधला मध गोळा करतात पण त्याचवेळी त्यांच्या पायाला परागकण लागून इतर फुलांमध्ये संयोग होऊन फळे साकारतात. म्हणजे मधमाशांच्या "मध' घेण्यातही ज्याच्याकडून मध घेतला त्या फुलांना जीवन देणे आहे. स्वयंसेवी संस्था या मधमाशांच्या भूमिकेतून समाजात स्वत:साठी "मधुसंचय' करता करता मनांमध्ये "जीवना'ची स्पंदने जागवीत असतात.
सधन माणसांच्या मनातली सहृदयता जागविण्यासाठी कोणते आवाहन करायला हवे? याचा विचार स्वयंसेवी संस्था करतात का? सधन माणसाला अपराधी, दोषी ठरवून, दोषारोप, टीका करून त्याला दानासाठी प्रवृत्त करता येणार नाही. तो तशा टीकेमुळे आणखी दुरावेल. दुखावेल. सूड भावना जागेल. कटूता वाढेल. तो प्रतिटीका, प्रतिहल्ला, प्रत्यारोप करून आपल्याबद्दल हेवा, मत्सर, द्वेष आणि यशाबद्दल, संपत्तीबददल दुस्वास वाटतो म्हणून तुम्ही आरोप करता म्हणेल. दोष दिल्याने फक्त रोषच वाट्याला येतो. वाईट बोलून चांगले घडत नाही.
"सधन' माणसाला स्वयंसेवी संस्थेसाठी दान करायला प्रवृत्त करायचे असेल तर सर्वप्रथम त्याचा द्वेष करणे कार्यकर्त्यांनी सोडून दिले पाहिजे. श्रीमंतीचा द्वेष करून श्रीमंत होता येत नाही त्याचप्रमाणे श्रीमंतांचा द्वेष करून श्रीमंतांचा सहयोग मिळवता येत नाही. त्यांनी तुमच्यावर प्रेम, स्नेह, आत्मीयता, आपुलकी या भावनांचा वर्षाव करायला हवा असेल तर आधी प्रथम तुम्ही तुमच्याकडून त्यांना या भावनांचा अनुभव दिला पाहिजे.
तुम्ही कोण आहात हे जोपर्यंत या सधन माणसाला कळत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी का आणि काय करायचे हे त्याला समजत नाही. प्रत्येकाच्या हृदयात एक राम आणि एक रावण असतो. तुम्ही द्वेष करण्याच्या नादात रावणाचे नाव घ्याल तर रामायणातल्या वानरसेनेप्रमाणे तुमची गत होईल. तुम्ही रामनाम घ्याल तर तुमच्या कार्यात "रामावतार' होईल. डोंगरात "एको पॉईंट'वर जशी तुम्ही घालाल तिच हाक प्रतिध्वनी होऊन येते तशी तुम्ही "सधन' माणसाला जशी हाक घालाल तसा "प्रतिध्वनी' येईल. आंबा झाडावर तयार होतो पण तो पिकतो इतर आंब्यांसोबत गवत अंथरून घातलेल्या आढीमध्ये. तसे "सधन' माणसाच्या मनाचे आंबे समाजाच्या आढीत घालून पिकवले की ते रसाळ मधुर होतात. म्हणून आंबे आपोआप झाडावर पिकण्याची वाट न पाहता काढून आढी लावायची असते.
सधन माणसांच्या मनातला देव जागा करणं ही माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण माणसातला माणूस जागा करणं ही गोष्ट माणसाला शक्य आहे. आपल्याला आपल्या साधन-संपत्तीच्या संकलनासाठी दानाच्या योगदानासाठी माणसांचीच गरज आहे आणि माणसातला माणूस जागवणं म्हणजे माणुसकी जागवणं. माणुसकीची मोठी सुंदर व्याख्या गौतम बुद्धांनी केलेली आहे. मी माझे, मला, ऐवजी आपण, आपले, आपल्याला या भूमिकेत जाणे म्हणजे माणुसकी. इतक्या साध्या सोप्या शब्दात गौतम बुद्ध सांगून गेले आहेत. ज्ञानेश्र्वर "हे विश्र्वची माझे घर, ऐसि मति जयाची स्थिर' त्याला माणुसकी कळली असे म्हणतात. "तुका आकाशाएवढा' म्हणत तुकारामाने अंतरंगातल्या जगलेल्या माणुसकीचा अविष्कार आभाळाएवढा असल्याचे सांगितले. महंमद पैगंबर माणुसकीला त्यांच्या अनुभवातील उपमा देताना सांगतात, माणुसकी म्हणजे वाळवंटात गवसणारा आणि तृष्णार्ताची तहान भागवणारा झरा आहे म्हणतात. भगवान येशू ख्रिस्तांनी माणुसकी-ह्युमॅनरी म्हणजे वृक्षाची सावली आहे असे सांगितले. भगवद्‌गीतेत माणुसकीला युगधर्म, स्वभावधर्म, यापेक्षा श्रेष्ठ असा मनुष्यधर्म मानून पशू आणि माणसातला फरक म्हणजे माणुसकी असा निर्वाळा दिला आहे. गुरुनानक करुणा ही आई तर कर्तव्य हा बाप, त्यांचे अपत्य माणुसकी मनुष्यधर्म मानतात.
सधन माणसाच्या मनात माणुसकी जागवली की तो स्वत:पलीकडे जाऊन बघायला शिकेल आणि त्यावेळी आपण त्याला दिसू अशी काळजी स्वयंसेवी संस्थेने घेतली तर तो त्याच्या करुणेचे पाणी समाज सिंचनासाठी धाडण्यासाठी पाट कॅनॉल म्हणून तुमच्या एन.जी.ओ.चा वापर करू शकेल.
21 व्या शतकातल्या सधन माणसाला समजून घेतल्याशिवाय त्याला "अपील' करता येणार नाही. ख्रिश्र्चन धर्माने तत्कालीन श्रद्धा, अंधश्रद्धांच्या आधारे चर्चकरीता धन संकल्प करण्यासाठी करुणा, कर्तव्यापेक्षाही पापशालन, पापमुक्तीच्या संकल्पनेचा वापर कित्येक शतके केला. एका पोपने तर दानधर्मासाठी वेगवेगळ्या मूल्यांचे "पास' काढून थेट स्वर्गप्राप्तीची तिकीट विक्रीही करून दाखवली. आजच्या भारतीय सधन वर्ग पूर्वीच्या श्रीमंतांप्रमाणे पाप-पुण्य-प्रायश्र्चित्ताच्या संकल्पनांना दाद देणे अवघड आहे. नीती-अनिती कशाही मार्गाने पैसा मिळवा शेवटी तो पैसा आहे आणि बाजारात काळा-गोरा, चांगला-वाईट, कायदेशीर-बेकायदेशीर असे काहीही नसते पैसा हा पैसा असतो. हे त्याने अनुभवलेले असल्यामुळे त्याच्यादृष्टीने "सबसे बडा रुपय्या' असतो. मग काय सांगितले तर त्याला या सबसे बडा झालेल्या रुपय्या पेक्षा "बडे' असे काही आहे आणि ते आपल्याला अजून मिळालेले नाही, असे जाणवेल.
भोगाकडून एकदम त्यागाकडे नेणे शक्य नसते म्हणून अशा सधन माणसाला सहभागासाठी प्रवृत्त करणे हीदेखील मोठी महत्त्वाची गोष्ट आहे हे लक्षात घ्यायला हवे. सधन माणसाला सहभागासाठी प्रवृत्त केल्याशिवाय त्याच्या मनातील सद्‌भावना कृतीत उतरणार नाहीत. मग दानासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगासाठी सधन व्यक्तींना प्रवृत्त करण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी वाद नव्हे तर संवाद प्रस्थापित करावा लागेल. आपल्याला जे सांगायचे आहे तेच त्यांना म्हणायचे होते अशी आत्मप्रचितीची भावना द्यावी लागेल. सधन माणसांना असे वाटले पाहिजे की हे सगळे केव्हातरी आपल्याही सब कॉन्शस माईंडमध्ये आले होते पण ते मनातून जीवनात आले, ना उक्तीतून कृतीत प्रगटले.
त्या सधन माणसाला स्वयंसेवी संस्थेच्या वक्त्या-प्रवक्त्याचे बोलणे ऐकून असे वाटले पाहिजे की, हे कुणी बाहरेचा माणूस नव्हे तर "अरे हा तर माझा आजवर दबून राहिलेला आवाज बोलतो आहे' हा माझ्यातला "मी' जागा होतोय. मीच जणू आज माझ्याशी बोलतोय. "बाहेरूनी आला परी आतलाची झाला, आतमधी होता, बाहेरी असा आला, आतला बाहेरी एकरूप झाला' या समर्थांच्या दासबोधातील प्रत्ययाचा अनुभव आपले बोलणे ऐकताना त्या सधन माणसाला झाला पाहिजे.
स्वयंसेवी संस्थेचा उद्देश स्वत:करता दान मिळवणे एवढाच मर्यादित असेल तर त्याला धंदा कळला पण सार्वजनिक जीवनाचा धर्म कळला नाही, असे खेदाने म्हणण्याची वेळ येईल. आपल्याला धनापलीकडे सधन "माणूस' हा तेवढाच हवा आहे. जर त्याचा सहभाग या सहयोगामागे नसेल तर योगायोगाने मिळालेली देणगी एवढेच त्याचे महत्त्व राहील. पण त्याच्या धनाइतकेच त्याचे मन आपल्याला कार्यात येणे आवश्यक आहे. ही आंतरिक उर्मी जेव्हा स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रबळ ठरेल तेव्हा तन+मन+धन+क्षण = (वेळ) या चारही गोष्टी त्या सधन माणसाकडून मिळतील आणि मग तोही दाता नव्हे तर तुमचा कार्यकर्ता होऊन इतर साधनांसाठी साधन म्हणून तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. स्वयंसेवी संस्थेच्या कार्याचा कस आणि प्रभाव वाढविणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. मतलब साधणे हा मानवी स्वभाव आहे. पण समाजाचा विचार हा शिकावा, शिकवावा लागतो. महात्मा गांधींनी सात बदकर्मे, पापकर्मे सांगितली होती. त्या सात पाप कर्मांपासून समाजाला दूर करणे. मुक्त करणे हे स्वयंसेवी संस्थांचे काम आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रात काम करीत असो. सधन व्यक्तींना धार्मिक पापपुण्याच्या कल्पनांपेक्षा महात्मा गांधींनी सांगितलेल्या या सात पापकर्मांपासून परावृत्त होण्यासाठी आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यात प्रवृत्त होण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे. कारण या सात पापकर्मातून मुक्ती हाच खऱ्या सुखाचा आणि सार्थक मन:शांतीचा मार्ग आहे हे आपण सधन माणसांना सांगितले तर ते भोगाकडून त्यागाकडे जाण्याच्या मार्गावर निघून सहभागाच्या आणि हविर्भागाच्या (हविर्भाग म्हणजे आहुती यज्ञात टाकतात ती) टप्प्यावर हळूहळू येतील. सधन समाज हा कधीच क्रांती स्विकारीत नाही तर उत्क्रांतीच्या मार्गानेच परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होतो हे लक्षात ठेवायला हवे. त्यांची मन:स्थिती बदल्याखेरीज आपली परिस्थिती त्यांच्या सहकार्याने सुधारणार नाही.
महात्मा गांधींनी सांगितलेली सात पापकर्मे अशी-
1) तत्वहीन राजकारण- झेश्रळींळली थळींर्हेीीं झीळपलळश्रिशी
2) नीतिमत्तारहित व्यापार- उेााशीलश थळींर्हेीीं ोीरश्रळींू
3) कष्टविना संपत्ती- थशरश्रींह थळींर्हेीीं थेीज्ञ
4) चारित्र्यविना शिक्षण- एर्वीलरींळेप थळींर्हेीीं उहरीरलींशी
5) मानवतेविना विज्ञान- डलळशपलश थळींर्हेीीं र्कीारपळींू
6) विवेकहीन सुखोपभोग- झश्रशर्रीीीश थळींर्हेीीं उेपीलळशपलश
7) त्यागरहित भक्ती- थेीीहळि थळींर्हेीीं डरलीळषळलश
अभिलाषापूर्तीच्या हव्यासातून घडणाऱ्या या सात पापकर्मा-बदकर्मांपलीकडे सत्कर्माचे म्हणूनही काही सुख, आनंद आणि समाधान, मन:शांती आहे आणि ती देणारी माध्यम म्हणजे आमची स्वयंसेवी संस्था आहे. हे पटवून दिले तर सधन माणसे भोगाकडून सहभागाकडे यायला तयार होतील. प्रथम साक्षीदार आणि मग त्या कार्यातले साथीदार होतील.

Friday, July 17, 2009

लोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक महाराष्ट्र शासनाचे "भूषण' गगराणी!

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
लोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक
महाराष्ट्र शासनाचे "भूषण' गगराणी!
महाराष्ट्र शासनाची कार्यक्षमता, कार्यकुशलता, लोकाभिमुखता, लोकप्रियता आणि प्रतिमा ज्या काही ज्येष्ठ, बुद्धीमान, कर्तृत्ववान अधिकाऱ्यांमुळे, अखिल भारतात गौरवाचा विषय झाली आहे. त्यापैकी एक आहेत प्रसिद्धी खात्याचे सचिव भूषण गगराणी! आपली सद्‌सद्‌विवेकबुद्धी प्रमाण मानून प्रशासकाची भूमिका निभावत असल्याने सरकार कोणत्याही पक्षाचे किंवा मंत्री कोणत्याही स्वभाव, कार्यशैली, विचारशैलीचे असले तरी, भूषणजी त्यापुढे दबले, नमले नाहीत किंवा प्रशासकीय नैतिक, कायदेशीर अलिखित-लिखित आचारसंहितेशी त्यांनी कधी प्रतारणाही केली नाही. प्रत्येक पद हे त्यांनी आव्हान समजून स्विकारले. त्या पदावरुन काम करीत असताना महाराष्ट्राची प्रतिष्ठा, प्रतिमा, शान वाढविण्याचा निष्ठेने, जाणीवपूर्वक प्रयत्न केला. सरकारी नोकरीत साच्यात राहून कधी नवे-हवे ते घडवता येत नाही. नवे साचे, पद्धती, मार्ग शोधून दरवेळी नव्याने पुढे येणाऱ्या समस्यांचे समाधान, उपाय शोधावे लागतात. संवेदनाशील, हरघडी परिवर्तनशील परिस्थितीला सामोरे जाऊन निरगाठीही सोडवून न्याय देण्याचे अतुलनीय कौशल्य असलेले अधिकारी म्हणून मंत्रालयात भूषण गगराणी यांचा लौकिक आहे. दरारा आहे.
चार्ल्स मॉरीस या विचारवंत सेनापतीचे एक वचन आहे. तो म्हणतो "एका बकरीच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 सिंहांच्या सैन्यापेक्षा मला अधिक भय वाटतं ते एका सिंहाच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 बकऱ्यांच्या सैन्यांच' खाते प्रमुख हा असा "सेनापती सिंह' असावा लागतो, जसे भूषण गगराणी आहेत हे त्यांनी जेव्हा ज्या खात्याचे प्रमुखपद भूषविले तिथे दाखवून दिले आहे. भूषणजी राजकारणात असते तर उत्तम नेते झाले असते असे विशेष नेतृत्वगुण त्यांच्यामध्ये आहेत. भूषणजीं मधील कृतीशील सद्‌भावना हे त्यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उत्तम चारित्र्य आणि त्याचप्रमाणे वागण्याचे धैर्य भूषणजींपाशी आहे. राज्य सरकारची यशस्विता ही बुद्धिमान शासक, कार्यक्षम प्रशासक, नागरिकांचा सजग-सक्रिय सहभाग असलेली लोकशाही, मुबलक साधन-संपत्ती आणि जनसामान्यांची प्रगती, विकासाची मन:पूर्वक इच्छा यावर अवलंबून असते. स्वराज्याचे सुराज्य करणाऱ्या या घटकांमध्ये भूषण गगराणींसारखे कार्यक्षम अधिकारी म्हणजे भक्कम आधारस्तंभ असतात.
भूषण गगराणी स्वत: कुशल प्रशासक आहेत. इतकेच नव्हे तर पुढाकार घेऊन "टीमवर्क' उभे करण्याच्या स्वभावामुळे ते इतर सहकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना प्रेरित करतात. प्रामाणिकपणाने परिश्रम करण्यास प्रवृत्त करतात हे आम्हांला महत्त्वाचे वाटते. सु-व्यवस्थापनावर खात्याच्या कारभाराची परिणामकारकता अवलंबून असते. चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणारा खातेप्रमुख असेल तर, खात्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात. भूषण गगराणींसारख्या श्रेष्ठ-ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक, भावनैक, वैचारिक भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये देखील पडत असल्यामुळे खात्याची कार्यक्षमता, लोकाभिमुखता आणि प्रतिष्ठा वाढते यात शंका नाही. भूषणजींनी कधी नैतिक मूल्यांशी तडजोड केली नाही. प्रशासकीय आचारसंहितेचा भंग केला नाही. प्रत्येकाने आपले काम चोख आणि प्रामाणिकपणे बजावले तर शासन आपोआप आपल्या कर्तव्यात यशस्वी ठरेल असे त्यांचे सूत्र आहे. नैतिकतेने वागण्याचीही कधी कधी एक किंमत द्यावी लागते आणि त्यासाठी काळजात हिंमत असावी लागते, तशी हिंमत असलेल्या महाराष्ट्रातील उच्च श्रेणीच्या अधिकाऱ्यांपैकी भूषण गगराणी हे एक आहेत.
प्रशासनात विश्र्वासार्हता हा पाया असतो. भूषण गगराणी यांच्या प्रशासकीय शैलीत ही विश्र्वासार्हता सत्ताधारी मंत्री आणि सामान्य जनता या दोघांमध्ये कटाक्षाने जपण्याचा प्रयत्न सातत्याने जाणवतो. मंत्री, जनता, सहकारी, कर्मचारी यांचा विश्र्वास संपादन केल्याखेरीज खाते प्रमुख यशस्वी होऊ शकत नाही याचे भान भूषणजींना आहे. विश्र्वासार्हतेचा पाया हा पारदर्शिता असतो. त्यामुळे भूषणजींच्या कामकाजात पारदर्शकता सर्वत्र सदैव असते, हे ओघानेच आले. प्रश्र्न विचारणारा नव्हे तर उत्तरे देणारा, उत्तरे शोधून काढणारा भूषणजींसारखा अधिकारीच खात्यातील अनेक नित्य आणि नैमित्तिक समस्यांची कोंडी फोडू शकतो. भूषणजींसारखा विचारी, विवेकी अधिकारी जाणतो की एकेकटा अधिकारी, कर्मचारी अपेक्षित रिझल्टस्‌ देऊ शकत नाही. सर्वांनी मिळून आपापल्या अधिकार कक्षेतील छोटीशी कृती केली तरी त्याचा सामायिक, सामूहिक परिणाम फार मोठा असतो. प्रशासनात फार अवघड गुंतागुंतीचे पेचप्रसंग क्वचित उद्‌भवतात. दैनंदिन कामकाजात असतात ते सहज, साधे, सोपे, सरळ मुद्दे आणि त्यांची स्वाभाविक, कायदा आणि नीतीमत्तेच्या चौकटीतील सोडवणूक, साधे निर्णय, सोप्या मार्गाने, "ऑन दि स्पॉट' घेऊन पूर्वग्रहविरहित दृष्टीने आणि कुणाविरुद्ध किंवा कुणाच्या बाजूने असा पक्षपात न करता दिले तर प्रशासन कार्यक्षम, न्यायी, जलदगतीने कारभार करणारे आहे ही भावना जनमानसात निर्माण होते हे ओळखलेल्या भूषण गगराणी यांनी जनतेची नाडी अचूक ओळखली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
शब्दाला जागणारा अधिकारी हा भूषण गगराणी यांचा लौकिक आहे. "शासन-प्रशासन व्यवस्था ही गोष्ट काहीतरी गूढ धाक बाळगण्यासारखी नसून, आपलीच आहे, आपल्यासाठी आहे, आपला मित्र आहे, असा एक समान नात्याचा विश्र्वास प्रशासनाबाबत जनतेत हवा' असा एक मूलभूत मुद्दा ख्यातनाम विचारवंत आणि "चाणाक्य' ग्रुपचे प्रणेते अविनाश धर्माधिकारी यांनी मांडला आहे. भूषण गगराणी यांचा प्रयत्न सरकारची अशी प्रतिमा उभारण्याचा आहे आणि म्हणूनच ते ज्या खात्याची सूत्रे हाती घेतात तिथे हे "मैत्री'चे संबंध आमजनतेशी प्रस्थापित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न जाणवतो. भूषणजी नुसते सल्ले देणारे अधिकारी नाहीत. कृतीतून स्वत: अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर असतो. समस्या सोडविण्याची तीव्र इच्छा, दूरदृष्टी आणि त्याप्रमाणे वागण्याची जिद्द असलेले असे ते अधिकारी आहेत. प्रत्येक समस्येवर उपाय असतो असे ते मानतात त्यामुळे त्यांच्याकडे एखादी समस्या घेऊन कुणी गेला आहे आणि निराश, हतबल, अगतिक होऊन "डेड एन्ड' अनुभवून परत आला आहे, असे कधीही होत नाही.
"माझ्या पदावरून मला माझ्या देशासाठी, राज्यासाठी, माझ्या बांधवांसाठी जे जे करता येईल ते ते मी करीन' अशा व्रताने वागणारे भूषणजींसारखे अधिकारी हिच सामान्य जनतेची आशा असते. आजकाल कर्तव्य हा शब्द विसरल्यासारखे वागणारे अधिकारी जागोजागी दिसत असताना भूषणजींसारखे अधिकारी "सारेच दिवे मंदावलेले नाहीत' हा दिलासा देतात. भूषण गगराणींच्या स्वभाव वैशिष्ट्याचा अगदी एक वैयक्तिक असा अनुभव आम्हाला नमूद करावासा वाटतो. आम्ही आमच्या "व्हास्ट मिडीया'तर्फे रोज सकाळी अनेक व्ही.व्ही.आय.पी.आणि लोकप्रतिनिधी, लोकसेवकांना देशभर सुविचाराचे "कोटेशन्स'चे एस.एम.एस. पाठवतो. केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य, खासदार, आमदार, नगरसेवक, आय.ए.एस., आय.पी.एस.अधिकारी अशा 20 हजार लोकांकडे हे एस.एम.एस. जातात. प्रेरणादायी, विचाराला चालना देणारे, मार्गदर्शक, बोधप्रद असे हे एस.एम.एस.असतात. ते आवडल्याचे, उपयुक्त वाटल्याचे, सकाळीच त्यामुळे एक नवा प्रेरक विचार मिळाल्याचे, धन्यवादाचे असे असंख्य फोनकॉल्स, एस.एम.एस. आम्हांला येतात. आम्हांलाही आपण काहीतरी उपयुक्त सामाजिक प्रबोधनात्मक काम करीत असल्याबद्दल धन्यता वाटते. हजारो कोटेशन्स वाचून त्यातून निवडक वेचून काढण्यासाठी घेतलेल्या श्रमांचे अशा प्रतिक्रिया आल्या की सार्थक झाल्यासारखे वाटते. रोज, नियमित आणि प्रदीर्घ काळ असे एस.एम.एस. पाठविणारी (आणि तेही विनामूल्य) "व्हास्ट मिडीया' ही देशातली एकमेव संस्था असून काही जणांनी या विक्रमाची नोंद "लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये होऊ शकते असे म्हटले आहे.
तर आम्ही ज्या मान्यवर ज्येष्ठ अधिकाऱ्यांना हे "इनस्पायरिंग कोटेशन्स'चे एस.एम.एस.पाठवतो. त्यात भूषण गगराणी यांचा समावेश आहे. एक दिवस त्यांनी कळवले की,"अभिजीत, मला तू पाठवतोस ते प्रेरक कोटेशन्सचे एस.एम.एस. अतिशय आवडतात. माझ्या सकाळची सुरुवात त्यामुळे सुखद, सुंदर आणि थॉट प्रव्होकींग होते. पण मी महिनाभर परदेशी जातो आहे. माझा मोबाईल या काळात बंद असेल तर तू मी परतल्यावर पुन्हा पूर्ववत एस.एम.एस.पाठव, पण तोपर्यंत तुला उगाच भूर्दंड नको म्हणून मुद्दा कळवतो आहे. थॅंक्स!' आम्ही भूषण गगराणींच्या या कृतीने भारावून गेलो. कोटेशन्स आवडतात हे कळवणारे भूषणजी आपण महिनाभर नाही त्या काळात अभिजीत स्व खर्चाने पाठवतो त्या एस.एम.एस.चा भुर्दंड पडू नये म्हणून इतकी काळजी घेतात ही अक्षरश: हृदयस्पर्शी गोष्ट म्हणावी लागेल. त्याहीपेक्षा भूषणजींनी परदेशातून महिनाभराने परतल्यानंतर कळवले की, अभिजीत मी परतलो आहे, मला माझा मॉर्निंग ब्रेकफास्ट-थॉट प्रव्होकींग इनस्पायरिंग एस.एम.एस.चा सिलसिला आता पुन्हा सुरू कर. ग्रेट! आम्ही रोमांचित झालो. आता मॉर्निंग एस.एम.एस.साठी कोटेशन्स सिलेक्ट करताना आम्हाला दरवेळी भूषणजींची न चुकता आठवण येते, वाटते, एवढ्या थोर व्यक्ती, ज्येष्ठ-श्रेष्ठ अधिकारी आपले हे एस.एम.एस.आवर्जून वाचतात तेव्हा आपणही त्यांचे समाधान होईल, अशा दर्जाचे एस.एम.एस.निवडून पाठवले पाहिजे. भूषण गगराणी हे खरोखरच महाराष्ट्र शासनाचे भूषण ठरावेत असे अधिकारी आहेत यात शंका नाही. महाराष्ट्र "महा'राष्ट्र झाला आहे तो भूषण गगराणींसारख्या अशाच महान अधिकाऱ्यांमुळे!

लोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक महाराष्ट्र शासनाचे "भूषण' गगराणी!

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
लोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक
महाराष्ट्र शासनाचे "भूषण' गगराणी!
महाराष्ट्र शासनाची कार्यक्षमता, कार्यकुशलता, लोकाभिमुखता, लोकप्रियता आणि प्रतिमा ज्या काही ज्येष्ठ, बुद्धीमान, कर्तृत्ववान अधिकाऱ्यांमुळे, अखिल भारतात गौरवाचा विषय झाली आहे. त्यापैकी एक आहेत प्रसिद्धी खात्याचे सचिव भूषण गगराणी! आपली सद्‌सद्‌विवेकबुद्धी प्रमाण मानून प्रशासकाची भूमिका निभावत असल्याने सरकार कोणत्याही पक्षाचे किंवा मंत्री कोणत्याही स्वभाव, कार्यशैली, विचारशैलीचे असले तरी, भूषणजी त्यापुढे दबले, नमले नाहीत किंवा प्रशासकीय नैतिक, कायदेशीर अलिखित-लिखित आचारसंहितेशी त्यांनी कधी प्रतारणाही केली नाही. प्रत्येक पद हे त्यांनी आव्हान समजून स्विकारले. त्या पदावरुन काम करीत असताना महाराष्ट्राची प्रतिष्ठा, प्रतिमा, शान वाढविण्याचा निष्ठेने, जाणीवपूर्वक प्रयत्न केला. सरकारी नोकरीत साच्यात राहून कधी नवे-हवे ते घडवता येत नाही. नवे साचे, पद्धती, मार्ग शोधून दरवेळी नव्याने पुढे येणाऱ्या समस्यांचे समाधान, उपाय शोधावे लागतात. संवेदनाशील, हरघडी परिवर्तनशील परिस्थितीला सामोरे जाऊन निरगाठीही सोडवून न्याय देण्याचे अतुलनीय कौशल्य असलेले अधिकारी म्हणून मंत्रालयात भूषण गगराणी यांचा लौकिक आहे. दरारा आहे.
चार्ल्स मॉरीस या विचारवंत सेनापतीचे एक वचन आहे. तो म्हणतो "एका बकरीच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 सिंहांच्या सैन्यापेक्षा मला अधिक भय वाटतं ते एका सिंहाच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 बकऱ्यांच्या सैन्यांच' खाते प्रमुख हा असा "सेनापती सिंह' असावा लागतो, जसे भूषण गगराणी आहेत हे त्यांनी जेव्हा ज्या खात्याचे प्रमुखपद भूषविले तिथे दाखवून दिले आहे. भूषणजी राजकारणात असते तर उत्तम नेते झाले असते असे विशेष नेतृत्वगुण त्यांच्यामध्ये आहेत. भूषणजीं मधील कृतीशील सद्‌भावना हे त्यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उत्तम चारित्र्य आणि त्याचप्रमाणे वागण्याचे धैर्य भूषणजींपाशी आहे. राज्य सरकारची यशस्विता ही बुद्धिमान शासक, कार्यक्षम प्रशासक, नागरिकांचा सजग-सक्रिय सहभाग असलेली लोकशाही, मुबलक साधन-संपत्ती आणि जनसामान्यांची प्रगती, विकासाची मन:पूर्वक इच्छा यावर अवलंबून असते. स्वराज्याचे सुराज्य करणाऱ्या या घटकांमध्ये भूषण गगराणींसारखे कार्यक्षम अधिकारी म्हणजे भक्कम आधारस्तंभ असतात.
भूषण गगराणी स्वत: कुशल प्रशासक आहेत. इतकेच नव्हे तर पुढाकार घेऊन "टीमवर्क' उभे करण्याच्या स्वभावामुळे ते इतर सहकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना प्रेरित करतात. प्रामाणिकपणाने परिश्रम करण्यास प्रवृत्त करतात हे आम्हांला महत्त्वाचे वाटते. सु-व्यवस्थापनावर खात्याच्या कारभाराची परिणामकारकता अवलंबून असते. चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणारा खातेप्रमुख असेल तर, खात्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात. भूषण गगराणींसारख्या श्रेष्ठ-ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक, भावनैक, वैचारिक भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये देखील पडत असल्यामुळे खात्याची कार्यक्षमता, लोकाभिमुखता आणि प्रतिष्ठा वाढते यात शंका नाही. भूषणजींनी कधी नैतिक मूल्यांशी तडजोड केली नाही. प्रशासकीय आचारसंहितेचा भंग केला नाही. प्रत्येकाने आपले काम चोख आणि प्रामाणिकपणे बजावले तर शासन आपोआप आपल्या कर्तव्यात यशस्वी ठरेल असे त्यांचे सूत्र आहे. नैतिकतेने वागण्याचीही कधी कधी एक किंमत द्यावी लागते आणि त्यासाठी काळजात हिंमत असावी लागते, तशी हिंमत असलेल्या महाराष्ट्रातील उच्च श्रेणीच्या अधिकाऱ्यांपैकी भूषण गगराणी हे एक आहेत.
प्रशासनात विश्र्वासार्हता हा पाया असतो. भूषण गगराणी यांच्या प्रशासकीय शैलीत ही विश्र्वासार्हता सत्ताधारी मंत्री आणि सामान्य जनता या दोघांमध्ये कटाक्षाने जपण्याचा प्रयत्न सातत्याने जाणवतो. मंत्री, जनता, सहकारी, कर्मचारी यांचा विश्र्वास संपादन केल्याखेरीज खाते प्रमुख यशस्वी होऊ शकत नाही याचे भान भूषणजींना आहे. विश्र्वासार्हतेचा पाया हा पारदर्शिता असतो. त्यामुळे भूषणजींच्या कामकाजात पारदर्शकता सर्वत्र सदैव असते, हे ओघानेच आले. प्रश्र्न विचारणारा नव्हे तर उत्तरे देणारा, उत्तरे शोधून काढणारा भूषणजींसारखा अधिकारीच खात्यातील अनेक नित्य आणि नैमित्तिक समस्यांची कोंडी फोडू शकतो. भूषणजींसारखा विचारी, विवेकी अधिकारी जाणतो की एकेकटा अधिकारी, कर्मचारी अपेक्षित रिझल्टस्‌ देऊ शकत नाही. सर्वांनी मिळून आपापल्या अधिकार कक्षेतील छोटीशी कृती केली तरी त्याचा सामायिक, सामूहिक परिणाम फार मोठा असतो. प्रशासनात फार अवघड गुंतागुंतीचे पेचप्रसंग क्वचित उद्‌भवतात. दैनंदिन कामकाजात असतात ते सहज, साधे, सोपे, सरळ मुद्दे आणि त्यांची स्वाभाविक, कायदा आणि नीतीमत्तेच्या चौकटीतील सोडवणूक, साधे निर्णय, सोप्या मार्गाने, "ऑन दि स्पॉट' घेऊन पूर्वग्रहविरहित दृष्टीने आणि कुणाविरुद्ध किंवा कुणाच्या बाजूने असा पक्षपात न करता दिले तर प्रशासन कार्यक्षम, न्यायी, जलदगतीने कारभार करणारे आहे ही भावना जनमानसात निर्माण होते हे ओळखलेल्या भूषण गगराणी यांनी जनतेची नाडी अचूक ओळखली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
शब्दाला जागणारा अधिकारी हा भूषण गगराणी यांचा लौकिक आहे. "शासन-प्रशासन व्यवस्था ही गोष्ट काहीतरी गूढ धाक बाळगण्यासारखी नसून, आपलीच आहे, आपल्यासाठी आहे, आपला मित्र आहे, असा एक समान नात्याचा विश्र्वास प्रशासनाबाबत जनतेत हवा' असा एक मूलभूत मुद्दा ख्यातनाम विचारवंत आणि "चाणाक्य' ग्रुपचे प्रणेते अविनाश धर्माधिकारी यांनी मांडला आहे. भूषण गगराणी यांचा प्रयत्न सरकारची अशी प्रतिमा उभारण्याचा आहे आणि म्हणूनच ते ज्या खात्याची सूत्रे हाती घेतात तिथे हे "मैत्री'चे संबंध आमजनतेशी प्रस्थापित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न जाणवतो. भूषणजी नुसते सल्ले देणारे अधिकारी नाहीत. कृतीतून स्वत: अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर असतो. समस्या सोडविण्याची तीव्र इच्छा, दूरदृष्टी आणि त्याप्रमाणे वागण्याची जिद्द असलेले असे ते अधिकारी आहेत. प्रत्येक समस्येवर उपाय असतो असे ते मानतात त्यामुळे त्यांच्याकडे एखादी समस्या घेऊन कुणी गेला आहे आणि निराश, हतबल, अगतिक होऊन "डेड एन्ड' अनुभवून परत आला आहे, असे कधीही होत नाही.
"माझ्या पदावरून मला माझ्या देशासाठी, राज्यासाठी, माझ्या बांधवांसाठी जे जे करता येईल ते ते मी करीन' अशा व्रताने वागणारे भूषणजींसारखे अधिकारी हिच सामान्य जनतेची आशा असते. आजकाल कर्तव्य हा शब्द विसरल्यासारखे वागणारे अधिकारी जागोजागी दिसत असताना भूषणजींसारखे अधिकारी "सारेच दिवे मंदावलेले नाहीत' हा दिलासा देतात. भूषण गगराणींच्या स्वभाव वैशिष्ट्याचा अगदी एक वैयक्तिक असा अनुभव आम्हाला नमूद करावासा वाटतो. आम्ही आमच्या "व्हास्ट मिडीया'तर्फे रोज सकाळी अनेक व्ही.व्ही.आय.पी.आणि लोकप्रतिनिधी, लोकसेवकांना देशभर सुविचाराचे "कोटेशन्स'चे एस.एम.एस. पाठवतो. केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य, खासदार, आमदार, नगरसेवक, आय.ए.एस., आय.पी.एस.अधिकारी अशा 20 हजार लोकांकडे हे एस.एम.एस. जातात. प्रेरणादायी, विचाराला चालना देणारे, मार्गदर्शक, बोधप्रद असे हे एस.एम.एस.असतात. ते आवडल्याचे, उपयुक्त वाटल्याचे, सकाळीच त्यामुळे एक नवा प्रेरक विचार मिळाल्याचे, धन्यवादाचे असे असंख्य फोनकॉल्स, एस.एम.एस. आम्हांला येतात. आम्हांलाही आपण काहीतरी उपयुक्त सामाजिक प्रबोधनात्मक काम करीत असल्याबद्दल धन्यता वाटते. हजारो कोटेशन्स वाचून त्यातून निवडक वेचून काढण्यासाठी घेतलेल्या श्रमांचे अशा प्रतिक्रिया आल्या की सार्थक झाल्यासारखे वाटते. रोज, नियमित आणि प्रदीर्घ काळ असे एस.एम.एस. पाठविणारी (आणि तेही विनामूल्य) "व्हास्ट मिडीया' ही देशातली एकमेव संस्था असून काही जणांनी या विक्रमाची नोंद "लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये होऊ शकते असे म्हटले आहे.
तर आम्ही ज्या मान्यवर ज्येष्ठ अधिकाऱ्यांना हे "इनस्पायरिंग कोटेशन्स'चे एस.एम.एस.पाठवतो. त्यात भूषण गगराणी यांचा समावेश आहे. एक दिवस त्यांनी कळवले की,"अभिजीत, मला तू पाठवतोस ते प्रेरक कोटेशन्सचे एस.एम.एस. अतिशय आवडतात. माझ्या सकाळची सुरुवात त्यामुळे सुखद, सुंदर आणि थॉट प्रव्होकींग होते. पण मी महिनाभर परदेशी जातो आहे. माझा मोबाईल या काळात बंद असेल तर तू मी परतल्यावर पुन्हा पूर्ववत एस.एम.एस.पाठव, पण तोपर्यंत तुला उगाच भूर्दंड नको म्हणून मुद्दा कळवतो आहे. थॅंक्स!' आम्ही भूषण गगराणींच्या या कृतीने भारावून गेलो. कोटेशन्स आवडतात हे कळवणारे भूषणजी आपण महिनाभर नाही त्या काळात अभिजीत स्व खर्चाने पाठवतो त्या एस.एम.एस.चा भुर्दंड पडू नये म्हणून इतकी काळजी घेतात ही अक्षरश: हृदयस्पर्शी गोष्ट म्हणावी लागेल. त्याहीपेक्षा भूषणजींनी परदेशातून महिनाभराने परतल्यानंतर कळवले की, अभिजीत मी परतलो आहे, मला माझा मॉर्निंग ब्रेकफास्ट-थॉट प्रव्होकींग इनस्पायरिंग एस.एम.एस.चा सिलसिला आता पुन्हा सुरू कर. ग्रेट! आम्ही रोमांचित झालो. आता मॉर्निंग एस.एम.एस.साठी कोटेशन्स सिलेक्ट करताना आम्हाला दरवेळी भूषणजींची न चुकता आठवण येते, वाटते, एवढ्या थोर व्यक्ती, ज्येष्ठ-श्रेष्ठ अधिकारी आपले हे एस.एम.एस.आवर्जून वाचतात तेव्हा आपणही त्यांचे समाधान होईल, अशा दर्जाचे एस.एम.एस.निवडून पाठवले पाहिजे. भूषण गगराणी हे खरोखरच महाराष्ट्र शासनाचे भूषण ठरावेत असे अधिकारी आहेत यात शंका नाही. महाराष्ट्र "महा'राष्ट्र झाला आहे तो भूषण गगराणींसारख्या अशाच महान अधिकाऱ्यांमुळे!

Wednesday, July 15, 2009

आगामी विधानसभा निवडणूक मतदारांनी लढवायची... जिंकायची!


अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत

आगामी विधानसभा निवडणूक मतदारांनी लढवायची... जिंकायची!
"गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आपल्याला कोण उमेदवार, का हवा?' या मतदारांच्या आम्ही घेत असलेल्या "एन्ट्री पोल'ला अद्‌भूत म्हणावा असा प्रतिसाद लाभतो आहे. हजारो वाचकांनी आणि मतदारांनी या कल्पनेचे स्वागत केले आहे. राजकीय पक्षांनी उमेदवार लादण्यापेक्षा जे मतदार त्याला मतदान करणार त्यांनाच आधी विचारून उभे करणे योग्य. या मुद्यावर मतदारांचा आम्हाला जबरदस्त पाठिंबा मिळातो आहे. प्रस्थापित नेते "एन्ट्री पोल' मधून आपला "पॉलिटिकल एक्झीट' होईल या भितीने हादरले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक ही युवा मतदारांच्या प्रभावाखालील निवडणूक असणार आहे. "एन्ट्री पोल' या अभिनव कल्पनेपाठोपाठ आज आम्ही आणखी एक क्रांतिकारी विचार "मुंबई मित्र'च्या माध्यमातून मांडत आहोत. युवा मतदारांना आमचे आवाहन आहे की, यावेळी प्रत्येक मतदारसंघात उमेदवार कोणताही निवडून आला तरी लोकांनी म्हटले पाहिजे "यावेळी मतदार जिंकला'.
निवडणूक प्रक्रियेचे दोन भाग असतात. एक प्रशासकीय आणि दुसरा राजकीय. दोन्ही ठिकाणी मतदाराने, निवडणूक "लढणे' मला अपेक्षित आहे. प्रशासकीय आघाडीवर "लढायचे' म्हणजे, मतदाराने नेमके काय करायचे? निवडणूक आयोगाची रचना आणि यंत्रणा समजावून घ्या. त्यात तुम्ही काय योगदान करू शकता? याची माहिती घ्या. तुम्ही स्वत:ची मतदार म्हणून नोंद करून घेतलीत? धन्यवाद! पण, "लढाई' तेव्हा होईल, जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या नागरिकांना विचारा झालात का मतदार? नोंदवलेत का नाव यादीत? मिळवलेत का फोटोसहित मतदार ओळखपत्र? नोंदवले नसेल त्यांना प्रश्र्न करा "का नाही नोंदवले?' जे म्हणतील "वेळ नाही' त्यांना "मी माझा वेळ काढतो, बरोबर येतो. तुम्ही थोडा वेळ द्या. चला. आपण तुमची मतदार यादीत नोंद करू.' कुणी म्हणाले "राहून गेले' तर सांगा "रेशनकार्डासाठी नाही ना टाळाटाळ केलीत? ते कसे जीवनावश्यक आधार वाटले. मग शिधापत्रिका पोटासाठी जेवढी महत्त्वाची, पत्याच्या, अस्तित्वाच्या पुराव्यासाठी जितकी मोलाची, तितकीच मतदार ओळख पत्रिका, तुमच्या देशाचा नागरिक म्हणून, अस्तित्वासाठी, भवितव्यासाठी महत्त्वाची आहे, हे ओळखून त्यासाठी चला.' एका मतदाराने मतदार यादीत नाव न घातलेल्या, 5 मतदारांना त्यासाठी प्रवृत्त करणे याला मी मतदाराची "लढाई' समजतो.
कदाचित प्रशासकीय यंत्रणेकडून काही नावे वगळली गेली असतील. ही मंडळी मग मतदानाच्या दिवशी जागी होतात. "आमचे नाव यादीत नव्हते, नाही तर...' वगैरे रडगाणे गातात. मतदार याद्यांची निदान आपल्या बिल्डींग किंवा चाळ किंवा कॉम्प्लेक्सपुरती छाननी, मतदार किंवा मतदारांमधील युवकांचे गट करू लागतील आणि प्रशासकीय यंत्रणेला हलवतील, त्या दिवशी मी मतदार "लढाईत' उतरले म्हणेन. मतदार यादीत रहात नसलेल्यांची नावे घुसडली, दोनदोनदा आली, निघून गेल्यावर ही कायम राहिली, बोगस वोटींगसाठी खोटी नावे टाकली, त्यावर "वॉचडॉग'च्या भूमिकेत जर नागरिक मतदार, स्वत:च्या मर्यादित परिसर क्षेत्रापुरते जर उतरले, तरी बोगस मतदानाने निवडणुकीचा खरा कौल बदलता येणार नाही. फार नाही 25-50 मतदारांची जबाबदारी, 5-5 युवकांच्या गटांनी आपापल्या परिसरात घ्यावी; मतदारांची नोंदणी करणं, बोगस नावं हुडकून काढणं, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणं, ही कामे आज नागरिक मतदार, आपले कर्तव्य मानीत नाहीत. हे काम राजकीय पक्षांचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं, उमेदवारांचं असं गृहीत धरलं आहे, हे चूक आहे. अयोग्य आहे. ही प्रशासकीय आघाडीवरील कामे, तुम्ही राजकीय नेत्याकार्यकर्त्यांवर सोपविली की, मग ते फक्त राजकीय हितसंबंधांचा विचार करून, आपल्याला मतदान करणाऱ्या किंवा न करणाऱ्या मतदारांपुरती करतात. मग ती मतदारांची "लढाई' होत नाही. प्रशासनाशी सहकार्य प्रसंगी संघर्ष करून ही कामे करण्यासाठी नागरिक मतदार पुढाकार घेतील, तेव्हा ती मतदारांची निवडणूक होईल. राजकीय पक्षांच्या उमेदवारांची रहाणार नाही.
उमेदवार नव्हे, तर मतदार जर या निवडणुकीत जिंकायला हवा असेल तर, सामान्य मतदारांनी, विशेषत: युवकांनी राजकीय आघाडीवरही निवडणुकीत उतरले पाहिजे. असा समज करून घेऊ नका की, मी प्रत्येक मतदाराने कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व्हावे, असे सुचवतोय, नाही, अजिबात नाही. मतदाराने राजकीय आघाडीवर निवडणूक "लढवायची' म्हणजे सर्व राजकीय पक्षांचे विचार समजावून घ्यायचे. मुद्दे लक्षात घ्यायचे. भूमिका विचारात घ्यायची. इतिहास आठवायचा. नेत्या, कार्यकर्त्यांप्रमाणेच उमेदवाराचे चरित्र-चारित्र्य तपासायचे. गेल्या 5 वर्षात सत्तेवर असो वा नसो, समाजाकरता त्यांनी काय केले? ते बघायचे. जाती, धर्म, पंथ, प्रदेश, भाषा या मुद्यांवर समतोल किंवा एकांगी पक्षपाती भूमिका घेतले असेल तर, ती आपल्याला मान्य आहे की अमान्य? या प्रश्र्नाचे उत्तर शोधायचे. आश्र्वासन, जाहीरनामे, पत्रके रद्दी न समजता वाचायची, एक दुसऱ्यांशी त्याची तुलना करायची, जमेल तेव्हा नेत्यांची, वक्त्यांची भाषणे ऐकायची, आपले कुटुंबिय, मित्र, सहकारी, सह रहिवासी यांच्याशी विविध पक्ष आणि उमेदवारांच्या गुणा व गुणांविषयी चर्चा करून, निष्कर्ष काढायचे. ही माझ्या मते "रक्ताचा एक थेंब न सांडता, हिंसाचार न करता केलेली वैचारिक लढाई' आहे आणि त्यासाठी तुम्ही मतदार राजकीय पक्षाशी संबंधित असण्याची गरज नाही. "मतदार' एवढी भूमिका पुरे आहे.
मतदार जागृत झाला, चौकस आला, निवडणूक प्रक्रियेत सक्रिय झाला की, मग राजकीय पक्षांची मतदारांना फसविण्याची, दिशाभूल करण्याची, संकुचित मुद्यांवरून त्याला चिथवण्याची, जात-धर्म प्रदेश अशा आव्हानांनी प्रक्षुब्ध करून, एक गठ्ठा मतदानासाठी प्रवृत्त करण्याची क्षमता घटते. साम, दाम, दंड, भेदाच्या साधनांनी, उमेदवार मतदारांना मतदान करण्यास, भाग पाडू शकत नाही. राजकीय पक्षाची विचारमूल्ये, चरित्र आणि उमेदवाराची जीवनमूल्ये व चारित्र्य यांचा विचार करून, मतदार तुलनात्मक विचार करून सद्‌सद्‌विवेक बुद्धीला स्मरून, समाजाचे, देशाचे, मतदारसंघाचे हित डोळ्यापुढे ठेवून मतदान करतात तेव्हा, ते मतदार मग त्या निवडणुकीतले उमेदवार होतात. नी "लढाई' मग त्यांची होते. कोणालाही, कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी विजयी झालेला असतो-मतदार! म्हणूनच मतदारांना उद्देशून मी म्हणतो आहे-निवडणूक मतदारांनी लढायची आणि जिंकायची आहे.

आरोग्य सेवा : सेवाभावापासून बाजारभावापर्यंत!

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
आरोग्य सेवा : सेवाभावापासून बाजारभावापर्यंत!
वैद्यकीय व्यवसायात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नवागताने पदवीदान समारंभात एक शपथ घ्यायची असते. तिला हिपोकॅ्रटिस ओथ-हिपोक्रॅटिसची शपथ म्हणतात. अडीच हजार वर्षांपूर्वीची ही शपथ आजही या व्यवसायामधील नैतिकता आणि सेवाभावाच्या भूमिकेचे प्रतिक आहे. ही शपथ अशी आहे-मी निष्ठापूर्वक शपथ घेतो की माझं आयुष्य मानवतेच्या सेवेत व्यतीत करीन. सद्‌सद्‌विवेक बुद्धीस आणि सभ्यतेस अनुसरून मी माझा व्यवसाय करीन. माझ्या रुग्णाचं आरोग्य हाच माझा प्रमुख विचार असेल. माझ्या रुग्णाने मला सांगितलेली गोपनीय खाजगी माहिती मी पूर्णपणे गुप्त ठेवीन. गर्भावस्थेत असलेल्या रुग्णासह प्रत्येक रुग्णाची मानवी प्रतिष्ठा मी जपेन, मानवी मूल्यांची अवहेलना मी लोभापायी लाभासाठी करणार नाही. रुग्ण सेवेच्या मोबदल्याव्यतिरिक्त अन्य अनैतिक मार्गाने रुग्णाच्या नकळत मी कोणताही आर्थिक व्यवहार करणार नाही.
हिपोक्रॅटिसची ही शपथ जर प्रामाणिकपणे पाळली जात असती तर आज वैद्यकीय व्यवसायाला धंद्याचे स्वरूप आले नसते. आजाराचा बाजार भरला नसता. व्यवहाराची जागा व्यापाराने घेतली नसती. "पैसा मिळवण्यासाठी कोणताही मार्ग अनुचित नाही' या एकविसाव्या शतकातील "गुरुमंत्रा'चा सर्वाधिक दुष्परिणाम आरोग्य सेवांवर झालेला आहे.
रुग्णाचे अनपेक्षितपणे निधन किंवा औषधोपचारांना विलंब अशा कारणांमुळे डॉक्टरांना मारहाण, दवाखाने इस्पितळांची मोडतोड अशा प्रकारांची वाढती संख्या, लोकांच्या मनात आरोग्य व्यवस्थांविषयी जो अविश्र्वास आणि असंतोष धुमसतो आहे त्याच ज्वालामुखीचा हिंसक प्रक्षोभक उद्रेक आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या ज्या प्रतिनिधीक संघटना आहेत. उदा. मेडिकल कौन्सील, मेडिकल असोसिएशन त्यांचा नेहमीचा युक्तिवाद आहे की,"वैद्यकीय व्यवसायातील काही थोड्या डॉक्टरांमुळे संपूर्ण व्यवस्था बदनाम होते.' पण "या थोड्या' डॉक्टरांवर आपणहून किंवा रुग्णांनी तक्रारी केल्यावर या कौन्सील किंवा असोसिएशन्सची कधी कारवाई केली आहे का? उलट अगदीच कायदेशीर कचाट्यात सापडून गुन्ह्याची नोंद होत नाही आणि प्रकरण पोलिसात, कोर्टात जात नाही तोपर्यंत कौन्सील, असोसिएशन "असल्या' डॉक्टरांचीही पाठराखण करून रुग्णावरील अन्यायाऐवजी झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करताना दिसतात.
वैद्यकीय व्यवसायाचा पाया नैतिकता हाच असायला हवा. शिक्षण आणि आरोग्य या दोन व्यवसायातून नैतिकतेचा आग्रह वगळता येणार नाही. वैद्यकीय सेवांमधील भ्रष्टाचार, गैरव्यवहार या व्यवसायाच्या नैतिक अध:पतनाचं प्रतिक आहे. हे अध:पतन रोखण्यासाठी संबंधित डॉक्टरांची इच्छा नाही, संघटना "युनियन' म्हणून फक्त डॉक्टरांच्या हितसंबंधांसाठी कटीबद्ध आहेत तर, कायदे आणि धोरणांची अंमलबजावणी करणारी शासकीय यंत्रणा अकार्यक्षम आणि संगनमताने या लबाडीत सामील आहे. परिणामी एकेकाळी "फॅमिली डॉक्टर' हा ज्या आरोग्य सेवेचा आधार होता त्यातच डॉक्टर आणि समाज यात वाढता दुरावा निर्माण होतो आहे.
शारीरिक-मानसिक आरोग्य हा "युनो'ने मूलभूत हक्क म्हणून मान्य केला आहे. भारतीय धर्म-संस्कृती-वैद्यक परंपरेत मानसिक संतुष्टी आणि शारीरिक सहनशक्ती याला अपरंपार महत्त्व दिलेले होते. मृत्यूला सामोरे जाण्याचे धैर्य सामान्यातल्या सामान्य माणसातही संस्कारांमधून निर्माण होत होते. वेदना सहन करण्याची शारीरिक शक्ती या मानसिकतेतून विकसित झाली होती. आज मात्र वैद्यकीय व्यवसाय तुम्हाला कितीही वय झाले तरी सुखाने मरुही देत नाही. किंबहुना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्याच 2003 मधील अहवालानुसार संपूर्ण आयुष्यात मिळून एखाद्या व्यक्तीचा औषधोपचारांवर जेवढा खर्च होतो, त्याहून अधिक त्याच्या वृद्धावस्थेतील अटळ अशा मृत्यूपूर्वीच्या शुश्रुषा-औषधोपचारात होतो. शरपंजरी शांतपणे पहुडणाऱ्या भिष्माच्या या देशात आता साध्या डोकेदुखीसाठीही वेदनाशामक गोळ्यांचा मारा केला जातो.
समाजाच्या जीवनमूल्यांशी औषधपद्धतीचा निकटचा संबंध असतो. अन्न आणि औषध यांचा विचार आयुर्वेदात एकत्रितपणे केलेला आहे. अन्नाला पर्याय म्हणून औषध हा (अ) विचार आधुनिक काळाची देणगी आहे. "सर्वांसाठी आरोग्य' हा सध्याचा जागतिक मंत्र आहे तर, आयुर्वेदाने "सर्वांसाठी अन्न' महत्त्वाचं मानलं आहे. पाश्र्चात्यांच्या अंधानुकरणाने आपण अन्नाऐवजी औषधाला प्राधान्य देणारी संस्कृती स्वीकारतो आहोत. आजही बहुसंख्य भारतीयांपुढील अन्न ही गरज आहे, औषध नव्हे. किंबहुना अन्नाची समस्या सोडवली तर त्यातल्या बहुसंख्यांकांना औषधाची गरजच राहणार नाही.
पाश्र्चात्यांच्या प्रभावाखाली वैद्यकीय व्यवसायाचा असा दावा आहे की, "आम्ही अनेक जुने असाध्य रोग नष्ट केले. पण नव्या रोगांची भर टाकण्यात याच वैद्यकीय क्षेत्राचा मोठा वाटा आहे. याकडे कसे दुर्लक्ष करता येईल? सामान्य माणसाच्या शरीरातील, मनातील नैसर्गिक संतुलन आधुनिक वैद्यक शास्त्राच्या कृत्रिम आणि अनैसर्गिक उपचारांमुळे ढळल्यामुळे निर्माण झालेले "डॉक्टरनिर्मित' रोग हिच आजची मोठी आरोग्यविषयक समस्या नाही का?'
काही रोगांच्या निर्मूलनाचे श्रेय वैद्यक शास्त्राने घेण्याआधी बदलत्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक वसाहतींच्या संदर्भांचेही योगदान लक्षात घ्यावे लागेल. साथीचे रोग कमी झाले याचे श्रेय रोगप्रतिबंधक लसींना, जंतूनाशकांना, घरांच्या नव्या प्रकाश-हवायुक्त रचनांना आहे. पण आजही कुपोषणामुळे उद्‌भवणाऱ्या आजारांमुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही. हृदयविकार फुफ्फुसाचे रोग, लठ्ठपणा, रक्तदाब, कर्करोग, संधिवात, मधुमेह, एडस्‌ आणि असंख्य मनोविकार यांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. याचे एक कारण आरोग्य व्यवस्थेचे "अनारोग्य' हे नाही का?
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.रामोदासा यांनी एक नवा महत्त्वाचा मुद्दा नुकताच मांडला आहे. ते म्हणतात,"ज्या ठिकाणी हवा आरोग्याला पोषक आहे, स्वच्छ आणि मुबलक पाणी आहे, लोकांना रोजगार कामधंदा बरा आहे आणि त्यामुळे डॉक्टरांना चांगली फी मिळू शकते अशाच ठिकाणी डॉक्टर मंडळी दवाखाने, इस्पितळे टाकायला उत्सुक असतात. म्हणूनच शहरांमधून आरोग्यसेवांमध्ये जीवघेणी व्यावसायिक स्पर्धा वाढत असताना जिथे या सेवांची खरी गरज आहे अशा ग्रामीण, आदिवासी क्षेत्रात किंवा झोपडपट्‌ट्यात मात्र सरकारी सेवेव्यतिरिक्त कोणत्याही खाजगी वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत.'
दरवेळी वैद्यकीय उपचार अपायकारक म्हणूनच आक्षेपार्ह असतो असे नाही. पेशंटकडून अधिकाधिक फी, केमिस्टकडून कमिशन, औषध कंपन्यांकडून नजराणे उकळण्याकरता डॉक्टर्स जो "व्यर्थ' उपचार करतात त्यामुळे पेशंटस्‌चे पैसे तर खर्च होतातच पण त्याची मानसिकता औषधावलंबी आणि आत्मविश्र्वास गमावणारी होते ही हानी अधिक चिंताजनक आहे. सकस, चौरस आहारामुळे टळू शकणाऱ्या आजारांवरही औषधोपचार आणि जीवनसत्त्वांच्या गोळ्यांचा कृत्रिम मारा केला जातो. चुकीची, अनावश्यक आणि बनावट औषधे यांनी उडविलेला हाहाकार हा तर आणखी एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. अँटीबायोटिक्समुळे एक उसळलेला आजार तात्काळ पण तात्पुरता आटोक्यात येतो तर, त्याचवेळी इतर आजार आणि दुर्बलतेची बीजे पेरून ठेवतो. पुढे अँटीबायोटिक्सलाही रोगजंतू दाद देईनासे झाले की डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी शस्त्रे परजून सिद्ध असतातच.
पाश्र्चात्य देशांमध्ये तर विमा कंपन्या आणि वैद्यकीय व्यावसायिक यांच्याशी साटेलोटे करून औषध कंपन्यांनी आरोग्यसेवांच्या हॉस्पिटल्सचे मेडिकल "मॉल'मध्ये रुपांतर करून टाकले आहे. मेडिकल टुरीझमच्या नावाखाली आता भारतात परदेशीयांच्या आरोग्य विषयक गरजा लक्षात घेऊन हॉस्पिटल्स उभी राहत आहेत. काही दिवसांनी मेडिकल टुरीझममुळे आज जशी फाईव्हस्टार हॉटेल्स सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत तशीच ही फाईव्हस्टार हॉस्पिटल्स भारतीयांच्या क्षमतेबाहेर जाऊन उच्च दर्जाच्या आधुनिक तंत्रापासून भारतीय वंचित होतील.
खा.शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. ते नेहमी म्हणतात की, या देशात दोन देश आहेत एक इंडिया दुसरा भारत. पण या देशात मेडिकल टुरीझमच्या नावाखाली आता एक "विदेश' निर्माण होतो आहे. आरोग्य म्हणजे जणू एखादी उपभोग्य वस्तू आहे आणि तिचे कारखान्यात उत्पादन करून "रेडी टू इट फूड' किंवा "रेडीमेंड शर्टा'सारखे ते विकत घेण्याची क्षमता असलेल्या कुणालाही देता येते या डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, औषध कंपन्या, फिटनेस-हेल्थ सेंटर्स-स्पा यांनी मार्केटिंग गिमिक्समधून निर्माण केलेल्या भ्रमाला उच्चभ्रूंप्रमाणेच सामान्य समाजही बळी पडताना दिसतो आहे. आयुर्वेदात अ-नैतिक वर्तन करणाऱ्या स्वार्थी, अज्ञानी वैद्याला "यमराज सहोदर' म्हटले आहे. (सहोदर म्हणजे बंधू) यम हालहाल करून मारतो तसा अयोग्य वैद्य हालहाल करून मारतो असे वर्णन आहे. प्राण आणि पैशाचे हरण करणाऱ्या आधुनिक वैद्यांना "यमराज सहोदर' म्हटले तर वावगे ठरेल का?
आयुर्वेदाचे किंबहुना प्राचीन भारतीय वैद्यक परंपरेचे हे वैशिष्ट्य होते की त्यात निसर्गात जे उपलब्ध होते त्याचाच वापर केला जाई. जिथे ज्या भूमित जो रोग तिथे त्याच भूमीतल्या वनस्पतींमध्ये त्याचे औषध असते, अशा आशयाच्या ऋचा वेदात आहेत आणि तेच या भारतीय वैद्यकाचे सूत्र होते. वैद्य झाडपाल्याने जखमा बऱ्या करीत. आजही अनेक प्राणी, पक्षी परिसरातल्या वनस्पतींचा असा उपयोग जन्मजात प्रेरणांनी करून स्वत:वर उपचार करताना आढळतात. नैसर्गिक प्रतिकारशक्तीच्या माध्यमातून रोगजंतुंवर मात केली जात असे. आता निरोगी व्यक्तिवरही काल्पनिक संभाव्य आजारांचा भयगंड निर्माण करून अ-नैसर्गिक रोगप्रतिबंधकाचा मारा गोळ्या, लसींच्या रुपाने केला जातो आहे. हेपिटायटीस बीच्या लसीचे अब्जावधी रुपयांचे स्कॅंडल हा त्याच गैरव्यवहाराचा हिमनगाच्या शिखरासारखा भाग आहे. प्रतिकारशक्ती कृत्रिमरित्या वाढवून त्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती मोडीत काढून माणसाला गोळ्या औषधांवर अवलंबून रहाणे भाग पाडले जाते आहे. विशिष्ट गुंतागुंतीच्या अवघड परिस्थितीत डॉक्टरांवर अवलंबून रहाणे आपण समजू शकतो पण, लहान सहान तक्रारींकरिता डॉक्टरांकडे धावण्याची काय गरज? ही मानसिकता वैद्यकीय व्यवसायाचे यश की अपयश? इस्पितळे म्हणजे मॉल तर दवाखाने म्हणजे दुकाने झाल्यावर दुसरे काय होणार? रुग्ण आता नुसता ग्राहक-कस्टमर नव्हे तर उपभोक्ता-कनझ्युमर झाला आहे. याचेच परिणाम म्हणजे डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स यांनाही आता "स्टेटस्‌ सिंबॉल' म्हणून नवश्रीमंत लोक "ट्रीट' करू लागले आहेत. अमुक डॉक्टर, तमुक हॉस्पिटलमध्ये आपण ट्रीटमेंट घेतो हाही आता ग्लॅमर प्रेस्टीजचा "गर्व से कहो'चा भाग झाला आहे. डॉक्टर्स आता फिल्मस्टार्स, मॉडेल्स, सोशलाईट इंडस्ट्रीयॅलिस्टप्रमाणे "पेज थ्री' वर झळकू आणि पार्ट्यांमधून मिरवू लागले आहेत. यामागील त्यांची आणि समाजाची मानसिकता समजून घेण्यासारखी आहे. यामुळे पूर्वीजसा झोपडपट्टीतला माणूसही परवडत नसेल. आणि साध्या औषधाने बरा होणारा रोग असेल तरी "डॉक्टर सुई मारा' सांगायचा तसे आता उच्चभ्रूच नव्हे तर मध्यमवर्गीयही कर्जबाजारी होत "नामवंत' डॉक्टर-स्पेशालिस्ट आणि "फेमस' हॉस्पिटलमागे धावू लागले आहेत.
सर्वाधिक आयकर "मेडिकल प्रोफेशन'मधील लोक चुकवतात असा आरोप केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच केला आहे. बिनपावतीचे व्यवहार डॉक्टर जेवढे करतात तेवढे फारतर बिल्डींग कन्स्ट्रक्शन व्यवसायात होत असतील. महागडी तपासणी, उपचार यंत्रे आणून मग त्यांची किंमत वसूल करण्याकरिता रुग्णांच्या माथी अनावश्यक तपासण्या मारणे हा तर आता डॉक्टरांचा युगधर्म तर दवाखाना हा खाटिकखाना समजून रुग्णांना "बळीचा बकरा' समजून ट्रीट करणे हा असंख्य डॉक्टरांचा स्वाभावधर्म झाला आहे.
आधुनिक औषधांमुळे वैयक्तिक, सामाजिक आरोग्यावर जणू आक्रमण चालू आहे. संपूर्ण जीवनाचे वैद्यकीकरण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आज याच मानसिकतेतून राज्य, केंद्र सरकारांचीही 40 टक्के बजेट आरोग्य-औषधोपचार सेवांसाठी खर्च होत आहेत. वास्तविक पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा, प्रदूषण, विरहित हवा-पाणी यावर अधिक खर्च व्हायला हवा. अन्नाचा अभाव, नित्कृष्ठ जीवनसत्त्वहीन आहार, अस्वच्छता यामुळे होणाऱ्या आजारांचे मूळ कारण दूर न करता आजारांवर उपचार करणे ही केंद्र-राज्य सरकारची प्राथमिकता आहे.
"सर्वांना औषधाऐवजी सर्वांना जीवनसत्त्वयुक्त अन्न आणि स्वच्छ पाणी' हे सूत्र हवे. पाश्र्चात्य देशांच्याही आता हे लक्षात येते आहे की औषधोपचारांवर ज्या प्रमाणात तिथली सरकारे खर्च वाढवीत आहेत त्या प्रमाणात आजारही उलट वाढत चालले आहेत. कारण आजार झाल्यावर ते बरे करण्यासाठी आकाशपाताळ एक करणारी सरकारे आजार होऊ नयेत म्हणून जे हवे ते करीत नाहीत. आधुनिक व्यसनांच्या यादीत आता औषधांच्या व्यसनांचा समावेश करण्याची वेळ आली आहे. आपली संस्कृतीच औषधमय होते आहे. आजाऱ्यांपेक्षा निरोगी माणसे आजाराच्या काल्पनिक भयगंडाने पछाडून अधिक औषधांच्या आहारी जात आहेत. "पी हळद-हो गोरी' असे होत नाही म्हणणाऱ्या भारतीयांची मात्र आता "इन्स्टंट कॉफी'सारख्या "इन्स्टंट एनर्जी' डिं्रक्सवरील श्रद्धा वाढत चालली आहे. "एक हॉटेल एका हॉस्पिटलसाठी पेशंटस्‌ची निर्मिती करते' ही म्हण आता खरी ठरते आहे. औषधांमध्येही आता कुणाला साधे औषध नको आहे, जालीम, अतिपरिणामकारक तात्काळ रिझल्ट देणारे हवे. मग त्याचे "साईड इफेक्टस्‌' नंतर काहीही होवोत.
हजारो वर्षे भारतातील वैद्यकीय व्यवस्था कुटुंबसंस्थेशी आणि ग्रामरचनेशी निगडीत होती. "आजीबाईचा बटवा' लहानपणापासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्या आरोग्याची काळजी वहात होता. परसातल्या वनस्पती आणि स्वयंपाक घरातल्या डबे-बरण्यात आजी-आई-मावशी-मामीला प्रत्येक दुखण्या-खुपण्यावरचा इलाज ठाऊक होता. सहन करणं, वेदनेची वाच्यता न करणं आणि गरजेशिवाय घरगुती औषधही न घेणं यात काही विशेष नव्हते. क्वचित ग्रामवैद्यापर्यंत प्रकरण पोचायचे. बाळंतपणासाठी आई-मावशीसोबत गावातलीच सुईण माहेरवाशीणीच्या-पहिलंटकरणीच्या सेवेला मायेनं हजर असायची. दवाखाना तालुक्याच्या गावी तर सरकारी इस्पितळ जिल्ह्याच्या ठिकाणी असायचं. आता "आजीबाई'ला सल्ला देण्याची हिंमत नाही आणि दिला तर ती मूर्ख ठरवली जाणार.
तहानलेल्याला पाणी पाजणे हा धर्म होता. त्यासाठी पैसे घेणे पाप होते. त्याकाळात "प्री-बिसलेरी इरा' मध्ये वैद्यदेखील बारा बलुतेदारांसारखा समाजव्यवस्थेत पैसे न घेता उपचार करीत होता. औषधांचा मोबदला घेणे अनैतिक मानले जात होते. आजार सहन करायला शिकले पाहिजे आणि आजार दाबून टाकून नव्हे तर मुळातून त्याच्या कारणाचे निवारण करून कायमचा बरा होण्यासाठी वेळ लागतो हे पूर्वी वडीलधारे समजावून सांगत. आता मुलाला शिंक आली तरी पप्पा-मम्मी घाबरेघुबरे होवून टी.व्ही.वरच्या जाहिरातीतली आठवतील तेवढी औषधे द्यायला आणि मलमे चोळायला सुरुवात करतात. निसर्गाची आणि शरीराची स्वत:ची अशी काळजी घेणारी रोगप्रतिकार-निवारण करणारी शक्ती असते हा भारतीय वैद्यकशास्त्राचा सिद्धांत आता विस्मृतीत गेला आहे.
वृद्धापकाळ हा काही रोग नव्हे पण वयोवृद्धांना जबरदस्तीने जगविण्याच्या प्रयत्नात आपण त्यांचे किती हाल, किती काळ करून आपल्या खोट्या समाधानाकरिता त्यांना वेदना सहन करायला लावत त्यांची सुटका करणारा मृत्यू लांबवत राहतो. वृद्धापकाळ ही अवस्था आहे. आजार नव्हे. पण आता वैद्यकाने आपल्या स्वार्थाकरता सुखाने मरणेही अशक्य केले आहे. परावलंबी, निरुपयोगी वेदनामय जीवनाची नैसर्गिक इतिश्री टाळून वैद्यकशास्त्र काय साधते? प्राचीन वैद्यकाला अशा अवस्थेतील "मुक्ती' मान्य होती.
प्राचीन काळी 96 टक्के माता एक वर्षांहून अधिक काळ मुलांना अंगावर पाजत असत आणि तेच या बाळांचे अन्न आणि औषध होते. आज 96 टक्के स्त्रिया स्तनपानाला पर्याय म्हणून जाहिरातबाजीला भुलून कृत्रिम बालआहाराकडे वळतात आणि नंतर बाळाच्या आरोग्याची काळजी करीत बसतात.
डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, औषध कंपन्या साऱ्या समाजालाच "गिनीपिग्ज' मानून प्रयोग करण्यात आघाडीवर आहेत. श्रीमंतांच्या रोगांवरील संशोधनावर अवाजवी खर्च केला जातो आहे. साथीचे रोग ही या देशापुढील समस्या असताना श्रीमंतांसाठी "हार्ट' हॉस्पिटल्स जिकडेतिकडे उभी राहत आहेत. गरज नसताना सिझेरियनपासून बायपासपर्यंतच्या शस्त्रक्रिया करणे भाग पाडले जात आहे. महागड्या अनावश्यक तपासण्यांना तर सुमार नाही. अनेक डॉक्टरांची "कट्‌ प्रॅक्टीस' अधिक उत्पन्न देणारी आहे. शस्त्रक्रिया करण्यातील धोके, महागड्या औषधांचे दुष्परिणाम रुग्णांपासून लपविले जात आहेत. जो हौशी क्रेझी नवश्रीमंत वर्ग या "मेडिकल फ्रेंझी'त सापडला आहे तोच याचा सर्वाधिक संख्येने बळी आहे. या वर्गाला साध्या तापासाठीही आय.सी.यू.लागतो. मग डॉक्टरही त्याच्या खिशावर शस्त्रक्रिया सुरू करतात आणि त्यामुळे त्याच्या आरोग्यावर दीर्घकालीक घातक परिणाम काय होतात याची पर्वा करीत नाहीत. आधुनिक तपासणी यंत्रे-तंत्रे-साधने म्हणजे डॉक्टरांसाठी "पैशाची झाडे' झाली आहेत. पेशंटस्‌च्या नातेवाईकांना डॉक्टर्स कसे "इमोशनल ब्लॅकमेल' करून तपासण्या-शस्त्रक्रिया अनावश्यक असूनही करणे भाग पाडतात याची हजारो-लाखो उदाहरणे पहाल तिकडे सापडतील.
सार्वजनिक आरोग्यसेवा भ्रष्ट आणि अकार्यक्षम तर खाजगी आरोग्यसेवा शोषण आणि अनैतिक व्यापारीकरणाने ग्रस्त मग सामान्य माणसाने अशा परिस्थितीत काय करायचे?

युवकांचा जाहीरनामा

युवकांचा जाहीरनामा
युवक असंतुष्ट आहेत आणि त्यांच्या समस्या मूलभूत असून त्यांची सोडवणूक करण्यासाठी निकराने प्रयत्न व्हायला हवेत हे जवळजवळ कुणीच अमान्य करत नाही पण तरी प्रत्यक्ष या समस्यांची सोडवणूक करण्याच्या दिशेने मात्र फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. युवक जसे मूलभूत समस्यांचे निराकरण करून घेण्यापेक्षा वरवरच्या तात्कालिक व्यथा-वेदनांबद्दल तक्रार करतात, तसे उपाय करणारेही मूळ रोग बरा होईल असे न बघता वरवर मलमपट्टी करून मोकळे होतात. यामुळे हा असंतोष वाढतोच आहे आणि त्या असंतोषाच्या ज्वालामुखीचा उद्रेकही नको तेव्हा, नको तिथे, नको तसा होतो आहे. युवकांपैकी सर्वाधिक चिंतेचा आणि चर्चेचा विषय असलेला वर्ग म्हणजे विद्यार्थी असलेल्या युवकांचा. युवकांच्या आंदोलनात विद्यार्थी तर युवकांच्या तुलनेत अधिक संघटित आणि उग्र स्वरुपात कृती करणारा विद्यार्थी वर्ग प्रामुख्याने अस्वस्थ आहे तो त्याला भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्यांमुळे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका समितीच्या अहवालानुसार वय वर्षे पंधरा ते पस्तीस या गटातील व्यक्ती युवक मानता येते. म्हणजे महाविद्यालयाच्या उंबरठ्यावरील शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेशही या युवकवर्गात करावा लागेल.
शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश करू पाहणारा हा युवक कोणत्या हेतूने उच्च शिक्षणाकडे वळतो, हा प्रश्र्न चिंतनीय आहे. आमच्या महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट विद्यापीठाने कोणते मानले आहे, शासनाला काय मान्य आहे, पालक आणि विद्यार्थी काय समजतात हे पाहिले तर उच्च शिक्षणामागील आमचे प्रयोजन संदिग्ध आणि गोंधळाचे आहे असे दिसते. स्वातंत्र्यपूर्वकाळात शिक्षण आणि कारकून तयार करण्यासाठी आखलेली शिक्षणपद्धती आजही तशीच आहे. नोकरी मिळवण्यासाठी पदवी आवश्यक आहे. एवढ्या एकाच कारणासाठी युवकांची उच्च शिक्षणाकडे धाव नसते का? उच्च शिक्षणाची सामाजिक प्रतिष्ठेशी असलेली सांगडही उच्च शिक्षणाबद्दल समाजाच्या सर्व थरांत आकर्षण निर्माण करणारी ठरली आहे. उच्च शिक्षणाचे प्रयोजन आणि त्या अनुरूप अशा शैक्षणिक क्रांतीचे स्वरुप निश्र्चित करण्यावाचून आता गत्यंतर उरलेले नाही.
अनेक राष्ट्रांमधून विशेषत: प्रदीर्घ काळ पारतंत्र्यात खितपत राहिलेल्या भारतासारख्या अविकसित राष्ट्रांतून शिक्षण आणि समाज यांची फारकत झालेली दिसते. राष्ट्रीय आकांक्षा-गरजा आणि शिक्षणाचे तत्त्व पद्धती यांच्यात मेळ नसतो. त्यामुळे एकांगी, एकतर्फी अशा पुस्तकी पांडित्याला अवाजवी स्थान प्राप्त होऊन सामाजिक परिवर्तन आणि शैक्षणिक वाटचाल यांत अंतर पडलेले दिसते. विकसनशील राष्ट्रांमधून शिक्षणपद्धतीत आमूलाग्र परिवर्तन करण्याच्या प्रयत्नातील पहिले पाऊल शिक्षणपद्धती समाजाभिमुख करणे हेच असावे लागेल. युवकांच्या जाहीरनाम्यातील ते एक महत्त्वाचे कलम ठरावे. शिक्षण ही धीम्या, संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे. शिक्षणाचे फायदे किंवा फलश्रुती राष्ट्रीय जीवनात दृगोचर व्हायला किमान एका पिढीचा काळ जावा लागतो. जर हे फायदे शक्य तितक्या लवकर उपलब्ध व्हावेत अशी इच्छा असेल तर अविकसित किंवा मागासलेल्या राष्ट्रांना शिक्षणाला पूरक-पोषक अशा अन्य साहाय्यक उपक्रमांची जोड देण्यावाचून पर्याय नाही. भारतात याची जाणीव दिसत नाही. शैक्षणिक क्षेत्रातील असंतोष आणि वैफल्याचे एक कारण या जाणीवेचा अभाव हे देखील आहे. त्यासाठी "शिक्षण' आणि राष्ट्रीय परिवर्तनाची आकांक्षा व प्रगतीचे प्रयत्न यांची सांगड कशी घालायची याचे धोरण निश्र्चित करावे लागेल. नवे प्रश्र्न सोडविण्यासाठी नव्या उपायांच्या नव्या पद्धती शोधून काढण्याचे एक आव्हान देशापुढे उभे आहे.
आमच्या उच्च शिक्षणाने जो सुशिक्षित वर्ग निर्माण केला तो स्वत:ला पांढरपेशा आणि बुद्धिजीवी अशी विशेषणे लावून हस्तिदंती मनोऱ्यात आणि समाजविन्मुख अवस्थेत राहणारा, आपल्या स्वच्छ पोशाखी संस्कृतीच्या अभिमानाबरोबर त्याच्या मनात बळावली ती श्रमजीविंविषयीची तुच्छता-उपहासाची भावना. श्रम आणि बुद्धी यांचा वियोग भूषणावह मानणारी ही पिढी राष्ट्रविकास आणि राष्ट्र निर्माण करायला कशी समर्थ ठरेल याची शंका वाटते. बुद्धी, श्रम यांचा समन्वय आणि दोन्हींतील मूलभूत प्रतिष्ठेवर आधारित समता प्रस्थापित करणारे, अहंगंडांच्या जागी स्वाभिमान, लाजिरवाण्या परावलंबनाच्या जागी स्वावलंबन निर्माण करणारे शिक्षण निर्माण करणे ही युवकांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाची मागणी आहे.
महात्मा गांधींनी वापरलेला "जीवनशिक्षण' हा शब्द अलीकडे दुर्लक्षित आहे. जीवनातून शिक्षणाचा, ज्ञानाचा उगम होतो ही त्यांची कल्पना. आपण अलीकडे भाषेतून ज्ञानाचा उदय होतो असे मानू लागलो आहोत. किंबहुना वाचेतून उगम पावून वाचेतच ज्याची परिसमाप्ती होते ते शिक्षण, अशी आपण समजूत करून घेतल्यामुळे शिक्षण म्हणजे आजची बेकारी उद्यावर ढकलण्याची योजना, असा अर्थ होत आहे. इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरे करून प्रादेशिक विद्यापीठे कृतार्थतेच्या ढेकरा देत आहेत.
भाषांतरे करून माध्यमाचा प्रश्र्न सुटत नसतो हे लक्षात येत नाही. म्हणून प्रादेशिक विद्यापीठे ही प्रादेशिक भाषेत भाषांतरे उपलब्ध करून देऊन प्रादेशिक बनू शकत नाहीत. इथल्या जीवनाशी ती व त्यांचे शिक्षणक्रम आणि भाषा समरस होणे महत्त्वाचे आहे. ज्ञान होणे, समजणे आणि त्या ज्ञानाची परिभाषा वापरण्याचे तंत्र तेवढे उमजणे यांतील फरक ध्यानात घेऊन माध्यमाचा प्रश्र्न सोडवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. पण आज तरी माध्यमाचा प्रश्र्न हा त्यामागील तत्त्व आणि व्यवहार यांच्याबाबतच्या जागृततेच्या अभावी अधिकाधिक जटिल होत चालला आहे. भाषाविषक धोरणाची राजकारणाशी घातलेली सांगड देखील अहितकारक अशा गुंतागुंतींना कारणीभूत झाली आहे. राजकारण बाजूला ठेवून शिक्षणाचे माध्यम आणि भाषांचे महत्त्व यांचा विचार व्हायला हवा.
शिक्षणविषयक बदल करा म्हटले की केंद्र सरकार राज्य सरकारकडे आणि राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवते. प्रत्येकजण दुसऱ्यावर जबाबदारी ढकलणार किंवा दोषारोप करणार. मग सारे एका निष्कर्षाला येऊन पोहचतात तो असा की, जे काही शैक्षणिक परिवर्तन किंवा सुधारणा नियोजन करायचे असेल ते नवा किंवा जादा आर्थिक बोजा न घेता करावे. एकीकडे शासन शैक्षणिक क्रांतीच्या गप्पा मारीत असतानाच सांगणार की, शाळा-कॉलेजांनी आवश्यक त्या सुखसोयी, सवलती मागू नयेत. विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय ज्ञानात आणि संशोधनक्षेत्रात क्रांती घडवतो म्हणणार पण त्याचवेळी "नो फर्दर फिनॅन्शियल कमिटमेंट'च्या नियमांकडे बोट दाखवून सांगणार. प्रयोगशाळा किंवा नवी साधने मागू नका. प्राध्यापक, शिक्षकांच्या मानसिक-शारीरिक स्वास्थ्याकरता आवश्यक असली तरी पगारवाढ मागू नका. मग या सगळ्या जबाबदाऱ्या टाळून कशी आणि कुठली शैक्षणिक क्रांती घडणार आहे? म्हणजे परिवर्तन सिलॅबसमध्ये होईल, पद्धतीत नाही. सरकारला आवश्यक ती "फिनॅनशियल कमिटमेंट' करायला कसे भाग पाडायचे याचाही विचार सरकारला करावा लागेल.
सर्वसाधारणपणे शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्याला व्यवसाय-नोकरी मिळवून देण्यासाठी आवश्यक पात्रता निर्माण करणे हा असावा अशी अपेक्षा दिसते. ही अपेक्षा पूर्णपणे चुकीची आहे असे नाही. जर चरितार्थ सुरळीतपणे चालेल असा व्यवसाय शिक्षणातून मिळणे शक्य होत नसेल तर अनेक समस्या निर्माण होतात. समाजात ती व्यक्ती "उपयुक्त' ठरावी अशी पात्रता उत्पन्न करणे आणि त्याचवेळी त्या व्यक्तीतील सुप्त शक्तींना जागवून सामाजिक जाणीवांचा विकास घडवणे शिक्षणातून साधले पाहिजे. "डिग्री नव्हे नोकरी द्या' म्हणत आपले वैफल्य व्यक्त करणारे किंवा पदवी प्राप्त होऊन प्रत्यक्ष "प्रॅक्टिकल वर्क' ला आपले "थिऑरेटिकल' ज्ञान अपूर्ण आहे असे आढळून आल्याने निराश होणारे तरुण का निर्माण होतात, याचा विचार व्हायला हवा. केवळ विद्यापीठाच्या पदव्या जीवनात नोकरी-व्यवसाय मिळवायला पात्र करू शकत नसतील तर त्यांचा हव्यास टाळता नाही येणार? धंदेशिक्षणाची तरतूद करणारी व स्वयंपूर्ण, स्वावलंबी बनवणारी शिक्षण पद्धती आता हवी आहे आणि युवकांच्या जाहीरनाम्यातील ती मागणी महत्त्वाची आहे.
विद्यापीठाचे शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी, यात विद्यार्थ्यांची अवस्था फक्त "ऐकणाऱ्या आणि आज्ञा पाळणाऱ्या' गुलामांची असते. स्वत:चे भवितव्य घडवणाऱ्या शैक्षणिक धोरणांची आखणी करताना आपल्याला त्यात सहभाग नसावा ह्याची त्यांना खंत वाटली नाही तरच आश्र्चर्य! नवा विद्यापीठ कायदाही प्राचार्य, संस्थाचालक आणि सरकारच्या हितसंबंधाची जपणूक करणारा आणि त्यांना प्रभावी प्रतिनिधित्व देणारा आहे. विद्यार्थ्यांना नाममात्र प्रतिनिधित्व देऊन उपेक्षात करण्यात आली. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या शासनात अधिकाधिक सहभागी करून घ्यायला कसे भाग पाडता येईल ही एक समस्या, तर महाविद्यालयांमधून अस्तित्वात असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळांना अधिक प्रभावीपणे आणि प्रामाणिकपणे क्रियाशील कसे करावे आणि महाविद्यालयांतर्गत कारभारात विद्यार्थ्यांचे हितसंबंध कसे जपावेत, ही दुसरी समस्या. या सहभागासाठी निवड कशी करायची, कोणत्या तत्त्वांवर स्वरुप आणि कार्य करायचे हे ठरवावे लागेल.
आजची परीक्षापद्धती विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षण व्यवस्थेच्या अध:पतनाला प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे. भ्रष्टाचार आणि गैरप्रकार यांनी बरबटलेल्या या परीक्षापद्धतीची विश्र्वासार्हता अनेक कारणांनी शंकास्पद ठरली आहे. ज्या विषयाचा वर्ष--दोन वर्षे अभ्यास केला त्याचे दोनतीन तासांत मूल्यमापन करू पाहणारी परीक्षापद्धती अजबच नाही तर काय? केवळ साचेबंद, ठरीवसाच्याच्या प्रश्र्नोत्तरांत अडकलेली आणि स्वतंत्र विचार वा संशोधनाला अवसर न देणारी ही परीक्षापद्धती विद्यार्थ्यांना ठरीव गाईडपद्धतीची उत्तरे तयार करण्यास प्रवृत्त करते आणि तात्कालिक उथळ घोकंपट्टीच्या आधाराने ते तथाकथित यश प्राप्तही करू शकतात. गाइड किंवा उथळ ज्ञानाच्या साहाय्याने दिलेल्या चलाख, धूर्त उत्तरांचे किंवा लाचलुचपतीच्य मार्गाने यश मिळू शकते. याचे आनुषंगिक दुष्परिणाम अनेक होतात. कोचिंग क्लासेस, गाईडस्‌ यांचे महत्त्व वाढून महाविद्यालयांना केवळ "फॉर्म देणाऱ्या परमिट ऑफिस' ची कळा येते. बुद्धिमान आणि अभ्यासू विद्यार्थ्यांवर हा अन्याय नाही का? सामान्य विद्यार्थ्यांमधील ज्ञानाविषयीची अनास्था आणि अनादर वाढीला लावणारी ही परीक्षापद्धती बदलणे आवश्यक आहे. महाविद्यालयांमधून शैक्षणिक वर्षाच्या आरंभी उडणारी झुंबड, प्रवेशेच्छू विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या आणि उपलब्ध मर्यादित जागा यांच्या व्यस्त प्रमाणातून कॅपिटेशन फी, देणगी, लाच, वशिला या अप-प्रकारांचा उगम होतो. महाविद्यालयांनी टक्केवारीची अट लादल्याने एका दुष्ट अभेद्य वर्तुळाचा प्रारंभ होतो. चांगली प्रतिष्ठित महाविद्यालये उच्च टक्केवारीचेच विद्यार्थी तेवढे घेऊन आपले निकाल चांगले लावतात आणि कमी प्रतीचे विद्यार्थी कमी दुय्यमप्रतीच्या महाविद्यालयांतून अधिक अधोगतीस जातात. वास्तविक सर्व दर्जाचे व गुणवत्तेचे विद्यार्थी सर्व महाविद्यालयांमधून सरमिसळ झाले तर चांगलेवाईट ही दुष्ट वर्गवारी टळू शकेल. पण प्रवेशाबाबतची धोरणे आणि अडवणूक यांनी सध्या तरी विद्यार्थ्यांना गांजले आहे ही व्यवस्था बदलली जावी.
वाढती विद्यार्थी संख्या आणि अपुरी अध्यापकांची संख्या यातून प्राध्यापक-विद्यार्थी नाट्याचा दुवा तुटला आहे. प्राध्यापकांच्या अलिप्त किंवा नाकर्तेपणाच्या धोरणामुळेही विद्यार्थी दुरावले आहेत. प्राध्यापकांची अपुरी तयारी, वेळ मारून नेण्याची इच्छा, परीक्षार्थी पद्धतीने तुटपुंजे ज्ञान देणे, अप्रामाणिकपणा, व्रताऐवजी पेशाला धंद्याची कळा आणणे यामुळे प्राध्यापक-विद्यार्थी नाते निकोप राहिलेले नाही. ठराविक भाषणाच्या नोटस्‌ टेपरेकॉर्डर पद्धतीने वर्षानुवर्षे ऐकवणारे किंवा योग्य ज्ञान योग्य प्रकारे देऊ शकण्यास असमर्थ असलेले अयशस्वी प्राध्यापक नाकारण्याचा हक्क विद्यार्थ्यांना नाही. अपुरी वाचनालये, असमाधानकारक प्रयोगशाळा, प्रचंड विद्यार्थी संख्या, प्राध्यापकांचे दुर्लक्ष, सहाध्यायी विद्यार्थ्यांची बेशिस्त, अभ्यासाला प्रतिकूल असे सामाजिक सांस्कृतिक वातावरण, इतर दैनंदिन अनावश्यक व्यापांमुळे, उदा- प्रवास इत्यादी अडथळे, जीवनाशी संबंध नसलेला आणि भवितव्याची शाश्र्वती न देणारा म्हणून निरर्थक वाटणारा अभ्यासक्रम, कॉपी, वशिला अथवा अन्य भ्रष्ट मार्गांचा नाउमेद करणारा इतरांकडून परीक्षादींत होणारा वापर, व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकृत कल्पनांमधून निर्माण होणारा आणि बेचैन करणारा स्वैराचार, हुल्लडबाजी, प्राध्यापक, प्राचार्य, परीक्षक यांच्याकडून होणारा पक्षपात किंवा अन्याय, महाविद्यालयातील स्वच्छतागृह, उपाहारगृह, विश्रांतीगृह, क्रीडागृह आणि क्रीडा-साधने यांचा अभाव, अपूर्णत: आरोग्यवर्धनासाठी आवश्यक साधन-सोयी, वातावरण यांची प्रतिकूलता, युवक आणि युवती यांच्या सहशिक्षणातून निर्माण होणारे "बरे-वाईट' भावनैक ताण, वसतिगृहांमधील अनावश्यक स्वातंत्र्य आणि त्याचा सहाध्यायांकडून होणारा दुरुपयोग, महाविद्यालय आणि घर यांतील अंतर व प्रवासाची साधने, शिक्षणाचा वाढता खर्च आणि पालकांची असमर्थता, शिक्षण घेत असतानाच नोकरी वा अर्र्थोत्पादनाच्या अन्य सोयीस्कर साधनांची सार्वत्रिक दुर्मिळता, कौटुंबिक कलह, अनिश्र्चितता असे अनेक मुद्दे आजच्या विद्यार्थी युवकांच्या ज्वलंत समस्या म्हणून निर्देशित करता येतील आणि यांतील प्रत्येक मुद्दा किंवा समस्या प्रर्दीघ चर्चेचा,- चिंतनाचा विषय व्हावा इतक्या महत्वाचा आहे. या सर्व मुद्यांची दखल संबंधितांनी घ्यायला हवी अशी या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही मागणी करीत आहोत.
युवकांनी सर्वप्रथम काय हवे असेल तर संपूर्ण सामाजिक व्यवस्थेत त्यांचे हक्काचे असलेले स्थान. संपूर्ण युवक आंदोलन हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या याच मागणीवर केंद्रित झालेले आहे. एकदा समाजातल्या इतर सर्व घटकांनी युवकांचे योग्य ते स्थान मान्य केले की मग मुद्दाम काही वेगळे मागण्याचे कारण राहात नाही. सर्व हक्क आणि कर्तव्येही आपोआप चालत येतात. समाजात स्थान असणे म्हणजे तरी काय! तर त्या तरुणांना असे वाटले पाहिजे की, खरोखरच समाजाला त्यांच्या कष्टाची, बुध्दीची, शक्तीची जरूरी आहे आणि तो जर नसेल तर त्याची उणीव समाजाला भासणार आहे. आपली गरज समाजाला नाही, आपण नसल्याने समाजाचे काही बिघडणार नाही ही जाणीव तरुणाला वैफल्याकडे लोटते.
युवकांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुध्द प्रखर आंदोलने करून प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने खंबीर पाऊले टाकली आहेत. आपल्या देशापुढे 1)अंधविश्र्वास, 2)रुढी-परंपरा-प्रियता 3)विज्ञाननिष्ठेचा अभाव 4)निरक्षरता व अज्ञानता 5)जातीयता, 6) उद्योगप्रियतेचा अभाव 7) दारिद्र्य 8)धार्मिकता 9)भ्रष्टाचार 10)भाषावाद, 11)प्रांतीयता, 12)विषमता अशा अनेक समस्या आज उभ्या आहेत. आमचे युवक या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी चळवळ हाती घेतील पण कशाप्रकारे कोणते प्रश्न त्यांनी प्राधान्याने हाती घ्यावेत आणि सोडवावेत याचा विचार व्हायला हवा. युवक आपले सामाजिक जबाबदाऱ्यांचे उत्तरदायित्व टाळू शकणार नाहीत. समाज आणि सरकारनेही त्यांच्यावर जबाबदाऱ्या विश्र्वासाने सोपविल्या पाहिजेत.
युवकांचे व्यापक आणि मूलभूत प्रश्न हाती घेऊन विविध मार्गांनी प्रभावी आंदोलने करणाऱ्या सुसंघटित आणि व्यापक अशा संघटना आपल्याकडे अनेक आहेत. पण अनेकदा युवक संघटना समस्या हाती घेण्याऐवजी तात्कालिन प्रश्नांतून स्थानिक स्वरूपाचे नेतृत्व आणि संघटन तात्पुरते प्रबळ होते किंवा अस्तित्वात येते व समस्ये बरोबरच अंतर्धान पावते. स्थायी आणि संघटित स्वरूपाची प्रबळ आणि विस्तृत पाया असलेल्या युवक संघटनांनी केवळ विद्यार्थ्यांचे नव्हे विद्यार्थी तर युवकांचे हितसंबंधही जपले पाहिजेत.
युवक किंवा विद्यार्थी संघटनाचे व युवक चळवळीचे यशापयश नेतृत्व कसे व कोणत्या दार्जाचे प्रकारचे आहे यावर अवलंबून असते. युवकांचे नेतृत्व परिपक्व हवे. निर्णय घेण्याची कुवत आणि पात्रता, आत्मविश्र्वास, शोधक नजर, वेळसाधण्याचे कसब, दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी, सत्यप्रियता, वास्तववादित्व, जिद्द, शिस्तबद्ध कठोरता, कमिटेडनेस, निर्भीडपणा, प्रेरणादायी व्यक्तीमत्व, आशावादित्व असे अनेक गुण चांगल्या नेतृत्वाच्याठायी आवश्यक असतात. असे नेतृत्व सामान्यांमधून उदयाला येत असते; पण ते निर्माण होण्याला अवसर असावा लागतो. ते जर अपरिपक्व किंवा सदोष असेल तर संपूर्ण संघटनेचा व चळवळीचा घात करते. युवकांचे नेतृत्व कसे असावे, कसे निर्माण करावे व त्याने काय करावे ह्याचा निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. यासाठी सरकार आणि समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
युवकांच्या चळवळीचा उद्रेक अनेक प्रकारच्या असंतोषातून होत असतो. गेल्या काही वर्षांतील युवक आंदोलनांत ज्या काही प्रमुख कारणांचा वाटा होता त्यांत 1) फी-वाढ 2)अयोग्य प्राध्यापक प्रचार्यांची हकालपट्टी 3)कॅपिटेशन फी 4) शिक्षण संस्थांमधील गैरव्यवहार 5) फी-माफी, 6) फी-सवलत 7) शिष्यवृत्तीत वाढ 8) विद्यापिठाची जागा बदलणे 9)महाविद्यालयातील अपुऱ्या सोयी-सवलती 10)पोषाख-स्वातंत्र्य 11) कॉपी 12) वसतिगृहातील असमाधानकारक स्थिती 13)अपुरा अध्यापक वर्ग 14)अयोग्य कुलगुरूची हकालपट्टी 15) सार्वजनिक किंवा शासकीय क्षेत्रांतील भ्रष्टाचार 16) व्यापार-उद्योगधंद्यातील काळाबाजार साठेबाजी इत्यादी अप्रवृत्ती 17)सामाजिक आर्थिक विषमता 18) दलितांवरील अन्याय 19) बेकारी 20) महागाई 21) गलिच्छ राजकारणाचा हस्तक्षेप 22) आक्षेपार्ह परीक्षापध्दती 23)उचित व न्याय हक्क डावलणे 24)पोलीस अगर अन्य बळाचा अनुचित वापर 25) पक्षपात आणि तुच्छतेची वागणूक अशा कारणांचा पुन:पुन्हा आढळ होतो. या साऱ्या युवकांच्या समस्याच आहेत आणि चळवळ त्यासाठी होणे अपरिहार्य आहे. पण अशा चळवळींमागील कारणांचा शोध घेऊन हे उद्रेक टाळण्यासाठी तक्रार निवारण आणि व्यवस्थापनाची यंत्रणा उभारली जावी.
पदवी अथवा शिक्षण घेतले तरी नोकरी मिळेल किंवा ती योग्यतेनुसार मिळेल याची कोणतीही शाश्र्वती नाही. नोकरी अभावी या तरुणांमध्ये निर्माण होणारे वैफल्य भयानक आहे. युवकांची अस्मिता आणि स्वाभिमान, स्वावलंबन यावर प्राणघातक असा आघात करणारी बेकारीची कुऱ्हाड आहे. बेकार तरुणांचे कौटुंबिक जीवन, मानसशास्त्रीय घडण, सामाजिक स्थान, आर्थिक परावलंबन, सांस्कृतिक अध:पतन, वैफल्य आणि संताप हे सर्वच मुद्दे चिंतेचे व्हावेत असे आहेत.
महाविद्यालये आणि विद्यापीठांची प्रवेश फी, पुस्तके, विविध मंडळांच्या सभासदत्वाच्या वर्गण्या, वार्षिक टर्म आणि परीक्षा-फी, नैमित्तिक देणग्या, दंड,अनामत रकमा, जिमखाना किंवा प्रयोगशाळा - या सर्व खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. स्वत:चे सामान्य मर्यादित आर्थिक उत्पन्न असलेल्या किंवा मर्यादित पगारस्वरुप उत्पन्न मिळवणाऱ्या पालकांच्या मुलांना शिक्षण परवडेनासे झाले आहे.
एकाच शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्याथर्यांर्र्च्या आर्थिक परिस्थितीतील विषमता ही सर्वच विद्यार्थ्यांच्या मनावर बरेवाईट परिणाम करीत असते. काही विद्यार्थी न्यूनगंडाने पछाडले जातात. पैसेवाल्यांचा भपका आणि दिमाख यामुळे दिपून स्वत:ला क्षुद्र समजू लागतात किंवा त्यांच्या असूयेबरोबरच त्याला स्वत:चे जीवन नीरस वाटू लागते. युवकांमधील आर्थिक विषमतेची व तज्ज्ञन्य व असूया किंवा न्यूनगंडाची जाणीव कमी कशी करता येईल याचा विचार व्हायला हवा.
घरच्या आर्थिक परिस्थितीचा ताण विद्यार्थांच्या मनावर सतत राहतो. कुटुंबावर कोसळलेल्या लहानशा आपत्तीनेही शिक्षण बंद पडण्याचा धोका असतो. विभक्त कुटुंबामुळे स्वायत्त झालेली कुटुंबे पुरेशी स्वयंपूर्ण नसल्याने एका वेळी एकाहून अधिक मुलांना शिकवणे परवडत नाही. मुलगी हुशार असली तरी तिला डावलून मठ्ठ मुलालाही शिक्षणाबाबत अग्रहक्क दिला जातो. शिक्षण दिले तरी आवश्यक अशा इतर सोयी-साधनांंचा अभाव राहतो, त्यामुळे शिक्षणात वा अध्ययनात अपूर्णता येऊन प्रगती व गुणवत्ता घसरते. दारिद्र्यामुळे घरातही कलह माजून अभ्यासाला पोषक असे वातावरण रहात नाही.
मर्यादित उपलब्ध संधी आणि अमर्याद इच्छुक यामुळे नोकरी देणे आणि टिकवणे या दोन्हीत भ्रष्टाचाराला अमाप संधी आहेे.तसेच अन्याय आणि पिळवणुकीलाही वाव आहे.लायकी, पात्रता असूनही नोकरी न मिळणे हेही एक प्रकारचे शोषणच आहे. अडवणूक करून देणग्या वा अनामत रकमांच्या रूपाने विद्यार्थ्यांना छळणारे संस्थाचालकही त्यांची आर्थिक पिळवणूकच करीत असतात.
युवकांच्या विकास आणि भवितव्यातील शाश्र्वतीसाठी शासनाने एखादा युवक कल्याण-कर लावून निधी उभारण्याची आवश्यकता आहे. बेकार युवकांना पात्रतेनुसार रोजगार अथवा किमान जीवनमानानुसार बेकारभत्ता देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आर्थिक साहाय्यासाठी सर्व शिक्षण मोफत करणे, शिष्यवृत्या वाढवणे, श्रमाधिष्ठित अर्थार्जन करून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देेणे आदी विविध योजनांचा आर्थिक समस्यांच्या संदर्भात विचार व्हायला हवा.
भारतीय युवकांच्या जीवनावरील आणि भारतीय संस्कृतीवरील पाश्र्चात्य भोगवादी तत्त्वदानाचा आणि विचारांचा वाढता अपायकारक प्रभाव आता चिंता वाटण्याइतपत स्थितीत आहे.पाश्र्चात्यांच्या विज्ञाननिष्ठेऐवजी आपण त्यांची भोगलोलुपता घ्यावी हे दुर्दैव आहे. याखेरीज विकृत मनोवृत्तीतून जन्माला आलेली स्वस्त गल्लाभरू प्रवृत्तीचे निदर्शक अशी पुस्तके, चित्रपट, नाटके यामुळेही समाजात वासना आणि विकृती यांचे जाळे फैलावत आहे. जुगार, वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी ही सर्व त्या विकृतीचीच अपत्ये आहेत. युवकांमधील वाढती व्यसने, हिंसाचार, गैरवर्तन, बेशिस्त, नीतिभ्रष्टता, स्वार्थी सुुखलोलुप वृत्ती, पैसा म्हणजे सर्वस्व मानण्याचा व साधनाच्या शुद्धाशुद्धतेचा विवेक न करता तो मिळवण्याचा प्रयास, गुंडगिरी हे सर्व या सांस्कृतिक प्रदूषणाचे दुष्परिणाम आहेत. याचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध होण्याची वेळ आता आली आहे.
युवकांच्या कलागुणांना विशेषत:दुर्लक्षित प्रदेश, भाषा अगर जातींतील तरुणांबाबत प्रस्थापित कलावंत डुढ्ढाचायार्र्मुळे अवसर मिळणे अवघड होते. चित्रकार, लेखक, कवी, गायक, वादक अशा सर्वच कलाक्षेत्रांतील नवोदित तरुणांपुढेे आर्थिक, तसेच प्रस्थापित चौकटीमुळे अनेक समस्या उभ्या राहतात. निस्वार्थीपणे सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्थांची अपुरी संस्था अथवा आर्थिक दुर्बलता किंवा मक्तेदारी यामुळे नवोदित कलाकारांची होणारी कुचंबणा ही देखील गंभीर समस्या आहे.
भाषा आणि जाती-धर्म यांच्या अडथळ्यांमुळे सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया अवरोधली गेली असून सांस्कृतिक, सामाजिक जीवनात दूषित साकळलेपणा आला आहे. मागासलेल्या जातीजमातीच्या उन्नतीचा प्रश्न हा जसा आर्थिक स्वरूपाचा आहे तसाच तो त्यांना त्यांचे न्याय्य सामाजिक स्थान, समता प्राप्त करून देण्याचा त्यांच्या सांस्कृतिक उन्नयनाचादेखील आहे. समाजातील धर्म, भाषा, संस्कृती, जाती, प्रदेश, आर्थिक स्तर यांतून या भिन्नतेतून एकात्मता कशी निर्माण करता येईल याचा विचार व्हायवा हवा आदिवासी, दलितांच्या लढ्यांबाबत तसेच कामगार, भूमि-मजूर आदी शोषितांबाबत साऱ्या समाजाने निश्र्चत भूमिका घ्यायला हवी या सर्व घटकांच्या समस्या समजावून घेऊन उपाय शोधले पाहिजेत.